शहरं
Join us  
Trending Stories
1
झिशान सिद्दिकींनाही संपवायचे होते, एक फोन आला आणि ते आत गेले...; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट
2
"रेल्वे अपघात तर होतच राहतात"; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, लोकांनी व्यक्त केला संताप
3
लॉरेन्स बिश्नोई दाऊदच्या वाटेवर; ७०० शूटर्स, ६ देशांमध्ये गुन्हेगारीचे साम्राज्य, NIA कडून आरोपपत्र
4
Baba Siddique : 'गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा', बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणावरुन राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
5
बाबा सिद्दिकींची संपत्ती किती? ईडीने ४६२ कोटींची मालमत्ता जप्त केलेली, सहा महिन्यांपूर्वीच आले राष्ट्रवादीत
6
Baba Siddique : कुरिअरने दिलं पिस्तूल, एडवान्स पेमेंट; बाबा सिद्दिकींच्या हत्येचा बनवला होता 'मास्टर प्लॅन'
7
'नेत्यांची दिवसाढवळ्या हत्या होणं म्हणजे महाराष्ट्रातील गृहखातं फेल'; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र फडणवीसांच्या खात्याला फटकारलं
8
Baba Siddique : लॉरेन्स बिश्नोई गँगने पंजाब जेलमध्ये रचला बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट, अडीच लाखांची सुपारी अन्...
9
Rahul Gandhi : "महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे"
10
आज अजित पवारांच्या स्टेजवर जाणार; काँग्रेसच्या निलंबनानंतर आमदार सुलभा खोडकेंची घोषणा
11
बाबा सिद्दिकींच्या जवळचाच कोणीतरी हल्लेखोरांना माहिती देत होता? पोलिसांना संशय, दोन आरोपी ताब्यात
12
Supriya Sule : "राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा..."; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट
13
कोण होते बाबा सिद्दिकी? ज्यांनी मिटवला होता सलमान आणि शाहरुख खानमधील वाद, बॉलिवूडशी होतं खास कनेक्शन
14
रामलीलामध्ये कुंभकर्णाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा हार्ट अटॅकने मृत्यू, खाली कोसळला अन्...
15
माझ्या गावचा मुलगा, घरकुल नाही आम्ही त्याला चांगले मोठे घर बांधून देणार; अजित पवारांच्या सूरजबाबत मोठ्या घोषणा
16
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर रितेश देशमुखची संतप्त पोस्ट, म्हणाला- "गुन्हेगारांना..."
17
बाबा सिद्दिकींना गोळी लागल्याचे कळताच सलमान, संजय दत्त, शिल्पा शेट्टीची रुग्णालयाकडे धाव
18
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
19
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
20
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ

पस्तीस हजार पशुधनाच्या लसीकरणाचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 4:22 AM

शिरूर कासार : तालुक्यात शिरूरसह एकूण पाच पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत जनावरांना फऱ्या व घटसर्प रोगांच्या संसर्गापासून संरक्षण मिळावे ...

शिरूर कासार : तालुक्यात शिरूरसह एकूण पाच पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत जनावरांना फऱ्या व घटसर्प रोगांच्या संसर्गापासून संरक्षण मिळावे यासाठी लस देण्याची मोहीम पशुवैद्यकीय विभागाने हाती घेतली आहे. पस्तीस हजार पशुधनाचे लसीकरण लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रदीप आघाव यांनी दिली.

पाऊस सुरू झाला की साधारणपणे गाय, म्हैस, बैल आदी जनावरांना फऱ्या व घटसर्प याची लागण होते. जनावरांसाठी घातक ठरून शेतकऱ्यांचेदेखील नुकसान होते. त्याचबरोबर कामाचादेखील खोळंबा होतो. या सर्व बाबी टाळण्यासाठी पशुधन विभागाकडून लसीकरणाची मोहीम हाती घेऊन तिचे कामदेखील शिरूरसह पाच उपकेंद्रांतर्गत सुरू झालेले आहे.

तालुक्यात एकूण आठ दवाखाने असले तरी घाटशिळ पारगाव व ब्रह्मनाथ वेळंब या ठिकाणी जागा रिक्त आहेत. शिरूर येथे डॉ. प्रदीप आघाव व त्यांचे सहकारी, रायमोह येथे डॉ. अंजली बोरघरे व उद्धव खेडकर, खालापुरी येथे डॉ. अनिरुद्ध सावंत, पिंपळनेरला डॉ. सर्जेराव आंधळे, मानूरला सोपान राठोड व जाटनांदूर येथे डॉ. सुदर्शन गीते यांच्या सहकार्याने लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत असल्याचे सांगितले गेले.

तालुक्यात गाय, म्हैस, बैल यांची संख्या ३५,००० इतकी असून या सर्व जनावरांना लस दिली जाणार आहे. फऱ्या आणि घटसर्प हा आजार जनावरांसाठी घातक ठरू शकतो. त्यासाठी आपले पशुधन सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने आपल्या जनावरांचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन डॉ. प्रदीप आघाव यांनी केले आहे.

विशेषत्वाने या गोष्टीचीही काळजी घ्या

सध्या पाऊस सुरू असून हिरवा चारा भरपूर प्रमाणात उपलब्ध असला तरी या कोवळ्या चाऱ्यामुळे जनावरे ढेंडाळणे तसेच पोटफुगीची भीती असते त्यासाठी पशुपालकांनी कोवळ्या हिरव्या चाऱ्यासोबत वाळलेला कडबा, सरमाड असा सुका चारा खाऊ घालणे जरूरी आहे.

त्याचबरोबर जनावरांना गढूळ पाणी, ओढे, नाले व साचलेल्या डबक्यातील पाणी पाजणे टाळावे, अन्यथा काविळीची बाधा जडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली जनावरे ही तलावाभोवती, नदीकाठी चारण्याचा मोह धरू नये, परिणामी पशुधनाच्या आरोग्याला बाधा निर्माण होण्याचा धोका नाकारता येणार नाही. त्यासाठी हे टाळणे हिताचे ठरणार आहे, असे सांगण्यात आले.

सध्या पावसामुळे शेतात वापसा मोड असून शेतकरी व त्यांचे बैल रिकामेच आहेत. अशा वेळी शेतकऱ्यांनी लसीकरण लवकर करून घ्यावे, असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रदीप आघाव यांनी केले आहे.

200721\img-20210714-wa0064.jpg

लसिकरण करतांना डॉ प्रदिप आघाव