शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अंबाजोगाईत उपविभागीय कार्यालयावर धडकला रिपाइंचा लक्षवेधी आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 16:44 IST

गरीब व दलितांचे प्रश्न राज्य सरकारकडून  तात्काळ  सोडवून घेण्यायासाठी  प्रत्येक तालुक्यात रिपाइं मोर्चा काढणार आहे.

अंबाजोगाई : राज्य सरकारकडून गरीब व दलितांवर अन्याय केला जातो आहे. त्यांच्या अडीअडचणींचे या सरकारला देणेघेणे नाही. गायराण जमिनी व भोगवट्यातील घरे अद्यापही नावची केली जात नाहीत. महामंडळांना निधी न दिल्याने महामंडळे डबघाईला आली आहेत. अन्याय अत्याचार वाढले आहेत. त्यामुळे गरीब व दलितांचे प्रश्न राज्य सरकारकडून  तात्काळ  सोडवून घेण्यायासाठी  प्रत्येक तालुक्यात रिपाइं मोर्चा काढणार आहे. असल्याचा इशारा युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी दिला आहे.

येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पु कागदे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्या घेवून मंगळवार (ता.9) आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या आक्रोष मोर्चात हजारो आंबेडकरी कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात पप्पू कागदे यांनी म्हंटल आहे की,  बर्दापूर येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तोडफोड व विटंबना होऊन 4 महिन्यांचा काळ लोटला आहे. त्याठिकाणी  अद्यापपर्यंत शासनाने नविन पुतळा बसवून स्मारकाचे बांधकाम सुरू केलेले नाही. त्यामुळे तात्काळ पुतळा बसवून बांधकाम सुरू करण्यात आले पाहिजे. पुतळा विटंबना प्रकरणातील सहआरोपी व सूत्रधार यांचा शोध घेऊन तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा. गायरान धारकांचे सरसकट 7/12 नांवे नोंद करून सातबारा द्या, दलित वस्ती विकास योजना वाढीव व प्रभाविपणे राबवण्यात यावी. लॉकडाऊन काळातील विद्युत वीज बील माफ करण्यात यावे. शहरी व ग्रामीण भागातील रहिवासी राहते भोगवट्यातील जागेत मालकी हक्क नांवे नोंद करून पीटीआर व 7/12 द्या, यासह  विविध मागण्यााठी युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी केल्या आहेत.

सरकारने राज्यातील गायराण जमीनी पोट खराब कायद्यात टाकल्यामुळे गायराण धारकांना बँक कर्ज मिळत नाही. त्यामुळे हा कायदा रद्द करण्यात यावा. राज्यातील अण्णाभाऊ साठे महामंडळ, महात्मा फुले महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ आदी  मागासवर्गीय  महामंडळांना गेल्या एक वर्षांपासून निधी दिला नाही. तो निधी तात्काळ देण्यात यावा, अशी मागणी या मोर्चात युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी केली आहे.

यावेळी  राजू जोगदंड, किसन तांगडे, दशरथ सोनवणे,प्रमोद दासुद, दिपक  कांबळे,अशोक साळवे,मजर खान, दीपक कांबळे, गोवर्धन वाघमारे, महादेव उजगरे, बापू पवार, नरेंद्र जावळे, सचिन कागदे,बन्सी जोगदंड,राणी गायकवाड,कपिल कागदे,मंगेश जोगदंड, राहुल गंडले,किरण खंडागळे,सनी वाघचौरे,प्रकाश तांगडे, यांच्यासह हजारो कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.

टॅग्स :agitationआंदोलनAmbajogaiअंबाजोगाई