शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

केजमध्ये निसर्गाचा रुद्रावतार; अतिवृष्टीने अनेक गावे उध्वस्त, शेतीचे अतोनात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 09:27 IST

Rain In Beed मांजरा धरणाचे सर्वच्या सर्व १८ दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना पुराचा धोका

केज : शहरासह तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्या नाल्यांना महापूर आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर मांजरा धरणाचे सर्वच्या सर्व अठरा दरवाजे उघडले आहेत पावसामुळे केज अंबाजोगाई रस्त्यावरील पुल वाहून गेल्याने अंबाजोगाई केज वाहतूक बंद झाली आहे 

पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी घुसले होते अतिवृष्टीमुळे केज,  तालुक्यातील ओढे, नद्या क्षमतेबाहेर वाहत असून अनेक गावात पाणी शिरले आहे. बहुतांशी गावांचा संपर्क तुटला असून अनेक ठिकाणचे पूल पाण्याखाली गेल्यामुळे परिस्थिती  अधिक बिकट झाली आहे. शेती आणि मालमत्तेच्या नुकसानीची तर गिणतीच राहिली नाही. अखंडित पावसामुळे मांजरा धरणात पाण्याची आवक प्रचंड वाढल्याने मंगळवारी पहाटे धरणाचे सर्वच्या सर्व १८ दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून नदीपात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या  गावांनाही पुराचा धोका निर्माण झाला असून नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. मांजरा प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडण्याची गेल्या अनेक दशकातील ही पहिलीच वेळ आहे. 

बीड जिल्ह्यात २३ सप्टेंबर पासून सातत्याने मुसळधार पाऊस सुरू आहे. सोमवार (दि.२७) पासून तर पावसाने बीड जिल्ह्यात उच्चांकी धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे विशेषतः केज, अंबाजोगाई, बीड तालुक्यातील शेकडो गावांची वाताहत झाली आहे. नदी, ओढे ओसंडून वाहत असून विविध पूल पाण्याखाली गेल्याने किंवा वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अतिवृष्टीमुळे गावांमध्ये पावसाचे पाणी घुसले असून ग्रामस्थांनी कालची रात्र भीतीपोटी अक्षरशः जागून काढली. उंदरी नदीचे पाणी नायगाव मध्ये घुसले असून तट बोरगाव शिवार पूर्ण पाण्यात गेले आहे तर सोनिजवळा पाझर तलावाचे पाणी अनेक घरात घुसले. इस्थळ जि.प. शाळेतही पाणी आले आहे. होळणा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने सोमनाथ बोरगावचाही संपर्क तुटला आहे. शेकडो गावातील शेती आणि मालमत्तेच्या नुकसानीची गिणतीच राहिली नसून सध्या फक्त स्वतःचा, कुटुंबियांचा आणि जनावरांचा बचाव करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. दरम्यान,  केज, कळंब, भूम, वाशी, चौसाळा, नेकनूर, भागात अतिवृष्टी झाल्यामुळे मांजरा धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने सोमवारी रात्री धरणाचे सहा दरवाजे पूर्ण क्षमतेने म्हणजेच तीन मीटर पर्यंत  उचलण्यात आले होते. मात्र, तरीही येवा सुरूच असल्याने आज मंगळवारी पहाटे धरणाचे आणखी १२ दरवाजे उघडण्यात आले. सद्य स्थितीत धरणाचे सर्वच्या सर्व एकूण १८ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यापैकी सहा दरवाजे तीन मीटरने तर १२ दरवाजे ०.५० मीटरने उघडण्यात आले असून त्यातून ७० हजार ८४६ क्युसेक वेगाने नदीपात्रात पाणीच विसर्ग सुरू आहे. त्यामुळे आता नदीकाठच्या गावांना महापुराचा प्रचंड धोका निर्माण झाला असून नागरिकांनी अतिसतर्क राहण्याची आवश्यकता आहे. 

महामार्गासह राज्य रास्ता बंद झाल्याने वाहने खोळंबलीदरम्यान, रात्रीच्या पावसात केज मधील डॉ. थोरात यांच्या रुग्णालयासमोरील तात्पुरता बांधलेला कच्चा पूल वाहून गेला. त्यामुळे केज-अंबाजोगाई रस्ता वाहतुकीसाठी बंद झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या. या भागातील अनेक दुकाने आणि घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. तर, कळंब-अंबाजोगाई रस्त्यावर सावळेश्वर पैठण  येथील पुलावरून पाणी आल्याने हा रास्त देखील बंद झाला आहे.

टॅग्स :RainपाऊसBeedबीड