शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

खुंटेफळ साठवण तलावाचा प्रश्न गाजला अधिवेशनात; परब यांच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले...

By शिरीष शिंदे | Updated: December 20, 2023 18:48 IST

आष्टी तालुक्यातील खुंटेफळ येथील साठवण तलावाच्या बुडीत क्षेत्रातील ४५ हेक्टर भूसंपादनात गैरप्रकार झाला

बीड: आष्टी तालुक्यातील साठवण तलावाच्या बुडीत क्षेत्रातील ४५ हेक्टर भूसंपादन प्रक्रिया संदर्भातील प्रश्न नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आ. अनिल परब यांनी उपस्थित केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत सांगितले की, सदरील प्रकरणी अनियमितता झाल्याची तक्रार झाली जलसंपदा विभागास प्राप्त झाली होती. परंतु, जलसंपदा विभागाने निवाड्यातील इतर घटकांच्या मूल्यांकनाची फेर तपासणी करून पाटोदा उपविभागीय अधिकाऱ्यांनी सुधारित निवाडा जाहीर केला असल्याचे सांगितले.

आष्टी तालुक्यातील खुंटेफळ येथील साठवण तलावाच्या बुडीत क्षेत्रातील ४५ हेक्टर भूसंपादनात गैरप्रकार झाला असून छत्रपती संभाजी नगर येथील कार्यकारी अभियंत्यांनी भूसंपादित जमीन खरेदी करण्यासाठी ३१ मार्च रोजी ३५ कोटी रुपये निधी वर्ग केला होता. हा निधी बीड जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यासाठी ८ मे रोजी पत्र दिले होते. कार्यकारी अभियंता यांनी १७ कोटी रुपये जमिनीची खरेदी न करता परस्पर वाटप केले. या प्रकाराची चौकशी केली आहे का? संबंधितावर कारवाई करण्याबाबत कोणती कारवाई केली आहे का? असा प्रश्न आ. परब यांनी उपस्थित केला होता. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले की, छत्रपती संभाजी नगर येथील कार्यकारी अभियंता यांनी खुंटेफळ साठवण तलावाच्या बुडीत क्षेत्रातील भूसंपादित जमीन सरळ खरेदी करण्यासाठी ३१ मार्च रोजी मागणीनुसार ३५.०६ कोटी रुपये निधी वर्ग केला आहे. त्या पैकी १७.१५ कोटी रुपये मोबदला मागणी केलेल्या प्रकल्पबाधितांना शासन निर्णयाप्रमाणे निधी वाटप केला आहे.

त्यानंतर भूसंपादन प्रक्रियेबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने तक्रारींची शहानिशा करणे आवश्यक असल्याने सदरील निधी बीड जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग करण्याबाबत नांदूर मधमेश्वर कालवा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना कळविले होते. तसेच हा निधी पाटोदा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे वर्ग करणे योग्य राहील असे छत्रपती संभाजी नगर येथील पाटबंधारे मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता यांनी बीड जिल्हाधिकारी यांना कळविले होते. पुढे, जलसंपदा विभागाने निवाड्यातील इतर घटकांच्या मूल्यांकनाची फेर तपासणी करून पाटोदा उपविभागीय अधिकाऱ्यांनी सुधारित निवाडा जाहीर केला. उर्वरित मावेजा देऊन थेट खरेदीखत करुन भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण झाली असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBeedबीडAnil Parabअनिल परब