शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'आता शेती कराव की मराव'; ७२० किलो डाळींब विक्रीतून आले केवळ २३३ रुपये 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 18:41 IST

पाणी उपलब्ध नसतानाही शेततळ्याच्या माध्यमातून फळबाग जोपासली.

- नितीन कांबळे 

कडा : तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर डाळिंब उत्पादक शेतकरी आहेत. कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर बागा बहरल्या आहेत. अतिवृष्टीतही शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने बागांची निगा राखल्याने फळ चांगली आहेत. मात्र, दर गडगडल्याने ७२० किलो डाळींबाची विक्री करून केवळ २३३ रुपये हाती आल्याने देवळाली येथील शेतकऱ्याने व्यथित मनाने 'शेती कराव की मराव' अशा भावना व्यक्त करत गावाची वाट धरली. 

आष्टी तालुक्यातील देवळाली पानाची या गावची ओळख तशी पानमळ्याची आहे. पण पाणी नसल्याने पानमळे नामशेष झाली आणि आता फळबागाची मोठ्या प्रमाणावर लागवड असलेले गाव आहे. या गावातील रमेश डोके या सुशिक्षित शेतकऱ्याने तीन दिवसांपूर्वी डाळींब तोडणी केली. यातील ७२० किलो डाळींब ३६ कॅरेटमध्ये घेऊन विक्रीसाठी ते सोलापूरच्या बाजारपेठेत गेले. येथे डाळींब विक्रीतून त्यांना 3933 रुपये मिळाले मात्र यातून 3000  रु गाडीभाडे, मापाडी हमाली 701 असे वजा होऊन केवळ 233 रूपयेच हाती आले. जीवाचे रान करून मोठ्या आशेने जपलेल्या डाळींबाच्या विक्रीतून तुटपुंजी रक्कम आल्याने खाली मान घालत डोळ्यातले पाणी व हुंदके लपवत डोके यांनी घराचा रस्ता धरला. पाणी उपलब्ध नसतानाही शेततळ्याच्या माध्यमातून फळबाग जोपासली. पण फळाला योग्य भाव नसल्याने डोके यांना आर्थिक संकट दिसत आहे. यातूनच त्यांनी आता शेती कराव की मरव अशी व्यथा व्यक्त केली.

टॅग्स :FarmerशेतकरीBeedबीडagricultureशेती