शहरं
Join us  
Trending Stories
1
"खाऊन पिऊन बिल उधार ठेवून आले"; दावोस दौऱ्यात CM शिंदेंची १.५८ कोटींची थकबाकी, कंपनीची नोटीस
2
‘त्या’ ९ मंत्र्यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळणार नाही; शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय : देशमुख
3
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला
4
'पुतण्याचा कौटुंबिक विषय कायमचा संपला' म्हणत आमदार बबनराव शिंदेंची महायुतीला सोडचिठ्ठी
5
हरयाणात भाजपची हॅट् ट्रिक की, काँग्रेसचे होणार पुनरागमन? मतदानाला सुरुवात
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सार्वजनिक क्षेत्रातून प्रशंसा, कौटुंबिक व दांपत्य जीवनात सौख्य लाभेल
7
मंत्रालयात आमदारांच्या जाळीवर उड्या; विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळांसह आदिवासी आमदारांचा संताप
8
नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर दगडफेक; पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी, मोठं नुकसान
9
पुण्यात मित्राला झाडाला बांधून तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन नराधमांचा शाेध सुरू
10
राज्यातील अकृषक कर पूर्ण माफ; सरकारचा निर्णयांचा धडाका सुरूच, मंत्रिमंडळ बैठकीत ३३ निर्णय 
11
हावभाव बघूनच एकमेकींना समजून घेतो; शेफालीने सांगितले स्मृतीसोबतच्या ताळमेळीचे रहस्य
12
हार्दिकची १८ कोटींची  पात्रता आहे का? : मूडी
13
राज्यात आज धडाडणार राजकीय तोफा; मोदी वाशिम-ठाण्यात तर राहुल गांधी कोल्हापुरात
14
भारताचा दारुण पराभव, न्यूझीलंडची विजयी सलामी
15
धारावी प्रकल्पातील अनधिकृत बांधकामांसंदर्भात समिती; न्या. दिलीप भोसले अध्यक्ष, सहा सदस्यही नेमले
16
समाज घटकांसाठी महामंडळे; मंत्रिमंडळ बैठकीत जैन, बारी, तेली समाजासाठी महत्त्वाचे निर्णय 
17
पंतप्रधानांच्या डोळ्यात धूळफेक, अपूर्ण योजनेचे उद्घाटन
18
एकीकडे इराण म्हणतोय युद्ध नकोय, दुसरीकडे म्हणतोय इस्रायलवर हल्ले करणारच 
19
मोदींचे ठरले! ९ वर्षांनी पाकच्या दौऱ्यावर जाणार भारताचे परराष्ट्रमंत्री; ‘एससीओ’ परिषदेत हाेणार सहभागी
20
निवडणुकीचे सूर उमटले वाद्यांच्या बाजारात; उलाढाल वाढली, राज्यातील उमेदवारांची खरेदीसाठी धाव 

शिवसेना उपजिल्हाप्रमुख हल्ला प्रकरण, रायुकाँ तालुकाध्यक्षासह पाच जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 5:11 AM

बीड : शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हनुमंत जगताप (रा. भवानवाडी, ता. बीड) यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांना पुलावरून फेेकण्याचा प्रयत्न केल्याची ...

बीड : शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हनुमंत जगताप (रा. भवानवाडी, ता. बीड) यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांना पुलावरून फेेकण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना ३० ऑगस्ट रोजी घडली होती. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून ९ जणांवर गुन्हा नोंद केला.

उपजिल्हाप्रमुख जगताप यांच्या फिर्यादीवरून राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष तथा कुटेवाडी (ता. बीड) येथील उपसरपंच नंदू कुटेसह पाच जणांवर गुन्हा नोंद केला, तर दुसऱ्या गटानेही तक्रार दिली. त्यावरून जगताप यांच्यासह चौघांवर फिर्याद नोंदवली गेली.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख हनुमंत जगताप यांचे बंधू व दोन पुतणे यांच्यावर नुकतीच हद्दपारीची कारवाई केली. २६ ऑगस्ट रोजी कारवाईसाठी गेलेल्या पिंपळनेर पोलिसांची जीप गावकऱ्यांनी रोखून धरली होती. दरम्यान, २८ ऑगस्ट रोजी मंत्री संदिपान भुमरे यांच्या उपस्थितीत बीडमध्ये बैठक पार पडली. यात उपजिल्हाप्रमुख जगताप यांनी, आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचून, राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना जिल्हाप्रमुखावर आरोप केला होता. अशातच ३० ऑगस्ट रोजी त्यांच्यावर हल्ला झाला. दरम्यान, यानंतर दुपारी १२ वाजता जरुड - भवानवाडी रस्त्यावर हनुमंत मनोहर जगताप, उर्मिला हनुमंत जगताप, प्रताप हरिदास जगताप, काशिनाथ तुळशीदास जगताप यांनी दगडाने मारहाण करून शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार राजेभाऊ नारायण शिंदे (रा. भवानवाडी) यांनी पिंपळनेर ठाण्यात दिली. त्यावरून गुन्हा नोंद केला.

दरम्यान, हनुमंत जगताप यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून ३१ ऑगस्ट रोजी पिंपळनेर पोलिसांनी जबाब नोंदविला. त्यानुसार अमोल शिवाजी शिंदे, राजेंद्र नारायण शिंदे, योगेश मच्छिंद्र शिंदे, नितीन शिवा जाधव (सर्व रा. भवानवाडी) व रायुकाँ तालुकाध्यक्ष नंदू अंकुश कुटे (रा. कुटेवाडी, ता. बीड) व अनोळखी पाच यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद केला. शिवीगाळ करत मारहाण केली, तसेच पुलावरून फेकण्याचा प्रयत्न केला, गळ्यातील सोनसाखळी, ब्रेसलेट व पाच अंगठ्या असा एकूण तीन लाख ५० हजार रुपयांचा ऐवज हिसकावून नेला.

....

धुमसत होता राजकीय वाद

शिवसेनेचे जगताप व राष्ट्रवादी काँग्रेसचे कुटे यांच्यात गेल्या काही वर्षांपासून राजकीय वाद धुमसत होता. यापूर्वीही त्यांच्यात टोकाचे वाद झालेले आहेत. पुन्हा एकदा हल्ला, परस्परविरोधी तक्रारींमुळे ते चर्चेत आले आहेत. दरम्यान, दोन्ही गटाचे लोक फरार असून तपास सुरू असल्याचे पिंपळनेर ठाण्याचे सहायक निरीक्षक बाळासाहेब आघाव यांनी सांगितले.

....