शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

शाळा बंद असल्याने मुलांसोबतच पालकांचे मानसिक आरोग्य बिघडतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 4:37 AM

दीड वर्षांपासून शाळा बंद : मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढला दीड वर्षांपासून शाळा बंदचा परिणाम : टीव्ही, मोबाईलच्या आहारी गेली मुले ...

दीड वर्षांपासून शाळा बंद : मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढला

दीड वर्षांपासून शाळा बंदचा परिणाम : टीव्ही, मोबाईलच्या आहारी गेली मुले

अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई : कोरोनामुळे गत दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने मुले घरातच आहेत. मुलांमध्ये चिडचिडेपणा, एकाग्रता कमी होणे, हट्टीपणा वाढत चालल्याने पालकांचेही मानसिक आरोग्य बिघडत असल्याचे समोर येत आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका लक्षात घेता गेल्यावर्षी पहिले ते चौथीचे वर्ग विद्यार्थ्यांसाठी बंदच राहिले. चौथी ते बारावीच्या शाळा काही दिवसांसाठी सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शाळा बंद ठेवण्यात आल्या. यावर्षीदेखील विद्यार्थ्यांसाठी शाळा बंदच आहेत. ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. मुले घरातच असल्याने मोबाईल व टीव्हीचे मोठे व्यसन त्यांना जडत आहे. याचा परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर होत आहे. मुलांमध्ये आत्मविश्वास नसणे, नैराश्य, चिडचिडेपणा वाढीस लागला आहे. एकलकोंडेपणा, हट्टीपणा, कशातच मन न लागणे. अशा विविध समस्या मुलांमध्ये जाणवत आहेत. परिणामी या सर्व स्थितीमुळे पालकांचेही मानसिक आरोग्य बिघडत असल्याचे समोर येत आहे.

मुलांच्या समस्या

शाळा बंद असल्याने मुलांना मित्रांबरोबर प्रत्यक्ष जाऊन खेळता येत नाही. त्यामुळे खेळणे थांबले आहे. त्यामुळे मुले एकलकोंडी होत चालली आहेत. मुलांमधील ऊर्जेला सद्यस्थितीत पुरेशी वाट मिळत नाही. मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढत आहे. मुले जास्त हट्टी होत आहेत. मोबाईल, संगणक, टॅबच्या आहारी गेली आहेत.

पालकांच्या समस्या

शाळा बंद असल्याने पालकांना मुलांच्या शैक्षणिक भवितव्याची चिंता सतावत आहे. यातूनच नैराश्य, चिडचिडेपणाही वाढत असल्याचे समोर येत आहे. मुले मोबाईलच्या आहारी जात असल्याचे पाहून, पालकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे.

मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात...

मुलांमधील चिडचिड वाढली आहे. मोबाईलच्या अति वापरामुळे डोळ्यांवर परिणाम होत आहेत. मुले एकलकोंडी होत आहेत. सकारात्मक चर्चा हवी, ती होत नाही. तसेच शिक्षक व विद्यार्थी संवाद गांभीर्याने होत नाहीत.

:डॉ. राजेश इंगोले,

मानसोपचार तज्ज्ञ, अंबाजोगाई

मुलांमध्ये मन न लागणे आदी समस्या जाणवत आहेत. पालकांचेही मानसिक आणि मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचे समोर येत आहे. आळशीपणा वाढत आहे. बुद्धिमत्तेची चंचलता कमी होणे, द्विधा स्थिती निर्माण होत आहे. कमजोरी, थकवा, डोकेदुखी अशी लक्षणे दिसून येतात.

-डॉ. शिवराज पेस्टे,

मानसोपचार तज्ज्ञ, अंबाजोगाई.

वर्गनिहाय विद्यार्थी

पहिली - ४४,८७७

दुसरी - ५०,७९०

तिसरी- ५३,२९७

चौथी-- ४८,८९५

पाचवी- ५२,८३३

सहावी- ५२,८९७

सातवी- ५२,०१४

आठवी- ५१,८०२

नववी- ४९,८९३

दहावी- ४८,९८३

----------

शाळेच्या निर्णयाकडे लक्ष

शाळा सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे शासनाच्या वतीने सांगितले जात आहे. ग्रामीण भागातील काही शाळा सुरूही झाल्या आहेत. मात्र, नगर परिषदेच्या हद्दीतील शाळा बंदच आहेत. त्या कधी सुरु होतील? याकडे पालकांसह विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.