शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

माकपचा तालखेड येथे मोर्चा, नित्रूडला निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:36 IST

तालुक्यातील तालखेड व नित्रूड येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने २ रु. किलोने रेशन द्यावे, संजय गांधीच्या लाभार्थींना अनुदान तात्काळ द्यावे, यासाठी गुरुवारी तलाठी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला तर नित्रूड येथील तलाठी कार्यालयावर शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, रोजगार हमी योजनेच्या कामे द्यावीत यासाठी निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देदुष्काळाच्या मागणीसह इतर मागण्या : दुष्काळात हेक्टरी ५० हजार रु पये नुकसान भरपाईसह रोहयो कामाची केली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : तालुक्यातील तालखेड व नित्रूड येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने २ रु. किलोने रेशन द्यावे, संजय गांधीच्या लाभार्थींना अनुदान तात्काळ द्यावे, यासाठी गुरुवारी तलाठी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला तर नित्रूड येथील तलाठी कार्यालयावर शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, रोजगार हमी योजनेच्या कामे द्यावीत यासाठी निदर्शने करण्यात आली.तालखेड येथील मोर्चेकºयांनी जनावरांच्या दावणीला चारा व पाण्याची व्यवस्था करा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क व परीक्षा फीस माफ करा, तालखेड शिवारात रोजगार हमी योजनेची कामे तात्काळ चालू करा, बोंडअळीचे अनुदान वाटप करा आदी मागण्या मांडल्या. यावेळी मागण्यांचे निवेदन मंडळ अधिकाºयांना देण्यात आले. यावेळी माकप तालखेड शाखा सचिव कॉ.अशोक राठोड, सदस्य कॉ.विनायक चव्हाण कॉ.भीमराव जाधव, कॉ.विजय राठोड, ग्रा.पं.सदस्य बिबाबाई जाधव, दयानंद जाधव, कॉ.संजय चव्हाण, माजी ग्रा.पं.सदस्य माणिक जाधव, अविनाश डुबे, भास्कर खांडे, रेवन यादव, छबू राठोड, विनायक राठोड, राजाभाऊ जाधव, बापूराव घेणे, महादेव सुरवसे, भीमराव राठोड, गिन्यानदेव राठोड, शिवाजी मुठाळ, लखन राठोड, शिवाजी जाधव, दत्ता शेळके, मोहन राठोड यांच्यासह शेतकरी, महिला सहभागी झाल्या होत्या.तालुक्यातील नित्रूडच्या आंदोलनात यावर्षी कमी पाऊस पडल्यामुळे तालुक्यातील शेतकºयांवर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. शेतकºयांनी लागवड केलेली पिके उगवलेच नाही. जे उगवले आहे ते पूर्ण करपून गेले. शेतकºयांचा पेरणी करण्यासाठी केलेला खर्च देखील निघालेला नाही. शिवारातील कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी, मूग, यासह सर्व पिके पावसाअभावी करपून गेले आहेत. गुरांचा चारा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शेतात पिक नसल्याने मजुरांच्या हाताला काम शिल्लक राहिले नाही.त्यामुळे रोजगार हमी योजनेची कामे तात्काळ सुरू करा, शेतकºयांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्या, शेतकºयांच्या जनावराना दावणीला चारा देण्यात यावा, गरीब व अल्पभूधारक शेतकºयांचे संपूर्ण कर्ज माफ करा, शेतकºयांना नव्याने कर्ज पुरवठा करा, २०१६-१७ च्या अतिवृष्टीचे अनुदान तात्काळ वाटप करा, उपळी धरणाचे पाणी नित्रूडच्या तलावात सोडण्यात यावे, कृषी पंपाचे वीज बिल माफ करा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. मागण्यांचे निवेदन तलाठी मढकर यांना देण्यात आले.आंदोलनाचे नेतृत्व कॉ दत्ता डाके यांनी केले. आंदोलनात संदीपान तेलगड, सुभाष डाके, माणिक काळे, सय्यद रज्जाक, जनक तेलगड, पोपट गायकवाड, नारायण तातोडे, सुखदेव घुले, दत्ता घुले, शेख खलील, अर्जुन तातोडे, लक्ष्मण आव्हाड, अप्पा आढाव, रामभाऊ पवार, पांडुरंग उबाळे, लिंबाजी पवार, हनुमंत कोथिंबीरे यांच्यासह शेतकरी, शेतमजूर सहभागी होते.

टॅग्स :BeedबीडCommunist Party of India (markjhista)कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया (मार्क्झिस्ट)agitationआंदोलन