शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

निवडणुकीत मताधिक्य देणाऱ्या गावात रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 4:21 AM

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : ग्रामपंचायत निधीतून काम अशक्य माजलगाव : तालुक्यातील उमरी गावातून कोणत्याही निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला ...

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : ग्रामपंचायत निधीतून काम अशक्य

माजलगाव : तालुक्यातील उमरी गावातून कोणत्याही निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मताधिक्य दिले जाते; पण एक वर्षापासून गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

तालुक्यातील उमरी या गावाची लोकसंख्या तीन हजारांपेक्षा जास्त आहे. या गावांतून पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत प्रत्येक वेळी राष्ट्रवादी काँग्रेसला मताधिक्य दिले जाते. आजपर्यंत आ. प्रकाश सोळंके यांच्या ताब्यात येथील ग्रामपंचायत आहे. उमरी येथील बसथानक ते हनुमान मंदिर हा मुख्य रस्ता न झाल्याने या रस्त्यावर पावसाळ्यात पाणी साचत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरून अनेक दुचाकीस्वार पाण्याचा अंदाज न आल्याने पडले आहेत. महिला, वृद्ध, विद्यार्थ्यांना साचलेल्या पाण्यातून जावे लागत आहे. वेळोवेळी पाठीशी राहून मताधिक्य देणाऱ्या उमरी गावातील मुख्य रस्त्याचा प्रश्न आ. प्रकाश सोळंके यांनी मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.

गावातील मुख्य रस्ता असल्याने या कामाला मोठा निधी लागत आहे. या कामाला ग्रामपंचायतमधून निधी खर्च करणे शक्य होत नाही. तरी लोकप्रतिनिधींनी मुख्य रस्त्याच्या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून प्रश्न मार्गी लावावा.

-वैजनाथ घायतिडक,

ग्रामपंचायत सदस्य, उमरी.

170721\5027purusttam karva_img-20210717-wa0046_14.jpg