शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
2
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
3
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
4
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
5
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
6
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
7
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
9
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
10
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
11
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
13
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
14
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
15
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
16
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
17
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
18
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
19
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
20
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

...म्हणून फिरविली विद्यार्थ्यांनी आयटीआयकडे पाठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 4:35 AM

बीड : आयटीआय प्रवेशासाठी अर्जनोंदणीत यंदा घट झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे ‘प्रवेश प्रोत्साहन अभियान’ राबविण्यात येत आहे. यंदा दहावीचा ...

बीड : आयटीआय प्रवेशासाठी अर्जनोंदणीत यंदा घट झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे ‘प्रवेश प्रोत्साहन अभियान’ राबविण्यात येत आहे. यंदा दहावीचा निकाल मूल्यांकनावर लागल्याने निकालाचा टक्का फुगला आहे. मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने स्पर्धा होईल असे वाटत असताना अपेक्षेच्या तुलनेत विद्यार्थ्यांची नोंदणी कमी झाली आहे. तर अनपेक्षितपणे जास्त गुण मिळाल्याने अनेक विद्यार्थी कॉलेजमध्ये शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत आहेत. त्यामुळे आयटीआयकडे नोंदणी करणाऱ्यांचे प्रमाण सध्यातरी कमी दिसत आहे. ३१ ऑगस्टपर्यंत नोंदणी करता येणार असल्याने आठवडाभरानंतर स्थिती स्पष्ट होणार आहे. कोरोनामुळे शिकण्याची मानसिकता अजूनतरी रुळावर आली नसल्याने विद्यार्थ्यांनी आयटीआयकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे. नोंदणी अर्ज कमी आल्याने प्रत्येक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून प्रवेश प्रोत्साहन अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातून आयटीआयच्या प्रशिक्षणाबाबत प्रसिद्धी आणि जनजागृती केली जात आहे.

जिल्ह्यातील शासकीय आयटीआय - १२

एकूण प्रवेश क्षमता - २,१६६

खासगी आयटीआय - १३

एकूण प्रवेश क्षमता - १,२८०

आतापर्यंत आलेले अर्ज - ८,६००

गतवर्षीपेक्षा कमी प्रतिसाद

बीड जिल्ह्यात मागील वर्षी आयटीआयच्या २० टक्के जागा रिक्त होत्या. एकूण १० हजार ५०० अर्ज आले होते. कोरोनाकाळात ही परिस्थिती होती. आता अनलॉक झाले आहे. कोरोनाही ओसरला आहे. तरीदेखील २४ ऑगस्टपर्यंत ८ हजार ६०० अर्ज आले असून, ८ हजार ५०० अर्ज कन्फर्म झाले आहेत. आठ दिवसांत अर्जांचा आकडा किती वाढतो याकडे लक्ष लागले आहे.

...म्हणून घटले आयटीआयचे विद्यार्थी

दहावीच्या परीक्षेत जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान शाखेतून डॉक्टर, इंजिनीअर होण्याची ऊर्मी निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे गावाजवळच कॉलेज असल्याने गाव सोडून वसतिगृहात राहून शिकवायला पाठविण्याबाबत पालक सद्य:स्थितीत उत्सुक नाहीत. आपली मुले आपल्याजवळ राहावीत, ही मानसिकता असल्याने आयटीआयकडे जाण्याचे प्रमाण कमी दिसते.

- सतीश कुलकर्णी, तज्ज्ञ, बीड.

कोरोनामुळे मागील दीड वर्षात औद्योगिक आस्थापनांमध्ये आलेला विस्कळीतपणा, ॲप्रेंटीसशिपमध्ये लागलेल्या मुलांची कमी संख्या, मॅकेनिकल वगळता इतर ट्रेडमध्ये नसलेली मागणी, आयटीआय पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना स्वबळावर उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाची विशेष योजना नसणे आदी कारणांमुळे आयटीआयचे विद्यार्थी घटले आहेत.

- आनंद देशपांडे, तज्ज्ञ, बीड.

विद्यार्थी म्हणतात-

नोकरीची हमी, रोजगार संधी तसेच स्वयंरोजगाराच्या दृष्टीने मी आयटीआयच्या प्रशिक्षणासाठी नोंदणी केली आहे. कमी कालावधीत रोजगार मिळू शकेल. त्यामुळे दहावीचा निकाल लागताच मी आयटीआयसाठी नोंदणी करून अर्ज कन्फर्म केला आहे.

- प्रथमेश कानडे, विद्यार्थी.

-----------

आयटीआयमधून ट्रेड करण्याचाही विचार असल्याने नोंदणी केलेली आहे. मात्र मला दहावीला चांगले गुण मिळाले आहेत. त्यामुळे विज्ञान शाखेतून प्रवेश घेऊन बारावीनंतर इंजिनीअरिंगचे शिक्षण घेण्याचा मानस आहे. अकरावी प्रवेशाची तयारी केली आहे.

- स्वप्निल शिराळकर, विद्यार्थी.