शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

माजलगावात तीन कारखान्यांनी केले साडे चौदा लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 6:57 PM

तालुका परिसरात असलेल्या सुंदरराव सोळंके, जय महेश व छत्रपती या तीन साखर कारखान्यांनी शुक्रवार (ता. २४)पर्यंत एकूण १४ लाख ५५ हजार ५४६ मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे.

माजलगाव (बीड ) : तालुका परिसरात असलेल्या सुंदरराव सोळंके, जय महेश व छत्रपती या तीन साखर कारखान्यांनी शुक्रवार (ता. २४)पर्यंत एकूण १४ लाख ५५ हजार ५४६ मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे. यातून १४ लाख ७ हजार ४५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. सरासरी साखर उताऱ्यात जय महेश कारखाना आघाडीवर असून परिसरात अद्यापही २५ टक्के शेतकऱ्यांचा ऊस फडातच उभा आहे. 

सतत चार वर्ष दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील दोन वर्षापासून पावसाने मोठा दिलासा दिला आहे. समाधानकारक झालेल्या पावसाने पैठण, माजलगाव धरण शंभर टक्के भरले. दोन्ही धरणाचे कालवे, माजलगाव धरणाचे बँकवाटर, गोदावरी, सिंदफणा नदीवरील उच्चपातळी बंधारे, उर्ध्वकुंडलीका प्रकल्प यातील मुबलक पाण्याच्या उपलब्धतेमुळे परिसरातील शेतकरी पुन्हा एकदा ऊस उत्पादनासाठी पुढे सरसावला असून मोठ्याप्रमाणात ऊस लागवड झाली आहे.

माजलगाव परिसरातील ऊस गाळप करण्यासाठी तेलगाव येथील लोकनेते सुंदरराव सोळंके, सावरगाव येथील छत्रपती तर, पवारवाडी येथील जय महेश हे तीन साखर कारखाने यावर्षी पूर्णक्षमतेने सुरु आहेत. शुक्रवार (ता. २४) पर्यंत वरील तिन्ही कारखान्याने एकूण १४ लाख ५५ हजार ५४६ मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले असून १४ लाख ७ हजार ४५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. वरील तिन्ही कारखान्यापैकी जय महेशचा साखर उतारा सर्वाधिक (१०.०३) असून शेतकऱ्यांचे ऊसाचे बिल वेळेवर देण्यात छत्रपती कारखाना आघाडीवर आहे. 

तीन कारखान्याचे गाळप :

कारखान्याचे नाव        -   ऊस गाळप   - साखर उत्पादन  -  सरासरी उतारा

सुंदरराव सोळंके कारखाना - ५,४९,५०० मे.ट. - ५,१४,६५० क्विंटल - ९.४६ टक्केजय महेश कारखाना -     ६,८५,६३५ मे.ट. - ६,७७,८०० क्विंटल – १०.०३ टक्के छत्रपती कारखाना     -   २,२०,४११ मे.ट. – २,१५,००० क्विंटल – ९.९० टक्के

गेटकेनमुळे कार्यक्षेत्रातील ऊस फडातच वरील तिन्ही कारखानदारांनी गाळप हंगामाच्या सुरुवातीला गेटकेनचा (बाहेरचा) ऊस आणण्यावर भर दिला. दोन महिने सर्वाधिक तोडणी यंत्रणा बाहेर असल्याने कार्यक्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस आजही फडातच उभा आहे. गाळपाच्या प्रतीक्षेत असलेल्या ऊसाचे पाणी तोडल्याने वजनात घट होत असून शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेBeedबीड