शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

विद्यार्थ्यांच्या मदतीला धावणार "लालपरी"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 16:06 IST

३६ जिल्ह्यांत १८० केंद्रांवर ५ लाख ४१ हजार विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार आहेत. स्थानिक वगळता ६३ हजार २८४ विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यात परीक्षा केंद्रावर ने- आण करण्याची जबाबदारी लालपरीने घेतली आहे.

सोमनाथ खताळ

औरंगाबाद : दि. १ ते २० ऑक्टोबर दरम्यान सामायिक प्रवेश परीक्षा होणार असून राज्यातील ३६ जिल्ह्यांत १८० केंद्रांवर ५ लाख ४१ हजार विद्यार्थी प्रवेशपरीक्षा देणार आहेत. स्थानिक वगळता ६३ हजार २८४ विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यात परीक्षा केंद्रावर ने- आण करण्याची जबाबदारी लालपरीने घेतली आहे.

दोन सत्रात विद्यार्थ्यांची ने- आण केली जाणार असून राज्य परिवहन महामंडळाने तसे नियोजन करून  प्रत्येक विभाग नियंत्रकांना नुकतेच पत्र पाठविले आहे. शैक्षणिक वर्ष २०२०- २१ साठी शासकीय, शासन अनुदानित आणि खाजगी विना अनुदानित महाविद्यालयाच्या अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र, कृषी  तंत्रज्ञान विभागातील प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. 

दुसऱ्या टप्प्यातील नियोजन १० ऑक्टोबरनंतर केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. परीक्षा केंद्रावर विद्यार्थी चार तास आगोदर पोहचतील, असे नियोजन प्रत्येकाने करावे, अशा सूचनाही रापमचे महाव्यवस्थापक यांनी प्रत्येक विभाग नियंत्रकांना दिल्या आहेत. 

विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, यासाठी पथकांची नियुक्ती केली आहे. तसेच ऐनवेळी विद्यार्थ्यांची गर्दी वाढल्यास जादा बस सोडल्या जाणार आहेत. अशाप्रकारे नियोजन राज्यातील इतर जिल्ह्यांतही असेल, तसेच कोरोनाच्या संदर्भाने सोशल डिस्टंसिंगचे पालन, मास्कचा वापर करण्याबाबतही आवाहन करण्यात आल्याचे रापमने सांगितले. बीड जिल्ह्यातील ३ हजार ७३० विद्यार्थ्यांची सोय करण्यात आली असून विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याचे पुर्ण नियोजन केले असल्याचे विभाग नियंत्रक बी. एस. जगनोर म्हणाले.

टॅग्स :Bus Driverबसचालकexamपरीक्षाStudentविद्यार्थी