शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

बिंदुसरेला पाणी वाढले, कर्पराला पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 23:39 IST

सलग दोन आठवड्यापासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचा मुक्काम तर आहेच, त्याचबरोबर अतिवृष्टीचा धुमाकूळ सुरु आहे. रविवारी शहरातून जाणाºया बिंदुसरा नदीची पाणी पातळी वाढल्याने पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.

ठळक मुद्देपावसाचा धिंगाणा सुरूच : अनेक ठिकाणी संपर्क तुटला; पंचनामे करणाऱ्या यंत्रणेलाही पावसामुळे अडथळे

बीड : सलग दोन आठवड्यापासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचा मुक्काम तर आहेच, त्याचबरोबर अतिवृष्टीचा धुमाकूळ सुरु आहे. रविवारी शहरातून जाणा-या बिंदुसरा नदीची पाणी पातळी वाढल्याने पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. तर दुसरीकडे शहराच्या अंकुशनगर भागातील कर्परा नदीलाही पाणी वाढल्याने उद्भवलेल्या पूर सदृष्य स्थितीमुळे या परिसराचा संपर्क तुटला होता. दरम्यान शनिवारी अतिवृष्टीने झोडपल्यानंतर रविवारी धारुर शहराला पुन्हा पावसाने झोडपले.जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून सर्वच तालुक्यात अवकाळी पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. शनिवारपासून पंचनामे करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली. मात्र पावसामुळे अनेक ठिकाणी अडथळे आले. बीड शहराला पाणीपुरवठा होणारे बिंदुसरा धरण ओसंडून वाहत आहे. शनिवार आणि रविवारी पाली धरण परिसरातील गावांमध्ये झालेल्या पावसामुळे बीड शहरातून जाणाºया बिंदुसरा नदीच्या पात्रात सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अचानक पाणी वाढले. नदीलगतच्या पात्रातच रविवारचा बाजार भरला होता. पाणी पातळीत वाढ झाल्याने अनेकांनी धास्ती घेतली होती. बाभळीची झाडे व झुडुपांमुळे अरुंद पात्रातून वाहणाºया पाण्याची पातळी पुलापासून पाच फूट कमी होती.दरम्यान नगर परिषदेच्या यंत्रणेकडून ध्वनीक्षेपकाद्वारे सावधगिरीचा इशारा देण्यात येत होता, तर पोलीसही वाहतूक सुरळीत करत होते. नदीला वाढलेले पाणी पाहण्यासाठी मुलांसह मोठ्यांनी गर्दी केली होती. पुलावर विक्रीसाठी बसलेल्या आणि बाजारातील विके्रत्यांनीही दुकाने आवरली.कर्पराला दिवसातून दोन वेळा पाणी वाढतेशहरातील अंकुशनगर भागातील कर्परा नदीलाही सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास पाणी वाढले. कपिलमुनी नगर व इतर भागाचा संपर्क तुटला होता. कर्परा नदीला सध्या दररोज दोन वेळा पाणी वाढून पूरसदृष्य स्थिती निर्माण होते. येथील पूल काही वर्षांपासून नादुरुस्त आहे.मध्यभागी खड्डा पडल्यामुळे आणि कठडे वाहून गेल्यामुळे उरलेल्या अरुंद रस्त्यातून वाट काढत नागरिकांना जीव धोक्यात घालून जावे लागते. कर्परा नदीचा पूल व रस्ता पाण्याखाली जाण्याची यंदाच्या पावसाळ्यातील दहावी वेळ असल्याचे परिसरातील रहिवाशांनी सांगितले.बिंदुसरेकाठच्या नागरिकांनी सतर्करहावेबिंदुसरा नदी दुधडी भरु न वाहत आहे. तसेच पुन्हा पाऊस होण्याची शक्यता असून बिंदूसरा नदीपात्राच्या जवळ असलेल्या नागरिकांनी सतर्क रहावे. प्रशासनालाही या बाबत खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या असून शहरी व ग्रामीण भागातील बिंदूसरा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन आ. संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.प्रशासनाने उपाय करावेतपाऊसकाळ असल्याने बिंदुसरा धरण, नदी तसेच कपिलधार परिसरात जलसौंदर्य पाहण्यासाठी काही लोक धाडस करतात. मागील घटना लक्षात घेऊन प्रशासनाने उपाय करण्याची गरज आहे.

टॅग्स :BeedबीडRainपाऊस