शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरलं! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
2
भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय बदल होतात? नागपूरकरांनी लढलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी
3
"मला संपवू नका, मीच राहिलो नाही, तर तुम्ही...", अशोक चव्हाणांचे विधान चर्चेत
4
...तर शरद पवारांसोबत चर्चा करू; MIM च्या मविआतील प्रवेशावर ठाकरे गटाची भूमिका
5
खळबळजनक! "तुमची मुलगी एका..."; डिजिटल अरेस्ट, ८ कॉल, 'त्या' फोनने आईला हार्ट अटॅक
6
अभिजात दर्जासाठी पहिली समिती ते आतापर्यंतचा प्रवास... अखेर तेव्हापासूनच्या प्रयत्नांना यश
7
आता GPay युझर्सना मिळणार Gold Loan; 'या' कंपनीसह झाला करार, पाहा डिटेल्स
8
"असं केलं, तर महाराष्ट्रात आरक्षणाचा वाद राहणार नाही", शरद पवारांनी काय सुचवला मार्ग?
9
शेअर बाजार उघडताच पुन्हा विक्री सुरू, सेल ऑन राइजमध्ये अडकला बाजार; BPCL, एशियन पेंट्स आपटला
10
MIM ची मविआत एन्ट्री?, काँग्रेस-राष्ट्रवादीला लेखी प्रस्ताव; २ बैठका सकारात्मक
11
मराठीला 'अभिजात भाषेचा दर्जा'; शरद पवारांनी केंद्राचे केले अभिनंदन, म्हणाले...
12
'गोलीगत' सूरजसाठी सुप्रिया सुळे मैदानात! बिग बॉसचा महाविजेता करण्यासाठी बारामतीकरांना केलं आवाहन
13
करामती Rashid Khan 'ते' वचन विसरला! क्रिकेटरनं ३ भावांसह एकाच मांडवात उरकलं लग्न
14
मोदी सरकारची नवी स्कीम, १ कोटी तरुणांना महिन्याला ₹५००० मिळणार; कधी, केव्हा, कसा कराल अर्ज?
15
मराठी भाषेला अभिजात दर्जा, राज ठाकरेंनी केलं स्वागत; या निर्णयाचा फायदा सांगितला
16
Bigg Boss 18: बॉलिवूड सुंदरी घेणार घरात एन्ट्री, ९० च्या दशकातील ही 'सेन्सेशनल क्वीन' कोण?
17
इस्त्रायलची मोठी कारवाई! बेरुतही स्फोटांनी हादरला, हिजबुल्लाहचा नवा चीफ सफीद्दीन टारगेटवर
18
संपादकीय: इराणने का उडी घेतली? पडसाद अमेरिकेतील निवडणुकीत
19
मोठी बातमी! मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, चालक गंभीर, पिकअपला दिली धडक
20
सत्तार दोन तास उशिरा आले, कार्यक्रम सोडून गेले! बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत गदारोळ

बीडमध्ये गरिबांचा बर्गर कुठे स्वस्त कुठे महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 5:11 AM

बीड : मागील काही महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ झाल्याने गरिबांचा बर्गर असणारा वडापाव शहरात काही ठिकाणी महाग झाला ...

बीड : मागील काही महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ झाल्याने गरिबांचा बर्गर असणारा वडापाव शहरात काही ठिकाणी महाग झाला आहे. तर काही ठिकाणी आधी होते तेच दर स्थिर आहेत. शहरातील हॉटेलमध्ये सकाळी पुरी- भाजी, उपमा, शिरा आणि भजी, जिलेबी ग्राहक चवीने खातात. तर सायंकाळी कचोरी, समोसा, रगडा पॅटिस, दाबेली, पाव भाजीची चव चाखतात; मात्र सर्वाधिक ग्राहकांचा वडापाव खाण्याकडे कल आहे. अनेक जण हौसेपोटी वडापाव खरेदी करतात तर काहीजण वडापाव खाऊनच दिवस काढतात. मात्र मागील तीन-चार महिन्यांपासून गॅस, खाद्यतेल, बटाट्यांच्या दरात २० ते ३० टक्के वाढ झाल्याने वडापाव विक्रेत्यांनी आकार कमी करून दर मात्र स्थिर ठेवले आहे. तर काही विक्रेत्यांनी दिवसभराचा खर्च पाहता महागाईमुळे वडापाव, भजीचे दर वाढविले आहे. बीडमध्ये १० रुपयांना मिळणाऱ्या दोन वडापावची प्लेट मागील तीन वर्षांपासून १५ रुपये आहे. तर भजी प्लेट किंवा समोसा दहा रुपयांना मिळतो; मात्र दर शहरातील ठराविक भागातच आहेत. इतर भागात मात्र वडापावची प्लेट २० रुपयांना तर भजीप्लेट १५ रुपयांना विकली जाते.

१) म्हणून महागला वडापाव

वडापाव, कचोरी किंवा समोसासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या दरांत चांगलीच वाढ झाली आहे. १५ किलो तेलाचा डबा दोन हजाराला मिळत होता. तो आता २३०० च्या पुढे गेला आहे. बेसनाचे भाव ७० रुपये किलोवरून ९० रुपये झाले. बटाटे १५ वरून २० रुपये तर गॅस सिलिंडरला १७०० रुपये मोजावे लागतात. आचारी, कामगारांसह इतर खर्च पाहता विक्रेत्यांना वडापाव किंवा भजी, समोसा कचोरीचे भाव वाढवावे लागले आहेत.

२) वडापावशिवाय दिवस जाणे कठीण

कामासाठी सकाळी गावाकडून बीडमध्ये येतो. भूक लागल्यावर कमी पैशात मिळणारा वडापाव नेहमी खातो. इतर पदार्थांचे दर परवडत नाही. वडापाव खाऊनच भूक भागवतो. दिवस काढतो. गावी गेल्यानंतरच जेवण करतो. -- अभिमान चिरके, आनंदवाडी.

------------

वडापाव खाऊनच अनेक जण आपले दैनंदिन कामकाज करत असतात. त्यांना मिळणारा रोजगार पाहता वडापाव त्यांची भूक भागविणारा पदार्थ आहे. जेवण किंवा नाष्टा किंवा इतर पदार्थांचे दर जास्त असून या तुलनेत वडापाव स्वस्त आहे. -- सिद्धेश्वर राऊत, बीड.

३) कोरोनाचा मोठा फटका

तेल, गॅस, बेसनचे भाव वाढले आहेत. तरीही नफ्यात घट करून आम्ही वडापावचे दर स्थिर ठेवले आहेत. एकूण खर्च परवहत नाही, परंतू जोडलेला ग्राहकही तोडता येत नाही. अनलॉकनंतर ग्राहकही कमीच आहेत. -- अर्जुन कदम, वडापाव विक्रेता, बीड.

---------

कोरोनामुळे आमच्या व्यवसायाला फटका बसला आहे. ग्राहक आहेत पण कमी प्रमाणात असल्याने दिवसभराचा व्यवसाय कमी झाला आहे. महागाईमुळे भाव वाढविणे सध्यातरी जोखमीचे ठरेल. त्यामुळे वडापावचे भाव आमच्या भागात कमी आहेत.