शहरं
Join us  
Trending Stories
1
हर्षवर्धन पाटलांचा भाजपाला रामराम; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा
2
इंदापूरात भाजपाचे बॅनर्स हटवले; हर्षवर्धन पाटील 'तुतारी' चिन्हावर विधानसभा लढणार?
3
संयुक्त राष्ट्रात भारतानं काढली पाकिस्तानची खरडपट्टी; जगाला दाखवला 'दहशतवादी' चेहरा
4
Mumbai: बापच 5 वर्षांपासून करत होता बलात्कार; अल्पवयीने मुलीने व्हिडीओ बनवून...
5
भाजपा नेत्याने राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे जाहीरच केले; व्हिडीओ पाहून शरद पवारही चकीत
6
Supriya Sule : "दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहिलेला नाही"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप
7
राहु नक्षत्रात शनी गोचर: ६ राशींची प्रगती, बचतीत यश; व्यवसायात नफा, नवीन नोकरीची संधी!
8
Navratri 2024: देवीच्या आरतीतलं प्रत्येक कडवं जणू काही देवीशी प्रत्यक्ष संवादच; वाचा भावार्थ!
9
पुणे हादरलं! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
10
Navratri 2024: नवरात्रीत केवळ डिजेवर नाचून नाही तर 'अशी' करा शक्तीची उपासना!
11
"ट्रेनचा स्पीड कमी करुन..."; वंदे भारतवर दगडफेक करणाऱ्याने सांगितलं धक्कादायक कारण
12
Women's T20 World Cup, INDW vs NZW : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
13
भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय बदल होतात? नागपूरकरांनी लढलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी
14
"त्या सिनेमाचा हिरो रात्री १२ वाजता मला...", मल्लिका शेरावतचा खुलासा, नेटकऱ्यांनी लावला अंदाज
15
"मला संपवू नका, मीच राहिलो नाही, तर तुम्ही...", अशोक चव्हाणांचे विधान चर्चेत
16
...तर शरद पवारांसोबत चर्चा करू; MIM च्या मविआतील प्रवेशावर ठाकरे गटाची भूमिका
17
खळबळजनक! "तुमची मुलगी एका..."; डिजिटल अरेस्ट, ८ कॉल, 'त्या' फोनने आईला हार्ट अटॅक
18
अभिजात दर्जासाठी पहिली समिती ते आतापर्यंतचा प्रवास... अखेर तेव्हापासूनच्या प्रयत्नांना यश
19
आता GPay युझर्सना मिळणार Gold Loan; 'या' कंपनीसह झाला करार, पाहा डिटेल्स
20
शेअर बाजार उघडताच पुन्हा विक्री सुरू, सेल ऑन राइजमध्ये अडकला बाजार; BPCL, एशियन पेंट्स आपटला

नुकसानाचे प्राथमिक पंचनामे करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 5:12 AM

बीड : जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून, पूल-रस्ते वाहून ...

बीड : जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून, पूल-रस्ते वाहून गेले असून, काही ठिकाणी जीवितहानीदेखील झाली आहे. या सर्व घटनांचे पंचनामा करून प्राथमिक अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी कृषी, महसूल व पंचायत विभागाला दिले आहेत.

सोमवारी रात्री मुसळधार पावसाने शेतातील जोमात आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर, अनेक ठिकाणी शेतजमिनी वाहून गेल्या. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. रस्ते व त्यावरील पूलदेखील खचले आहेत. तर जनावरांसह माणसांचादेखील मृत्यू झाला आहे. त्यामुळे या सर्वांचे पंचनामे करून प्राथमिक अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी प्रशासनाला दिले आहे. दोन दिवसात हे सर्व अहवाल शासनाला सादर केले जाणार असून, त्यानंतर शासनाकडून पुन्हा पंचनामा करून अहवाल सादर झाल्यानंतर मदतीची घोषणा केली जाणार आहे.

नुकसानग्रस्त भागात लोकप्रतिनिधी फिरकलेच नाहीत

जिल्ह्यातील अनेक भागात नुकसान झाले असून, या सर्व नुकसानाची पाहणी करण्यासाठी जिल्ह्यातील नेते फिरकले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अपेक्षित नुकसानभरपाई मिळेल की नाही, याची शाश्वती नसल्याचे नागरिकांचे मत आहे.

जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार कृषी विभागाने जेथे अतिवृष्टी झाली आहे, तेथील पिकांच्या नुकसानाचे प्राथमिक अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले आहेत. - बाबासाहेब जेजुरकर, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, बीड