शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

सुशिक्षित पुन्हा बेरोजगार : कंत्राटी कोरोनायोद्धांच्या नोकरीवर ३१ ऑगस्टला कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 4:38 AM

सोमनाथ खताळ लोकमत न्यूज नेटवर्क बीड : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोरोनाकाळात भरती केलेल्या सर्वच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड आली ...

सोमनाथ खताळ

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोरोनाकाळात भरती केलेल्या सर्वच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड आली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अतिरिक्त संचालकांनी निधीची कमतरतेचे कारण देत सर्वच कंत्राटी कर्मचारी ३१ ऑगस्टला कार्यमुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे हजारो सुशिक्षित पुन्हा बेरोजगार हाेणार आहेत.

मागील दीड वर्षांपासून कोरोनाने राज्यात थैमान घातले आहे. पहिल्यापेक्षा दुसरी लाट अधिक धोकादायक ठरली. लाखो लोकांचा कोरोनाने जीव घेतला आहे. कोरोनाची महामारी पाहता आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी २० जुलै २०२० रोजी मनुष्यबळ वाढविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे सर्वच जिल्ह्यांमध्ये कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये तीन महिन्याचे कंत्राट देऊन शिपाई ते डॉक्टर अशी हजारो पदे भरण्यात आली. परंतु आता अपवादात्मक जिल्हेवगळता इतरत्र रुग्णसंख्या कमी झाल्याचा दावा करत आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडे निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत हे सर्व कंत्राटी मनुष्यबळ कमी करण्याच्या सूचना अतिरिक्त संचालकांनी १७ ऑगस्ट रोजी सर्वच जिल्ह्यांना व्हिसीद्वारे दिल्या आहेत. त्यामुळे राज्यातील हजारो सुशिक्षितांना पुन्हा बेरोजगार व्हावे लागणार आहे.

..

नियमित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सेवेची जबाबदारी

कंत्राटी कर्मचारी कार्यमुक्त केल्यानंतर रुग्णसेवेची जबाबदारी ही नियमित व एनएचएमअंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात येणार आहे. शिपाई ते डॉक्टर या सर्वांना कोरोना महामारीत सेवा द्यावी लागणार आहे. या सेवेबरोबरच नियमित सेवेकडेही दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घेण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्यामुळे आता कामाचा आणि सेवेचा ताण आणखीनच वाढणार आहे.

....

बीडमध्ये सीईओंनी काढले पत्र

संचालकांच्या सूचनेप्रमाणे मनुष्यबळ कमी करण्यासंदर्भात बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी आरोग्य संस्थांच्या प्रमुखांना पत्र काढले आहे. दक्षता घेऊन नियोजन करावे, अशा सूचनाही कुंभार यांनी सर्वांनाच दिल्या आहेत.

...

...तर यंत्रणा कोलमडेल

राज्यात जवळपास सीसीसी, डीसीएचसी, डीसीएच हे कंत्राटी मनुष्यबळावरच सुरू आहे. त्यांना कमी केल्यावर रुग्णसेवेवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. एनएचएमने निधी देण्यास नकार दिला असला तरी जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापन अथवा इतर योजनांमधून निधी जमा करत कंत्राटी लोकांचा पगार देता येऊ शकतो. हे सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. असे झाल्यास ज्या ठिकाणी रुग्णसंख्या जास्त आहे, तेथे मनुष्यबळ कायम राहू शकते.

---

निधीची कमतरता आणि काढलेले पत्र बरोबर आहे. ज्या ठिकाणी कोविड आहे, ज्याठिकाणी खरोखरच गरज आहे, त्याच ठिकाणी कंत्राटी मनुष्यबळ ठेवणार. इतरांना काढणार.

-एन. रामास्वामी, आयुक्त, आरोग्यसेवा महाराष्ट्र