शहरं
Join us  
Trending Stories
1
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
2
'एक्झिट पोलमुळे लोकांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा...' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना प्रश्न
3
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
4
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
5
"निवडणूक एका टप्प्यात, आता ते सुद्धा एकाच टप्प्यात...", जयंत पाटलांचा महायुतीला टोला
6
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
7
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल
8
70 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या बाईक आणि स्कूटर... दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा बेस्ट ऑप्शन!
9
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...
10
पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
12
कोण होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?; निवडणुकीसाठी बनवली समिती, जाणून घ्या प्रक्रिया
13
"तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय..."; फडणवीसांचं नाव घेत मनोज जरांगे काय बोलले?
14
या गंभीर आजाराने ग्रस्त आहे आलिया भट, खुद्द स्वतःच 'जिगरा' स्टारने केला खुलासा
15
Kamran Ghulam चा शतकी नजराणा! पदार्पणात असा पराक्रम करणारा पाकचा दुसरा वयस्क बॅटर
16
'इन्फ्लुएन्सर्स' हा नवा आजार आला आहे...अभिनेत्री सीमा पाहवा भडकल्या; ही कोणाची चूक?
17
टाटा समूहाची मोठी घोषणा, पुढील पाच वर्षात 5 लाख तरुणांना नोकऱ्या देणार
18
रिस्क नकोच! आपल्या स्टार गोलंदाजाबद्दल Rohit Sharma अगदी स्पष्टच बोलला!
19
यूपी, बंगालसह १५ राज्यांतील विधानसभेच्या ४८ जागांसाठी रंगणार पोटनिवडणूक, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला  
20
महाराष्ट्राबरोबरच झारखंडमध्येही वाजलं निवडणुकीचं बिगुल, दोन टप्प्यांत होणार मतदान 

राखी पौर्णिमेमुळे ट्रॅव्हल्सची भाडेवाढ, मुंबईसाठी आता ८०० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 4:38 AM

प्रभात बुडूख बीड : कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्यानंतर बीड जिल्ह्यातून वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. त्यामुळे पुणे - ...

प्रभात बुडूख

बीड : कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्यानंतर बीड जिल्ह्यातून वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. त्यामुळे पुणे - मुंबई व इतर शहरात जाणाऱ्यांची संख्यादेखील वाढली आहे. दरम्यान, राखी पौर्णिमेच्या सणानिमित्त ट्रॅॅव्हल्सचीदेखील भाडेवाढ झाली असून, मुंबईसाठी ७०० ते ८०० रुपये आकारले जात आहेत, तर पुण्यासाठी ५०० ते ६०० रुपये तिकीट आहे.

कोरोनामुळे प्रवासी वाहतूक बंद होती. त्या काळात ट्रॅव्हल्स चालकांना मोठे नुकसान सहन करावे लागले. दरम्यान, रुग्णसंख्या कमी झाल्याने प्रवासासाठी पुन्हा मुभा देण्यात आली आहे. या काळात डिझेल दरवाढ झाल्यामुळे प्रवासी वाहतूक दरदेखील जवळपास १०० ते १५० रुपयांनी वाढवले आहेत. सणासुदीच्या दिवसांत प्रवासी संख्या लक्षात घेत ही दरवाढ कमी जास्त होते. गर्दी जास्त असेल तर, भाव काही प्रमाणात वाढवले जात असल्याचे चित्र आहे.

या मार्गावर ट्रॅव्हल्स भाडेवाढ

मार्ग आधीचे भाडे आता

बीड ते मुंबई ५०० ते ६०० ७०० ते ९००

बीड ते पुणे ३५० ते ४०० ५०० ते ६००

ट्रॅव्हल्सची संख्या दुप्पट

१ बसस्थानकातून पुणे, मुंबईसाठी बस आहेत. मात्र, रात्रीच्या वेळी आरामदायी प्रवास करण्यासाठी ट्रॅव्हल्सकडे नागरिकांचा कल असल्याचे चित्र आहे.

२ ट्रॅव्हल्सच्या संख्येतदेखील दुपटीने वाढ झाली असून, कोरोनामुळे अनेक ट्रॅव्हल्स मालकांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागला होता. आता वाहतूक सुरळीत झाल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

डिझेल दरवाढीमुळे भाडेवाढ

लॉकडाऊनपूर्वी डिझेलचे दर व वाहतूक सुरळीत झाल्यानंतर वाढलेले डिझेलचे दर यामुळे प्रवासी वाहतूक दर वाढवण्यात आलेले आहेत. तसेच प्रवासीदेखील पूर्वीपेक्षा कमी आहेत. त्यामुळे शासनाने आमच्या मागण्यांकडे लक्ष देत प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी कायम ठेवावी.

ट्रॅव्हल्स मालक, बीड