शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बीड जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा; १८ विहिरींचे अधिग्रहण, १ टँकर सुरू

By शिरीष शिंदे | Updated: December 30, 2023 16:36 IST

गेवराई तालुक्यातील देवपिंप्रीमध्ये एक टँकर सुरू झाला आहे.

बीड : पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याचा परिणाम आता दिसू लागला आहे. जिल्ह्यातील चार तालुक्यात १८ विहिरी - बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे, तर गेवराई तालुक्यातील देवपिंप्रीमध्ये एक टँकर सुरू झाला आहे.

पाण्याची मागणी वाढत असल्याने जिल्हा परिषदेने १८ विहिरी - बोअरचे अधिग्रहण करण्यात केले आहे. पुढील काळात पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो, असे आता झालेल्या परिस्थितीवरून समजून येत आहे. हिवाळ्याचे दोन व उन्हाळ्याचे चार असे सहा महिने पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. पावसाळ्यात चांगला पाऊस झाला नाही. परिणामी लहान - मोठे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. यामुळे धरण क्षेत्रानजीकची पाणीपातळी वाढलेली नाही. मोठा पाऊस झाला नसल्याने जमिनीची पाणी पातळी खालावली आहे. उन्हाळ्यापूर्वी हिवाळ्यातच ग्रामीण भागात पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. नद्या कोरड्या पडल्या आहेत, तर बोअरचे पाणी आटू लागत असल्याची स्थिती सध्या ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.

...या तालुक्यात झाले अधिग्रहण

पाणीटंचाईची मागणी होत असल्याने जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा यंत्रणेकडून विहीर व बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. बीड तालुक्यातील ६, गेवराई तालुक्यातील ४, वडवणी तालुक्यातील ५ व धारुर तालुक्यातील ३ अशा एकूण १८ गावांमध्ये पाण्याचे स्रोत म्हणून विहिरी व बोअरचे अधिग्रहण झाले आहे.

टॅग्स :BeedबीडWaterपाणी