शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
2
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
3
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
4
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
5
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
6
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
7
रोहित की गंभीर? कानपूर टेस्टमध्ये ट्विस्ट आणण्यात नेमकं कुणाचं डोकं?
8
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
9
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
10
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
11
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ
12
'घड्याळ' चिन्हाबाबत आजही सुनावणी झालीच नाही; सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख
13
“आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मनोज जरांगे असतील”; तिसऱ्या आघाडीतील नेत्याचे मोठे विधान
14
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला
15
"तुझ्या भावाकडून सुंदर मूल हवंय"; दिरासोबत पळून गेली बायको, नवरा म्हणतो, मला वाचवा कारण...
16
'219 मंदिरांची विटंबना, मूर्तींची तोडफोड', उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा धक्कादायक दावा
17
"लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून फडणवीस यांनी केला समतेच्या मूल्याचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी 
18
जय शाहांचा वारसदार कोण होणार? BCCI सचिव पदासाठी आशिष शेलारांसह 'ही' ४ नावं चर्चेत
19
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण
20
"तुम्ही लोक एखाद्याला...", पत्रकाराचा 'तो' प्रश्न ऐकताच पाकिस्तानी खेळाडू इफ्तिखार संतापला!

गुटगुटीतपणा गोंडस नव्हे, तर आरोग्यासाठी धोकादायक, मुलांची वेळेत काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2021 4:39 AM

अविनाश मुडेगावकर / लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : ग्रामीण भागात खेड्यापाड्यांत कुपोषण वाढत असताना शहरी भागात मात्र ...

अविनाश मुडेगावकर /

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : ग्रामीण भागात खेड्यापाड्यांत कुपोषण वाढत असताना शहरी भागात मात्र अतिपोषण ही समस्या निर्माण झाली आहे. कोरोनामुळे मुलांना घराबाहेर जाता येत नाही. टीव्ही आणि मोबाइलमध्येच मुलांचा खूप वेळ जातो. दिवसभर घरी असल्याने सतत जंक फूड, चॉकलेट, थंड पेये, वेफर्स, असे पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढले आहे. शाळा, मैदानी खेळ बंद असल्याने व्यायाम थांबला आहे. त्यामुळे लहान मुलांमधील स्थूलता चिंतेचा विषय बनला आहे.

स्थूलतेमुळे लहान वयातच मुलांमध्ये अतिरिक्त उष्मांक, कोलेस्टेरॉल, रक्तदाब, अशा समस्या निर्माण होऊ शकतात. विशेषत: ८ ते १५ या वयोगटातील मुलांमध्ये जंक फूड खाण्याचे प्रमाण जास्त असते.

आहारातून शरीराला आवश्यक सर्व पोषक तत्त्वे योग्य प्रमाणात मिळणे आवश्यक असते. पोषक तत्त्वे कमी प्रमाणात किंवा अतिप्रमाणात मिळाल्यास त्याचा परिणाम शरीराच्या वाढीवर होतो. त्यामुळेच मुलांमध्ये कुपोषण किंवा अतिपोषण होते.

...

स्थूलता ही नवी शहरी समस्या

शहरातील कुटुंबांमध्ये बरेचदा आई-वडील दोघेही नोकरी करणारे असतात. आर्थिक सुबत्ता असल्याने मुलांचे सर्व हट्ट पालकांकडून पूर्ण केले जातात.

मॅगी, चिप्स, पिझ्झा, बर्गर, कोल्ड्रिंक, पास्ता, असे नानाविध पदार्थ हॉटेलमधून ऑर्डर करण्याची क्रेझ लॉकडाऊन काळात बरीच वाढली आहे.

..

पालेभाज्या, फळे पाहून मुले नाक मुरडतात. मुले पूर्ण वेळ घरात असल्याने त्यांचा वेळ चांगला जावा, म्हणून पालक त्यांचे खाण्या-पिण्याचे सर्व हट्ट पुरवतात. त्याची परिणती मुलांचे वजन वाढण्यात होत आहे.

...

पोषक घटक हवेत

मुलांची उंची, वय, वजन यानुसार शरीराची पोषक घटकांची गरज ठरते. त्यामुळे आहारात जास्तीत जास्त नैसर्गिक पदार्थांचा समावेश असणे आवश्यक असते.

पदार्थांमध्ये रंग, रूप, चवीचे वैविध्य राखल्यास मुले आवडीने पौष्टिक अन्न खातात.

...