शहरं
Join us  
Trending Stories
1
टोलमाफी, २ नदीजोड प्रकल्पांना मंजुरीसह राज्य मंत्रिमंडळाने घेतले १९ मोठे निर्णय
2
Big Breaking: मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर कारला टोलमाफी
3
“CMपदाच्या चेहऱ्यापेक्षा महाभ्रष्ट महायुती सरकार घालवणे महत्त्वाचे”: बाळासाहेब थोरात
4
"सरकारला उशिराने सुबुद्धी, निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता..."; मुंबई टोलमाफीवर राज ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया
5
कोल्हापूर दौरा, अचानक समोर तालमीतला मित्र दिसला, मोहोळांनी गाडी थांबवून गळाभेट घेतली...
6
स्वप्निलला राज्य सरकारकडून २ कोटी! वडील सुरेश कुसाळेंच्या आरोपांनंतर मोठी घोषणा
7
अरे देवा! जेलमध्ये रामलीला, कैद्यांनी केला वानरांचा रोल; सीतेला शोधायला गेले अन् पळाले
8
Reliance Jio नं लाँच केले २ नवे रिचार्ज प्लॅन्स; केवळ १ रुपयाचा फरक, कोणता आहे बेस्ट? 
9
भाजपा खासदाराने आश्रमात घुसून साधूला केली मारहाण, संतप्त अनुयायांचं आंदोलन
10
कॉमेडीशी संबंध नसताना प्राजक्ताला कसा मिळाला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो? आधी नकार दिला पण...
11
'सिंघम अगेन'सोबत 'भूल भूलैय्या ३'ची मोठी टक्कर! अखेर कार्तिक आर्यनने सोडलं मौन; म्हणाला-
12
'दिवसाढवळ्या हत्या होत असतील तर बरोबर नाही, सलमान खानच्या जवळच्यांना सुरक्षा पुरवा'; मंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी
13
“राज्यात एक फूल दोन हाफ सिंघम, मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द खरा करावा”; संजय राऊतांचा हल्लाबोल
14
नीना गुप्तांनी शेअर केला नातीचा गोड फोटो, म्हणाल्या- "माझ्या मुलीची मुलगी..."
15
उद्यापासून आचारसंहिता लागणार? महायुती सरकारची आज शेवटची मंत्रिमंडळ बैठक!
16
चौदाव्यांदा बोनस शेअर देण्याच्या तयारीत 'ही' दिग्गज कंपनी, स्टॉकनं १ लाखाचे केले ४० लाख; जाणून घ्या
17
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची सुरक्षा वाढवली, IB च्या अलर्टनंतर सुरक्षेत बदल
18
पाकिस्तान जिंकू रे देवा, पण...; टीम इंडियाचं सेमीफायनलचं तिकीट 'शेजाऱ्यांच्या' हाती, पाहा गणित
19
बनावट नोटा बनवण्याची ट्रिक सांगून तरुणाला घातला ५.५ लाखांचा गंडा; काय आहे हे प्रकरण?
20
Hyundai Motor IPO मध्ये 'हे' गुंतवणूकदार आजपासून करू शकतात गुंतवणूक, ग्रे मार्केटमध्ये स्टॉक आपटला

बॅंकेतील पैसे सांभाळा, ‘केवायसी’च्या नावाखाली होऊ शकते फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 4:23 AM

प्रभात बुडूख बीड : मोबाइलचा वापर वाढल्याने नेट बँकिंगचे प्रमाणदेखील वाढले आहे. यासाठी शासनाकडूनदेखील प्रोत्साहन देण्यात आले होते. दरम्यान, ...

प्रभात बुडूख

बीड : मोबाइलचा वापर वाढल्याने नेट बँकिंगचे प्रमाणदेखील वाढले आहे. यासाठी शासनाकडूनदेखील प्रोत्साहन देण्यात आले होते. दरम्यान, विविध प्रकारे बँकेसंदर्भातील माहिती विचारून घेत लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे बँकेतील पैसे लंपास होऊ नयेत यासाठी योग्य ती काळजी सर्वांनी घेणे गरजेचे आहे.

मोबाइलवर अनोळखी फोनद्वारे अनेकांच्या बँक खात्यातली रक्कम गायब झाल्याचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचा सर्वाधिक समावेश आहे. यावेळी बँकेतून बोलत असून, तुमच्या खात्यासंदर्भात माहिती द्यावी असे सांगून त्यांच्या खात्यातून पैसे वळते करून घेतल्याचे प्रकारदेखील घडले आहेत. या प्रकरणांचा तपास सायबर विभागाकडून केला जात असून, काही प्रकरणांत आरोपींना पकडण्यात त्यांना यशदेखील आले आहे. मात्र, अशा प्रकारे फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वेळोवेळी बँक व पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

प्रकरण १

एका विद्यार्थिनीला ‘फोन पे’ या ॲपच्या कस्टमर केअर सेंटरमधून बोलत असल्याचा फोन आला होता. त्यानंतर त्या विद्यार्थिनीने पैसे पाठविण्यासाठी येत असलेल्या अडचणी पुढील व्यक्तीला सांगितल्या. दरम्यान, त्याने सर्व माहिती विचारून घेत तिच्या खात्यावरून ४५ हजार रुपये वळते करून घेतले. हा कस्टमर केअर नंबर गुगलवरून त्या विद्यार्थिनीने घेतला होता. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

प्रकरण २

तुमच्या बँकेतून बोलत आहे. शासनाच्या नवीन नियमानुसार खाते अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी आपले एटीएम कार्ड नंबर व बँक डिटेल्स पाहिजे असल्याची विचारणा करून एका शेतकऱ्याची ५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला होता. बँकेत गेल्यानंतर खात्यावरील रक्कम लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले होते.

प्रकरण ३

विविध तीन बँकेच्या खात्यातून ७५ हजार रुपये काढून घेतले होते. ही घटना बीड व अंबाजोगाई येथे घडली होता. एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या खात्यातून ही रक्कम वळती कशी झाली, हे उघड झाले नाही. यासंदर्भात त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस करीत आहेत.

गेलेले पैसे परत मिळणे कठीण

फोनद्वारे बँक डिटेल्स विचारून केलेल्या फसवणुकीतील पैसे परत मिळविण्यासाठी संबंधितांना बँक, पोलीस ठाण्याच्या अनेक चकरा माराव्या लागतात. मात्र, या प्रकरणांमध्ये पैसे परत मिळण्याची शक्यता नसते, तर एटीएम क्लोनिंग व इतर काही प्रकरणांत मात्र बँकेकडून पैसे परत मिळालेले आहेत.

नागरिकांनी कोणत्याही अनोळखी नंबरवरून फोन आल्यानंतर बँकेसंदर्भातील माहिती देऊ नये, तसेच नेट बँकिंगसंदर्भातील खात्याची माहितीदेखील गोपनीय ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन बीड पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.