शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

माजलगाव धरणाची १ मीटरने वाढली पाणीपातळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 18:30 IST

मृतसाठ्याबाहेर येण्यासाठी दोन फुट पाण्याची आवश्यकता

ठळक मुद्देधरण मृतसाठ्यात असून 120.40 द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा आहे. धरण भरण्यासाठी 431.80 मिटर एवढे पाणी लागते.

माजलगाव :  माजलगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील बीड, वडवणी व शिरूर कासार परिसरात सोमवारी झालेल्या अतिवृष्टी झाली. त्यामुळे धरणात मोठ्याप्रमाणावर पाण्याची आवक व्होउन पाणी पातळी १ मीटरने वाढली आहे. तरीही धरण मृतसाठ्यातून बाहेर पडण्यासाठी आता केवळ 2 फुट अंतर राहिले आहे.

माजलगाव धरण पावसाळा संपत आला असतांना ही मृतसाठ्यातच होता. यावर्षी धरण भरेल ही आशाच शेतकर्‍यासह सर्वसामान्यांनी सोडली होती. मात्र परतीच्या पावसावर निदान मृतसाठ्याच्यावर पाणी पातळी वाढेल ही आशा होती. सोमवार दि.23 रोजी माजलगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बीड, वडवणी व शिरूर कासारसह परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे दिलासा मिळाला आहे. या पडलेल्या पावसामुळे 12 तासात माजलगाव धरणाची पाणी पातळी 1 मिटरने वाढली असून आत्ता मृतसाठ्यातून बाहेर येण्यासाठी 2 फुट अंतर राहिले आहे.

मंगळवारी दुपारी 2 वाजे दरम्यान धरणाची पाणी पातळी 425.38 मिटर झाली असून मृतसाठ्यातून बाहेर येण्यासाठी 426.11 मिटर पाणी पातळी आवश्यकता आहे. धरण भरण्यासाठी 431.80 मिटर एवढे पाणी लागते. तर आणखी धरण शंभर टक्के भरण्यासाठी 6.42 मिटर एवढी पाणी पातळी वाढणे आवश्यक आहे. सध्या धरणाची पाणी पातळी मृतसाठ्यात असून 120.40 द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा आहे. धरणाची पाणी पातळी  6.92 टक्के खालावलेलीच आहे. सध्याचे परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने व हवामान खात्याने परतीचा पाऊस मुसळधार असल्याचा अंदाज सांगीतला आहे. त्यामुळे निश्‍चितच माजलगाव धरण भरेल अशी आशा शेतकरी वर्गासह सर्वसामान्यांना लागली आहे. यापूर्वी माजलगाव धरण अनेक वेळा परतीच्या पावसाने दोन-तीन दिवसात भरल्याले आहे.

टॅग्स :Majalgaon Damमाजलगाव धरणRainपाऊसBeedबीड