शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
2
पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...
3
"तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय..."; फडणवीसांचं नाव घेत मनोज जरांगे काय बोलले?
4
यूपी, बंगालसह १५ राज्यांतील विधानसभेच्या ४८ जागांसाठी रंगणार पोटनिवडणूक, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला  
5
महाराष्ट्राबरोबरच झारखंडमध्येही वाजलं निवडणुकीचं बिगुल, दोन टप्प्यांत होणार मतदान 
6
Rohit Sharma Records, IND vs NZ 1st Test: रोहित शर्माचे फक्त ५ षटकार अन् बनणार भारताचा 'सिक्सर किंग'; या दिग्गजाचा विक्रम धोक्यात
7
Nanded Lok Sabha Bypoll 2024 Date: नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा; निकाल कधी?     
8
आचारसंहिता म्हणजे काय? नियम आणि कधीपासून लागू होते? जाणून घ्या सविस्तर...
9
निवडणूक घोषित होताच अजित पवारांना धक्का; माजी आमदारानं साथ सोडली, महायुतीला फटका
10
100 KM वेगाने धावणाऱ्या ट्रेनच्या आपत्कालीन खिडकीतून चिमुकली बाहेर उडून पडली; पुढे...
11
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून खास रणनीती, या नेत्यांकडे सोपवली विभागनिहाय जबाबदारी 
12
अभिनेते अतुल परचुरे अनंतात विलीन, मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी साश्रूनयनांनी दिला निरोप
13
“विधानसभेलाही मराठवाड्यात मनोज जरांगेंचा इफेक्ट दिसेल, मविआ उमेदवार जिंकतील”: बजरंग सोनावणे
14
Kojagiri Purnima 2024: कोजागरीला गजपूजाविधी व्रत केल्याने होते ऐश्वर्यप्राप्ती; जाणून घ्या विधी!
15
Waaree Energies IPO: ३४ वर्ष जुन्या कंपनीचा IPO येणार; ऊर्जा क्षेत्रात वर्चस्व; कधीपासून गुंतवणूक करता येणार, जाणून घ्या
16
चीन आणि तैवानमध्ये संघर्ष वाढला; १५३ फायटर जेट विमानं तैनात, युद्धासाठी आव्हान
17
Vastu Shastra: श्रीमंतांच्या घरात हमखास सापडतील 'या' सात वस्तू; धनवृद्धीसाठी आजच आणा!
18
मोठी घडामोड! पन्नूच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्याला भारताने केली अटक; अमेरिकेलाही कळविले
19
कौतुकास्पद! सहावीत नापास झाली, पण हार नाही मानली; कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात IAS
20
अपंगत्वाच्या आधारावर MBBS मध्ये प्रवेश रोखता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

पुस्तकांविना विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 4:38 AM

पुरुषोत्तम करवा माजलगाव : शाळा सुरू होऊन विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवणी शिकवली जात असताना विद्यार्थ्यांना अदयाप पुस्तके न मिळाल्याने आपल्याला ...

पुरुषोत्तम करवा

माजलगाव : शाळा सुरू होऊन विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवणी शिकवली जात असताना विद्यार्थ्यांना अदयाप पुस्तके न मिळाल्याने आपल्याला काय शिकवले जात आहे, हे विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नसल्याच्या तक्रारी पालक करत आहेत. शिक्षण विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असून, पुस्तके येऊनही वाटपास टाळाटाळ केली जात आहे.

शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये म्हणून महाराष्ट्र शासनाने सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत मागील अनेक वर्षांपासून पहिले ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांची सोय केली होती. दरवर्षी ही पुस्तके शाळा सुरू होण्यापूर्वीच शाळेकडे पाठवण्यात येत असत. मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद असून, जवळपास सर्वच शाळांनी ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था केली आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी पुस्तके लवकर येऊन विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून पुस्तके वाटप केली होती.

यावर्षी शासनाने शाळा सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केला. यावर्षी शासन मोफत पुस्तके देईल की नाही, असे शिक्षण विभागाला वाटत असताना यावेळीदेखील पुस्तके वेळेवर आली. परंतु शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे आलेली पुस्तके अद्याप वाटप करण्यात आलेली नाहीत. सर्व शाळांनी पहिलीपासून ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे. ऑनलाईन शिक्षण सुरू होऊन दीड महिना उलटला तरी विद्यार्थ्यांना पुस्तके न मिळाल्याने या विद्यार्थ्यांना विनापुस्तकाचे शिक्षण घेण्याची वेळ आली. त्यांच्याजवळ पुस्तक नसल्याने या विद्यार्थ्यांना शिक्षक काय शिकवत आहेत, हे समजेनासे झाले आहे. यामुळे आलेली पुस्तके तत्काळ वाटप करावीत, अशी मागणी एसएफएसआयचे माजी राज्य उपाध्यक्ष शिवाजी कुरे यांनी केली आहे.

--------

विद्यार्थ्यांना पुस्तके नसल्याने शिक्षक ऑनलाईन काय शिकवत आहेत, हे त्यांना कळेनासे झाले आहे. यामुळे ऑनलाईन शिकवून फायदाच नसल्याने पुस्तके तत्काळ वाटप करावीत.

----गणेश लोहिया, पालक

-------

माजलगाव तालुक्यात जिल्हा परिषद व अनुदानित संस्था मिळून २७५ एवढ्या शाळा असून, यात जवळपास ३४ हजार विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप केले जाते. यावर्षी गेल्या वर्षीची पुस्तके जमा करून तीदेखील मुलांना देण्यात येणार आहेत. ही जुनी पुस्तके २० टक्के वाटप करण्यात येणार असल्याने यावर्षी ८० टक्केच पुस्तके मिळालेली आहेत. यावर्षी १ लाख ९८ हजार पुस्तकांचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती या विभागाचे प्रमुख आर. एम. अदमाने व एम. व्ही. कदम यांनी दिली आहे.

------

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांकडून गेल्या वर्षीची पुस्तके संकलित करण्यात आली आहेत. नवीन दोन विषयांची पुस्तके आलेली नसल्याने आम्ही पुस्तके वाटप केली नव्हती. ती पुस्तके या आठवड्यात मिळतील. त्यानंतर सर्व पुस्तके वाटप करण्यात येतील.

-एल. बी. बेडसकर, गटशिक्षणाधिकारी, माजलगाव