शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
2
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
3
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
4
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
5
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
6
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
7
धक्कादायक! गणवेश परिधान करून न आल्याने शिक्षकाकडून विद्यार्थ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण
8
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
9
रिया चक्रवर्ती हाजिर हो... ५०० कोटींच्या फसवणूक प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्रीला पोलिसांचे समन्स
10
भारताचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच पाकिस्तानात जाणार; बातमी ऐकून फारूख अब्दुल्ला खुश!
11
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
12
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
13
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
14
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
15
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
16
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
17
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
18
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच
19
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
20
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले

स्कूल बस चालकही आले अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 4:23 AM

अंबाजोगाई : विद्यार्थ्यांविना शाळा सुरू आहेत. त्यामुळे स्कूल बस चालकांच्या हाताला यावर्षीही कामच मिळाले नसल्याने ते सध्या आर्थिक अडचणीत ...

अंबाजोगाई : विद्यार्थ्यांविना शाळा सुरू आहेत. त्यामुळे स्कूल बस चालकांच्या हाताला यावर्षीही कामच मिळाले नसल्याने ते सध्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे मिळेल ते काम करून पोट भरत आहेत. शासनाने त्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी कॉ. अजय बुरांडे यांनी केली आहे.

-------------------------

पांदण रस्त्यांवर अतिक्रमण

अंबाजोगाई : तालुक्यातील काही पांदण रस्त्यांचा प्रश्न प्रलंबित असल्याने पावसाळ्यात शेकडो शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काहींनी या रस्त्यांवरच अतिक्रमण केले आहे. शेतीची मशागत व बांधबंदिस्ती करताना झाडे-झुडपे वाढली. अतिक्रमण केल्याने पांदण रस्ते गायब झाले. त्यामुळे पांदण रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.

---------------------------

व्यायाम साहित्याची दुरुस्ती करावी

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील काही परिसरामध्ये लावण्यात आलेल्या व्यायाम शाळेतील साहित्याच्या देखभाल-दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या साहित्याची दुरुस्ती करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

-----------------------------

मजूर संस्था आल्या संकटात

अंबाजोगाई : बेरोजगार मजूर संस्थांना शासकीय पातळीवर कामच मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये नैराश्य आले आहे. कोरोनाच्या संकटकाळात तरी या संस्थांना काम देऊन दिलासा देण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे, काम मिळेल या आशेने मोठ्या संख्येने बेरोजगार युवकांनी या संस्थांकडे नोंदणी केली आहे.

------------------------------

मेस चालकांचे आर्थिक नुकसान

अंबाजोगाई : कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शिक्षण तसेच काही व्यवसाय अजूनही ठप्पच आहेत. त्यामुळे मेस चालकांचे मोठे नुकसान होत असून त्यांना ग्राहकच नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे त्यांना आता शाळा, महाविद्यालये सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.

--------------------------------

विशेष घटक योजनेतून वीज जोडणी करावी

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील अनेक गावांमधील काही वस्त्यांमध्ये अद्याप विद्युत पुरवठा झालेला नाही. या वस्त्यांमध्ये प्रामुख्याने वंचित घटकांतील नागरिक राहतात. त्यामुळे वीज जोडणीपासून वंचित असलेल्या अनुसूचित जातीमधील कुटुंबीयांना विशेष घटक योजनेअंतर्गत वीज पुरवठा करावा, अशी मागणी वीज कंपनीकडे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक नागरिकांकडे वीज नसल्याने त्यांना दुसऱ्याच्या घरून वीज घ्यावी लागत आहे. हा प्रकार धोकादायक असल्याने वीज मीटर उपलब्ध करून देण्याची मागणी रिपाइं महिला आघाडीच्या बीड जिल्हा सचिव राणी गायकवाड यांनी केली आहे.