शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

आज मुंबईत पंकजा मुंडे यांचा बीडच्या समर्थकांसोबत संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 4:38 AM

बीड : केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांचा समावेश न केल्याबद्दल बीड जिल्हा भाजपत पसरलेला असंतोष वाढला असून, ...

बीड : केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांचा समावेश न केल्याबद्दल बीड जिल्हा भाजपत पसरलेला असंतोष वाढला असून, जिल्ह्यातून जवळपास ७० जणांनी जिल्हाध्यक्षांकडे आपल्या पदाचे राजीनामे पाठवले आहेत. हे राजीनामे घेऊन भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के हे मंगळवारी मुंबईत पोहचणार आहेत. मुंडे भगिनींचे समर्थक मोठ्या संख्येने मुंबईत पोहोचले असून, मंगळवारी त्यांच्याशी पंकजा मुंडे या संवाद साधतील, असे सूत्रांनी सांगितले. या संवादात पंकजा मुंडे काय भूमिका घेतील, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

राजीनामे देणाऱ्यांत पक्षाचे पदाधिकारी, जि. प., पं. स. सदस्य, नगरसेवक, सभापती, उपसभापतींचा समावेश होता. बीड जिल्ह्यातील भाजपचे गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार, केजच्या आमदार नमिता मुंदडा, विधान परिषद सदस्य आमदार सुरेश धस यांनी अद्याप आपली प्रतिक्रिया दिली नाही. त्यांची काय भूमिका असेल? याबद्दल जिल्ह्यात उत्सुकता आहे. भाजपचे नेते रमेश आडसकर यांनीही जाहीर प्रतिक्रिया व्यक्त केली नसली तरी त्यांचे पुतणे आणि केज पंचायत समितीचे उपसभापती ऋषीकेश आडसकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन आपण सर्वांसोबत असल्याचे आडसकरांनी स्पष्ट केले.

कुठे तरी खटकतंय

२०१९च्या निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील भाजपत जी एकसंघता होती, ती आता दिसत नाही. आता हेच बघांना मराठा आरक्षणावर आमदार सुरेश धस यांनी बीडमध्ये मोर्चा काढला तेव्हा खासदार डॉ. प्रीतम मुंडे या रेल्वेमार्गाच्या प्रश्नावर आमदार सुरेश धसांच्याच आष्टीत माजी आ. भीमसेन धोंडे यांना सोबत घेऊन अधिकाऱ्यांची बैठक घेत होत्या. भाजपच्या भूमिकेप्रमाणेच आमदार धसांनी दोन दिवसांत नियोजन करून बीडमध्ये भव्य मोर्चा काढला होता. तरीही खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांची या मोर्चाला असलेली अनुपस्थिती चर्चेचा विषय झाली होती. विशेष म्हणजे मोर्चाला गेवराईचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार, माजी आ. आर. टी. देशमुख यांची आवर्जून उपस्थिती होती. या मोर्चाच्या वेळी आमदार धस यांनी अगदी तोंडभरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केली होती, तर आमदार लक्ष्मण पवार आणि फडणवीसांचे सख्ख्य जिल्हाला माहीत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर या लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.