शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

तीन पिढ्यांचे समर्पण, तापलेल्या भट्टीजवळ १२ ते १५ तास श्रमातून साकारतो साखरगाठींचा गोडवा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 7:11 PM

होळी आणि गुढीपाडव्याचे वेध लागताच महाशिवरात्रीपासून साखरगाठींच्या कारखान्यांची भट्टी पेटते.

- अनिल भंडारीबीड : होळी आणि विशेषत: गुढीपाडव्याला महत्व असलेल्या साखरगाठी बनविण्याचे काम येथील कारखान्यांमध्ये सुरू आहे. तापलेल्या भट्टीजवळ बारा ते पंधरा तास कामगारांच्या श्रमातून साखरगाठींचा गोडवा शहरातील १५ प्रमुख कुटुंबांसह दीडशेपेक्षा जास्त कामगारांचे कुटुंब चाखत आहेत.

होळी आणि गुढीपाडव्याचे वेध लागताच महाशिवरात्रीपासून साखरगाठींच्या कारखान्यांची भट्टी पेटते. ऐनवेळी कोरोना लॉकडाऊनमुळे २०२०मध्ये साखरगाठी करणाऱ्यांना आर्थिक फटका बसला. २०२१मध्ये दिलासा मिळाला. परंतु विक्री घटली. यंदा तशी परिस्थिती नसल्याने साखरगाठी बनविणाऱ्यांचे धाडस वाढले आहे. बीड शहरात जवळपास १५ कुटुंब साखरगाठीच्या व्यवसायात अनेक वर्षांपासून रमलेली आहेत. एक- दोन कुटुंब तर तीन पिढ्यांपासून कारखाना चालवतात. मजुरांची उपलब्धता, साखर व इंधनाची तजवीज करून कामाला सुरूवात करतात. यामुळे शेकडो लोकांना राेजगाराची सोय झाली आहे.

...तर घामाघूम व्हालकारखान्यात क्षणात घामाघूम होईल, अशी उष्णता पेटलेल्या भट्ट्यांमुळे असते. तापलेल्या भट्टीवर साखरेच्या द्रावणात दूध व लिंबाचा वापर करून पांढराशुभ्र पाक ठराविक तापमानात दोघेे तयार करतात. नंतर इतर कामगार तयार पाक दोऱ्यासह लाकडी साच्यांमध्ये भरतात. काही वेळेत आकाराप्रमाणे साखरगाठी तयार होतात.

१२ तास भट्टीजवळमुख्य कारागिरासह मजूर तापलेल्या भट्टीजवळच १२ ते १५ तास साखरगाठी बनविण्यात व्यस्त असतात. उपलब्ध क्षमतेनुसार साखरगाठींचे दररोज उत्पादन केले जाते. गत काही महिन्यांपासून महागाईचा अंदाज घेत साखरेच्या खरेदीमुळे भाववाढीचा फारसा फरक पडत नसल्याचे संतोष काजळे यांनी सांगितले.

बीडची साखरगाठी परजिल्ह्यातहीबीडमधील उत्पादकांची साखरगाठी शुभ्रतेच्या बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे बीड जिल्हा तसेच औरंगाबाद, जालना, नगर, पुणे बारामती, कुंथलगिरीसह इतरत्र विकली जाते. गतवर्षी बाजाराचा अंदाज घेऊनच गाठीचे उत्पादन केल्याचे रमेश कांबळे यांनी सांगितले.

साखरगाठीची तिसरी पिढीनिजामकाळातील चौथी पास असलेले पेठ बीड भागातील १०५ वर्षांचे सटवाजी यमनाजी कांबळे १५ वर्षांपासून लोकमत वाचतात. ते म्हणाले, आई - वडील साखरगाठी बनवायचे, त्यांच्या हाताखाली काम करायचो. नंतर जबाबदारी आली आणि ती पेलली. आता मुले, नातवंडे कारखाना चालवतात. साखरगाठीसाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. मजुरांची काळजी घ्यावी लागते. कोणताही अपघात होऊ नये म्हणून सावध राहावे लागते. अलिकडच्या काही वर्षात मजूर कमी झालेत. जे मिळतात, ते रोजंदारीऐवजी उत्पादनावर मजुरी ठरवतात.

टॅग्स :BeedबीडHoliहोळी 2022