शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
2
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
3
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
4
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
5
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
6
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
8
रोहित की गंभीर? कानपूर टेस्टमध्ये ट्विस्ट आणण्यात नेमकं कुणाचं डोकं?
9
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
10
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
11
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
12
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ
13
'घड्याळ' चिन्हाबाबत आजही सुनावणी झालीच नाही; सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख
14
“आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मनोज जरांगे असतील”; तिसऱ्या आघाडीतील नेत्याचे मोठे विधान
15
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला
16
"तुझ्या भावाकडून सुंदर मूल हवंय"; दिरासोबत पळून गेली बायको, नवरा म्हणतो, मला वाचवा कारण...
17
'219 मंदिरांची विटंबना, मूर्तींची तोडफोड', उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा धक्कादायक दावा
18
"लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून फडणवीस यांनी केला समतेच्या मूल्याचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी 
19
जय शाहांचा वारसदार कोण होणार? BCCI सचिव पदासाठी आशिष शेलारांसह 'ही' ४ नावं चर्चेत
20
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण

चिखल तुडवत पालकमंत्र्यांनी केली नुकसानीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2021 4:35 AM

आष्टी : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी सकाळी ...

आष्टी : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी सकाळी आष्टी तालुक्यातील मराठवाडी या जिल्ह्याच्या टोकाच्या गावापासून दौऱ्याला सुरुवात केली. पालकमंत्री मुंडे यांनी अवघड जागेतून वाट काढत, चिखल तुडवत नुकसानीची पाहणी केली. नुकसान झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, असा विश्वास मुंडे यांनी मराठवाडी येथे गावकऱ्यांशी संवाद साधताना व्यक्त केला.

आष्टी तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या मराठवाडी, शेडाळा, देऊळगावघाट, सावरगाव, गंगादेवी या गावांची पाहणी करताना शेतातून वाहून गेलेल्या बाजरी, सोयाबीन, आदी पिकांची शेतांवर जाऊन पाहणी केली. यावेळी आमदार बाळासाहेब आजबे, जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा, उपविभागीय अधिकारी रमेश मुडलोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जेजूरकर, माजी आमदार साहेबराव दरेकर, तहसीलदार राजाभाऊ कदम, डॉ. शिवाजी राऊत, सतीश शिंदे, अण्णासाहेब चौधरी, शिवाजी डोके, महादेव डोके, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, विमा कंपनीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पाहणीनंतर शेतीची, विहिरीची, रस्त्यावरील पुलांची, घरांची पडझड, मोठे नुकसान झाले आहे. लवकरच पंचनामे करून नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याला मदत पोहोचविण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.

नुकसानीचे संयुक्त पंचनामे होणार

आता नुकसानीचे पूर्वीप्रमाणे पंचनामे न करता महसूल, कृषी व विमा कंपनीचे असे तीनही अधिकारी संयुक्तपणे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करतील. त्यानुसार जास्तीत जास्त भरपाई महाविकास आघाडी सरकारकडून मिळवून देण्यासाठी मी व माझे सहकारी प्रयत्नशील असल्याचे मुंडे यांनी सांगितले.

020921\img-20210902-wa0345_14.jpg~020921\img-20210902-wa0342_14.jpg