शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

साबलखेड-आष्टी-चिंचपूर रस्ता वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 4:38 AM

नितीन कांबळे लोकमत न्यूज नेटवर्क कडा : अहमदनगर-आष्टी-जामखेड हा रस्ता अंत्यत खराब झाला होता. तो काही महिन्यापूर्वी नगर ...

नितीन कांबळे

लोकमत न्यूज नेटवर्क

कडा : अहमदनगर-आष्टी-जामखेड हा रस्ता अंत्यत खराब झाला होता. तो काही महिन्यापूर्वी नगर पासून साबलखेड पर्यंत पूर्ण झाला आहे. परंतु आष्टीपर्यंत या रस्त्याचे काम रखडले आहे. आष्टीपासून चिंचपूर पर्यंत काम पूर्ण झाले आहे. परंतु जामखेड पर्यंत मंजुरी नसल्याने काम झालेले नाही. त्याचा प्रस्ताव शासनदरबारी पडून आहे.

नगर - आष्टी- जामखेड हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. काही वर्षांपासून तो आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडे वर्ग झाला. नगर ते साबलखेड असा रस्ता बनविण्यात आला. पण साबलखेड ते आष्टी व चिंचपूर ते जामखेड असा २० किलोमीटर अंतराचा रस्ता मध्येच अपूर्ण राहिला आहे. या रस्त्याची सध्या दुरवस्था झाली आहे. हा रस्ता अंत्यत खराब झाल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे रस्त्यावर अपघात वाढले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडे हा रस्ता मंजूर नसल्याने काम रखडले असल्याचे बोलले जात आहे. मागील वर्षी प्रस्ताव पाठवून त्याला मंजुरी देखील मिळाली होती. त्याचे टेंडर देखील निघाले पण कुठे माशी शिंकली आणि ते टेंडर रद्द झाल्याने हा रस्ता रखडला.

....

लोकप्रतिनिधीनो, उघडा डोळे बघा नीट...

जामखेड ते साबलखेड रस्ता अंत्यत खराब झाला आहे. मोठ मोठी खड्डे चुकवताना अपघात घडत आहेत. अनेकांचा जीव गेला आहे. तर शेकडो लोकांना कायमचे अपंगत्व आले आहेत. रोजच अपघाताच्या मालिका घडत असताना लोकप्रतिनिधींकडून कसलीच दखल घेतली जात नाही, असा आरोप शिवसंग्राम तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी उपस्थित केला आहे.

...

मंजुरी मिळताच काम सुरू

वरिष्ठ पातळीवर आता नव्याने याचा पाठपुरावा सुरू आहे. साधारणतः १८ कोटी रुपयांच्या रस्त्याचे काम प्रलंबित आहे. या कामाला मंजुरी मिळताच अर्धवट राहिलेले काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अहमदनगर येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता दिलीप तारडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

...