शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

मोफत प्रवेशाकडे पालकांची पाठ, जिल्ह्यात आरटीईचे ५१ टक्केच प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 4:38 AM

बीड : शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल आणि वंचित घटकांतील २५ टक्के मोफत प्रवेश लटकलेलेच दिसत आहेत. प्रवेशासाठी आता ...

बीड : शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल आणि वंचित घटकांतील २५ टक्के मोफत प्रवेश लटकलेलेच दिसत आहेत. प्रवेशासाठी आता पुन्हा २३ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यातील निवड झालेल्या बालकांची ११ जूनपासून प्रवेश प्रकिया सुरू झाली होती. १० जुलैपर्यंत जिल्ह्यात २०१२पैकी १०३६ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. या आकड्यानुसार ५१.४६ टक्केच प्रवेश निश्चित झाले आहेत. आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२१ - २२ या शैक्षणिक वर्षाकरिता ज्या बालकांची लॉटरीद्वारे निवड झाली आहे, त्यांनी २३ जुलै २०२१पर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, मोफत प्रवेशाकडे पालकांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. धारूर तालुक्यात निकषपात्र ८ शाळांमध्ये सर्व १०० जागा रिक्त आहेत, तर माजलगावात १७ टक्के, अंबाजाेगाईत १८ टक्केच प्रवेश पूर्ण झाले आहेत. २३ जुलैपर्यंत मुदत असल्याने येत्या दहा दिवसांत किती प्रवेश निश्चित होतात, याकडे लक्ष लागले आहे.

आरटीईअंतर्गत जिल्ह्यात शाळांची नोंद -२३३

एकूण जागा -२,०१२

आतापर्यंत झालेले प्रवेश -१,०३६

रद्द झालेला अर्ज -१

शिल्लक जागा - ९७५ २) तालुकानिहाय शाळा आणि जागा

तालुका शाळा जागा शिल्लक जागा

अंबाजोगाई ३७ ३०१ २४६ आष्टी १४ ०३१ ०१७

बीड १८ १६१ ०४० धारूर ०८ १०० १०० गेवराई ३६ ३४६ १२८ केज २१ १७६ ०५६ माजलगाव २९ १९३ १६० परळी २९ ३०९ ११६ पाटोदा ०४ ०२० ००६ शिरूर १० ०६१ ०१० युआरसी बीड २० २५६ ०७२ वडवणी ०७ ०५८ ०२४ दुसऱ्यांदा मुदतवाढ

शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी ऑनलाईन सोडत काढण्यात आली होती. निवड झालेल्या बालकांना प्रवेशासाठी ३० जूनपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर ११ व नंतर पुन्हा २३ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता २३ जुलैपर्यंत प्रवेश घेता येणार आहेत.

शाळांचे पैसे सरकार कधी देणार?

आरटीई फी परतावा (प्रतिपूर्ती) शासनाकडे मोठ्या प्रमाणात थकला आहे. हा परतावा वेळेत न दिल्यामुळे बीड जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या अनेक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. कोरोनानंतर उद्भवलेल्या परिस्थितीतून सावरणे कठीण बनले आहे. व्यवस्थापनावर खूप ताण पडत आहे. शासनाने प्रतिपूर्ती रक्कम तातडीने देण्याची गरज आहे. - अमर भोसले, सचिव मेस्ट

पालकांच्या विविध अडचणी

गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांना प्राप्त होणाऱ्या ओटीपीच्या तांत्रिक कारणामुळे ऑनलाईन प्रवेश निश्चित होण्यास विलंब होऊ लागला. काही पालकांना उत्पन्नाचा दाखला अद्याप न मिळाल्याने प्रवेश थांबला आहे. काही नोकरदार पालकांच्या कार्यालयांची वेळ आणि शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांची वेळ याचा मेळ बसत नसल्याने पालक पुरेशी कागदपत्रे जमा करू शकलेले नाहीत. त्यामुळे बालकांचे प्रवेश रखडले आहेत, तर काही शाळा पालकांना विविध त्रुटी काढून चकरा मारायला लावत आहेत.

विद्यार्थ्यांचे आधार अपडेट होताच प्रतिपूर्ती

आरटीई प्रवेश कमी होण्यामागे अनेक कारणांपैकी मागील फी थकलेली असणे, हे एक कारण असू शकते. संबंधित शाळांना त्यांची प्रतिपूर्ती लवकरच मिळणार आहे. फक्त विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करणे आवश्यक आहे. - श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी (प्रा.), बीड.