शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

बीड जिल्ह्यातील धरणे आटली, तहान भागेना; ५४ प्रकल्प मृत साठ्यात, ५२ कोरडे

By शिरीष शिंदे | Updated: May 20, 2024 16:42 IST

बीड जिल्ह्यात मागच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याचा परिणाम आता समोर येऊ लागला आहे.

बीड : एप्रिल व मे महिन्यात पडलेल्या तीव्र उन्हामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणांनी तळ गाठला आहे. १४३ धरणांमध्ये केवळ ४ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. माजलगाव धरणासह ५४ प्रकल्प मृतसाठ्यात गेले असल्याने पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. जून महिन्यात वेळेवर पाऊस येणे आवश्यक आहे.

बीड जिल्ह्यात मागच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याचा परिणाम आता समोर येऊ लागला आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातील लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीपातळी खालावली असल्याने अनेक गाव-वाड्या, तांड्यांवर तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून ६ लाख ४३ हजार लोकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्हा प्रशासनाच्या १० मे रोजीच्या अहवालानुसार जिल्ह्यात ३८२ टँकरच्या माध्यमातून ११ तालुक्यांतील ६ लाख ४३ हजार १०२ लोकांना पाणीपुरवठा केला जात आहे. 

दरम्यान, मागच्या वर्षी पाऊस झाला, परंतु धरणक्षेत्र परिसरात झाला नाही. धरणात पाणीसाठा झाला तर आसपासच्या गावांतील जमिनीतील पाणीपातळी वाढलेली राहते. धरणांमध्ये पाणीसाठा झाला नसल्याने धरण परिसरातील पाणीपातळीसुद्धा खालावली आहे. आता ज्या ठिकाणी जलस्रोत शिल्लक आहे त्याच ठिकाणावरून पाणीउपसा केला जात आहे. सद्यस्थितीला जवळपास सर्व धरणांमधील पाणीसाठा संपत आला आहे. ही बीड जिल्हावासीयांसाठी चिंताजनक बाब आहे.

हवामान विभागाच्या अंदाजामुळे दिलासाहवामान विभागाच्या अंदाजानुसार ३१ मे रोजी माॅन्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. त्यानंतर ७ जून पूर्वीपासूनच पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सध्या माॅन्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाले आले. तसेच बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याचे हवामानतज्ज्ञ सांगत आहे. हवामान विभागाच्या अंदाजामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.

५२ प्रकल्प पडले काेरडेबीड जिल्ह्यातील १४३ पैकी ५२ प्रकल्प कोरडे पडले आहेत तर ५४ पाणी प्रकल्प जोत्याखाली आहे. तसेच २७ प्रकल्पामध्ये २५ टक्के, ७ प्रकल्पामध्ये २५ ते ५० टक्के तर ३ प्रकल्पामध्ये ५० ते ७५ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. कोरड्या पडलेल्या पाणी प्रकल्पातून पाणी काढता येणे शक्य नाही, परंतु जी प्रकल्प जोत्याखाली आहेत, त्यातून थोडाफार पाण्याचा उपसा केला जाऊ शकतो.

उपयुक्त पाणीसाठा ४.७२ टक्केचधरणे मृतसाठ्यात असली तर त्यातील थोडाफार पाणीउपसा केला जाऊ शकतो. जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये आज रोजी ४.७२ ऐवढा उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातील १०.६०६ एवढा दलघमी प्रत्यक्ष पाणीसाठा आहे. त्यातून काही दिवस बीडकरांची तहान भागवली जाऊ शकते. पावसाळा सुरू होणार असल्याने पुढील काळात फारशी गंभीर परिस्थिती निर्माण होणार नाही असा विश्वास अनेकांना आहे. मे अखेरपासून वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात होत असल्याचे अनुभव अनेकांना आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता देखील कमी होईल व पाण्याची चिंता मिटेल, असा आशावाद व्यक्त होत आहे.

प्रकल्प -संख्या-जोत्याखाली-कोरडेमाजलगाव प्रकल्प -१-०मध्यम -५-३लघु -४८-४९एकूण- ५४-५२

टॅग्स :Beedबीडwater scarcityपाणी टंचाईWaterपाणी