शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बीड जिल्ह्यात पाणीबाणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:24 IST

जून ते ३ आॅक्टोबर या १२५ दिवसात जिल्ह्यात केवळ ३३०.९० मिमी पाऊस झाल्याने आगामी दिवसात मोठया प्रमाणात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आतापासून वर्तविली जात आहे. पावसाच्या आशेवर पेरणी, लागवड करणाऱ्या शेतकºयांचा खरीप हंगाम पिकांवरील रोगराई आणि पुरेशा पावसाअभावी वाया गेल्यात जमा आहे.

ठळक मुद्देसर्व प्रकल्पांतील पाणी पिण्यासाठी आरक्षित : ८६ प्रकल्प जोत्याखाली, २१ प्रकल्प कोरडे, उपायांची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जून ते ३ आॅक्टोबर या १२५ दिवसात जिल्ह्यात केवळ ३३०.९० मिमी पाऊस झाल्याने आगामी दिवसात मोठया प्रमाणात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आतापासून वर्तविली जात आहे. पावसाच्या आशेवर पेरणी, लागवड करणाऱ्या शेतकºयांचा खरीप हंगाम पिकांवरील रोगराई आणि पुरेशा पावसाअभावी वाया गेल्यात जमा आहे. १५ आॅगस्टपासून तब्बल ४७ दिवस पाऊस न झाल्याने पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. जिल्हयातील सर्वच धरणातील उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. मात्र उपलब्ध साठादेखील कमी असल्याने आॅक्टोबरनंतर पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याने प्रशासनाला आतापासूनच तयारीला लागावे लागणार आहे. मात्र अद्यापही आॅक्टोबरमध्ये पाऊस होईल या भरवशावर हालचाली सुरु झाल्याचे दिसत नाही. पाऊस नाही, पिके गेली, धरणे कोरडी पडू लागली, पुढचा हंगामही धोक्यात आला अशा परिस्थितीकडे शासनाने गांभिर्याने पाहण्याची वेळ आली आहे.बीड जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान ६६६.३६ मिमी इतके आहे. मागील वर्षी ६०६. ७० मिमी पाऊस झाल्याने पीक परिस्थिती तसेच पाण्याची उपलब्धता होती. परंतु, यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाचा लहरीपणा कायम राहिल्याने गंभीर संकटाची चाहुल शेतकºयांसह सर्वसामान्याला लागली आहे. जिल्ह्यात माजलगाव आणि मांजरा हे दोन मोठे प्रकल्प आहेत. मात्र यंदा माजलगाव धरणात पाणीसाठा नसल्यात जमा आहे. तर मांजरा धरणात १.२१ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. या दोन मोठ्या प्रकल्पांवरच निम्म्या जिल्ह्याची भिस्त आहे. १६ मध्यम आणि १२६ लघु प्रकल्पांतील परिस्थिती डोळ्यात पाणी आणणारी आहे. या पार्श्वभूमीवर नगर पालिका, नगर पंचायतींनी पाणी पुरवठ्यात कपात करणे सुरु केले आहे.पाऊस नसल्याने बाजारही शांतपुरेसा पाऊस न झाल्याचा परिणाम बाजारपेठेवरही झाला आहे. उलाढाल थंडावली असून वर्दळ थांबल्यागत स्थिती पहायला मिळते.थोड्याफार पाण्यावर भाजी पिके घेणाºया शेतकºयांना बाजारात विक्रीसाठी येणे परवडत नसल्याने तेही हवालदिल झाले आहेत.पुरेसे पाणी नसल्याने आहे ती बांधकामे थांबविण्याची वेळ आली आहे. आॅक्टोबरमध्ये पाऊस पडेल या आशेवर आभाळाकडे डोळे लागले आहेत.जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणीसाठामोठे २, मध्यम १६, लघु १२६१ मध्यम व ७ लघु प्रकल्पात २५ ते ५० टक्के१ मोठा ,४ मध्यम, १८ लघु प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी१ मध्यम, ४ लघु प्रकल्पात ७५ टक्क्यांपेक्षा जास्त१ लघुप्रकल्पात ५० ते ७५ टक्के८ मध्यम, ७७ लघु प्रकल्प जोत्याखाली२ मध्यम १९ लघुप्रकल्प कोरडेसध्या उपलब्ध साठा ३७.७५७ दलघमीएकाही प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा नाही

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाई