दिंद्रुड : किल्लेधारूर आदर्श पत्रकारसंघाच्या वतीने आयोजित आदर्श ग्रामपंचायत स्पर्धेत व्हरकटवाडी या गावाने उतरत पहिल्याच दिवशी गावात तणनाशकाची फवारणी करत ग्रामस्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला आहे.
धारूर तालुक्यातील बालाघाटच्या डोंगरात वसलेले छोटेसे सुंदर गाव म्हणून व्हरकटवाडीची विशेष ओळख आहे. पानी फाउंडेशनच्या माध्यमातून या गावाने मोठी पाणी चळवळ राबवत गावाला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी अग्रेसर राहिलेली आहे. किल्ले धारूर आदर्श पत्रकारसंघाच्या आदर्श ग्रामपंचायत स्पर्धेत व्हरकटवाडीने ग्रामस्वच्छता अभियान राबविले. सोमवारी गावात डासमुक्त व आरोग्यास घातक असणाऱ्या विषाणूची बाधा टाळण्यासाठी तणनाशक फवारणी करत स्वच्छता मोहीम राबविली. पाच फवारे घेऊन गावभर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गावात स्वच्छता करत गाव समृद्ध शाली करण्यासाठी व्हरकटवाडी ग्रामस्थ पुढे आल्याचे सरपंच ललिता रामकिसन व्हरकटे यांनी सांगितले.
190721\img-20210718-wa0088.jpg
ग्रामपंचायत हद्दीत तणनाशकाची फवारणी
आदर्श ग्रामपंचायत स्पर्धेमध्ये व्हरकटवाडी चा सहभाग