शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सौताडा घाटातील रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:37 IST

..... विहिरींची पाणी पातळी खालावली धानोरा : आष्टी तालुक्यातील धानोरा परिसरात गेल्या महिनाभरापासून पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे विहिरी, ...

.....

विहिरींची पाणी पातळी खालावली

धानोरा : आष्टी तालुक्यातील धानोरा परिसरात गेल्या महिनाभरापासून पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे विहिरी, बोअरवेलच्या पाणी पातळीत घट झाली आहे. शेतातील खरिपाची पिके पावसाअभावी सुकू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी पिकांना पाणी देत आहेत. दरम्यान, काही भागात पिण्याच्या पाण्याची टंचाईही जाणवत आहे.

....

वेलतुरी तलावातील पाण्याने गाठला तळ

धानोरा : आष्टी तालुक्यातील वेलतुरी येथील तलाव गेल्या वर्षी पूर्ण क्षमतेने भरला होता. त्यातील पाणी अजूनपर्यंत शिल्लक होते. परंतु यंदा ऑगस्ट महिना सुरू होऊन १० दिवस उलटत आले तरी मोठा पाऊस झाला नाही. यामुळे तलावातील पाण्याने तळ गाठला आहे. यामुळे लाभक्षेत्रातील शेतकरी चिंतेत आहे. दरम्यान, मोठ्या पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

....

सावरगाव, शेडाळा परिसरातील पिके धोक्यात

धानोरा : आष्टी तालुक्यातील धानोरा, शेडाळा, देवळगाव, वेलतुरी परिसरात पाऊस नसल्याने खरिपातील पिके धोक्यात आली आहेत. गेल्या २५ दिवसांपासून या परिसरात पावसाने दडी मारली आहे. यामुळे उडीद, कांदा, बाजरी, तूर पिकांनी माना टाकल्या आहेत. यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडण्याची चिन्हे आहेत.

....

सीना, मेहकरी प्रकल्पात पाणी सोडण्याची मागणी

कडा : आष्टी तालुक्यातील सीना, मेहकरी प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस नसल्याने पिकांसाठी पाणी उपसा सुरू आहे. कुकडी प्रकल्पातील धरणे भरत आली आहेत. तरी कुकडीच्या प्रकल्पातील पाणी सीना, मेहकरी धरणात तातडीने सोडावे, अशी मागणी आष्टी तालुक्यातील शेतकरी वर्गातून होत आहे.

......

आठवडी बाजार पूर्ववत करण्याची शेतकऱ्यांची मागणी

आष्टी : तालुक्यातील आष्टी, कडा, धानोरा येथील आठवडी बाजार कोरोनामुळे बंद करण्यात आले होते. अजूनही आष्टी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला नाही. त्यामुळे कोरोना नियमांचे बंधन आहे. यामुळे आठवडी बाजार पूर्ण क्षमतेने भरत नाही. यामुळे शेतकऱ्यांना आपला भाजीपाला व इतर शेतीमाल विक्रीसाठी अडचणी येत आहेत. तरी प्रशासनाने कोरोना नियम घालून बाजार पूर्ववत सुरू करावेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

....