शहरं
Join us  
Trending Stories
1
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
2
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
3
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
4
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
5
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
6
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
7
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
8
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
9
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
10
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
11
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
12
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
13
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
14
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
15
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
16
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
17
आजारी पडू नका; खर्च नाही पेलणार, उपचारावर होणारा खर्च ११.३५% वाढला
18
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
19
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
20
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी

केज तालुक्यात काढणीला आलेला गहू भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 5:37 AM

केज तालुक्यात गुरुवारी मध्यरात्री विजेच्या कडकडाटासह गारांचा अवकाळी पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या गहू, ज्वारी व हरभरा पिकांसह ...

केज तालुक्यात गुरुवारी मध्यरात्री विजेच्या कडकडाटासह गारांचा अवकाळी पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या गहू, ज्वारी व हरभरा पिकांसह आंब्याच्या झाडाचा मोहोर पावसाने झडल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेल्या रब्बी पिकांचे पावसाने झालेल्या नुकसानीने शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र तालुक्यात सर्वत्र दिसून येत आहे.

यावर्षी तालुक्यात पावसाळ्याच्या हंगामात समाधानकारक पाऊस होऊन सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले होते. मुबलक पाणीसाठा झाल्याने रब्बीच्या क्षेत्रात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. रब्बीच्या हंगामातील पिके जोमात येऊन काढणीच्या अवस्थेत असताना अचानक गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास

सुरू झालेल्या अवकाळी पावसाने संपूर्ण तालुक्याला झोडपून काढले. पावसाचे आगमन जोराचा वारा, विजांचा कडकडाट व गारांच्या माऱ्याने झाल्याने शेतात काढलेला हरभरा, काढणीला आलेले गहू, ज्वारी व आंबा याचे मोठे नुकसान झाले आहे. रात्रीच्यावेळी अचानक वादळ वाऱ्यांसह आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती.

===Photopath===

190221\deepak naikwade_img-20210219-wa0019_14.jpg