शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

नाफेडच्या ९ केंद्रांवर केवळ ६७ शेतकऱ्यांकडून नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 23:54 IST

खरीप हंगामातील पिके हाती आलेली असतानाच अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. कोंब फुटल्याने व काळवंडल्याने ही पिके नाफेडच्या निकषात पात्र ठरणार नसल्याची मानिसकता बनल्याने जिल्ह्यातील शेतक-यांनी माल विकण्यासाठी नोंदणीदेखील केली नाही.

ठळक मुद्देमुगासाठी ५५ , सोयाबीनसाठी १० शेतकऱ्यांची नोंदणी : दोन महिन्यांत अल्प नोंदणी; १५ डिसेंबरपर्यंत नोंदणीसाठी मिळाली मुदतवाढ

बीड : खरीप हंगामातील पिके हाती आलेली असतानाच अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. कोंब फुटल्याने व काळवंडल्याने ही पिके नाफेडच्या निकषात पात्र ठरणार नसल्याची मानिसकता बनल्याने जिल्ह्यातील शेतक-यांनी माल विकण्यासाठी नोंदणीदेखील केली नाही. दोन महिन्यात केवळ ६७ शेतक-यांनी नोंदणी केली आहे. यात ५६ शेतकºयांनी मूग विक्रीसाठी नोंदणी केली आहे. यावरु न सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट होत आहे. तर आहे तो माल विकण्याची चिंता शेतकºयांना आहे.शाासकीय हमीदराने खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून नाफेडच्या वतीने खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी केंद्र निश्चित करण्यात आले होते. जिल्ह्यातील ९ केंद्रांवर यासाठी १५ सप्टेंबरपासून नोंदणी सुरु केली होती. जून ते सप्टेंबर कालावधीत अनियमित पाऊस झाला तरी पिके जोमात होती. दरम्यान आॅक्टोबरमध्ये जिल्ह्यात सर्वच तालुक्यात अवेळी आणि मुसळधार पाऊस झाला. या पावसाने हाती आलेला घास हिरावला. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले. यात सोयाबीनचे नुकसान मोठ्या प्रमाणात आहे. पावसाच्या तडाख्यानंतर शेतीाकामात शेतकरी आहेत. भिजलेली, काळवंडलेली पिके असल्याने हा माल कोणी घेणार नाही अशी स्थिती आहे. त्यात ही पिके आता नाफेडचे निकष पूर्ण करु शकणार नाहीत. त्यामुळे शेतक-यांनी नोंदणीकडे पर्यायाने नाफेडला माल विकण्याकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील ९ केंद्रांवर दोन महिन्यात केवळ ६७ शेतकºयांनी नोंदणी केली आहे. सर्वत्र प्रतिसाद कमी मिळाल्याने तसेच शेतक-याच्या अडचणी लक्षात घेऊन नाफेडने खरेदीसाठी १५ डिसेंबरपर्यंत नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. परंतु खरीप हंगामातील उत्पादनाची एकूण परिस्थिती लक्षात घेता शेतकरी मोठ्या संख्येने नोंदणी करतील असे चित्र सध्यातरी नाही.मुगासाठी बीडमध्ये सर्वाधिक नोंदणीमूग विक्रीसाठी नाफेडच्या बीड केंद्रावर ४४ शेतक-यांनी नोंदणी केली आहे. अंबाजोगाई, माजलगाव, धारुर येथे प्रत्येकी एक तर परळीत ९ शेतक-यांनी नोंदणी केली आहे.चार तालुक्यातील नोंदणी निरंकसोयाबीनसाठी बीडमधून ८ तर माजलगावात २ अशा १० शेतक-यांनी नोंदणी केली आहे. तर केवळ परळीत उडीद विक्रीसाठी एका शेतक-याची नोंदणी आहे. गेवराई, शिरुर, आष्टी, पाटोदा येथे एकाही शेतक-याची नोंदणी झालेली नाही.सोयाबीनचा दर्जा खराबपावसामुळे सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात भिजले आहे. आर्द्रता, डागी आणि माती या शर्तीवर २२०० ते ३५०० पर्यंत भाव असलातरी खरेदीदार सावधतेने खरेदी करत आहेत. सध्या धुळे, लातूर, सोलापूर, सांगली भागातील प्लान्टकडून चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला ३८०० रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र