शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
2
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
3
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
4
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
5
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
6
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
7
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
8
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
9
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
10
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
11
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
12
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार
13
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
14
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
15
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
16
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
17
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 
18
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
19
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
20
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी

साखरे कुटुंबाच्याविरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घ्या - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 4:23 AM

दिंद्रुड : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील साखरे कुटुंबाची देवदहिफळ शिवारात शेतजमीन आहे. शेतीच्या वादातून साखरे कुटुंबास देवदहिफळ येथील शेतात ...

दिंद्रुड : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील साखरे कुटुंबाची देवदहिफळ शिवारात शेतजमीन आहे. शेतीच्या वादातून साखरे कुटुंबास देवदहिफळ येथील शेतात मारहाण झाल्याची घटना ११ जुलैरोजी घडली होती. या घटनेत विनयभंग व मारहाणीचे दखलपात्र गुन्हे दिंद्रुड पोलिसात दाखल आहेत. शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनी या प्रकरणाची दखल घेत बीड जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांना पीडित कुटुंबाची भेट घेण्याची सूचना दिली होती. या सूचनेवरून आप्पासाहेब जाधव यांनी मंगळवारी सायंकाळी पीडित कुटुंबाची भेट घेत धीर दिला.

पीडित कुटुंबाच्या बाजूने शिवसेना व सरकार असून, आरोपींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे याप्रसंगी जाधव यांनी साखरे कुटुंबांना सांगितले.

रविवारी दुपारी साखरे कुटुंबीय शेतात मशागत करण्यासाठी गेले होते. यावेळी आरोपी सुनील बडे व दिलीप बडे यांनी महिलांच्या अंगावर वाईट हेतूने हात टाकला होता. पीडित महिलेने आरडाओरडा केल्याचा आवाज ऐकून त्यांचे सासू-सासरे तेथे धावत गेले. आरोपींनी त्यांच्या हातातील कोयता कुऱ्हाडीच्या साह्याने महिलेच्या पाठीवर व दिव्यांग शेतकऱ्याच्या हातावर जीवे मारण्याच्या उद्देशाने वार केले असल्याची फिर्यादी महिलेने दिंद्रुड पोलीस ठाण्यात दिली आहे.

आरोपी सुनील सुदाम बडे, दिलीप सुदाम बडे, ज्ञानोबा दौलत बडे, महेश ज्ञानोबा बडे, सुदाम शेषराव बडे व अन्य एक (सर्व राहणार देवदहिफळ) यांच्यावर दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाला दोन दिवस उलटून गेले आहेत, तरी या घटनेतील सर्व आरोपी फरार आहेत. याउलट दिंद्रुड पोलिसात पीडित कुटुंबावरच जाचक कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याचा निषेध म्हणून शिवसेनेच्यावतीने गावातून रॅली काढत दिंद्रुड पोलिसांचा निषेध व्यक्त करण्यात आला. दिंद्रुड पोलीस स्टेशनच्या सपोनि प्रभा पुंडगे यांची शिवसेनाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी भेट घेत झालेल्या प्रकारात योग्य तो न्याय देण्याची मागणी दिंद्रुड पोलिसांना केली.

साखरे कुटुंबाला झालेली मारहाण ही निंदनीय असून, याबाबत शिवसेना पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर आहे. पीडित कुटुंबावर झालेला अन्याय व पोलिसांनी केलेल्या चुकीच्या दाखल गुन्ह्याबाबत आम्ही बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटणार असून, गुन्हे मागे घेण्याची मागणी करणार आहोत. या घटनेचा सर्व अहवाल आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवून साखरे कुटुंबाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

- आप्पासाहेब जाधव, शिवसेना बीड जिल्हाप्रमुख

आरोपींना पकडा, पीडितांना त्रास नको

बीड जिल्ह्यामध्ये एका शेतकरी महिलेवर जमिनीच्या वादावरून तिच्याकडे वाईट दृष्टीने बघायचे आणि तिच्याकडून विषय सुखाची मागणी करण्याचा अत्यंत निंदनीय असा प्रकार घडलेला आहे. यासंदर्भात मी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी बोलले आहे. यातील दोन्ही आरोपी पोलीस असून, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. या आरोपींना पकडण्याबरोबरच त्यांच्या बाकीच्या नातेवाईकांनी त्रास देऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई करणे गरजेचे आहे. यासंदर्भात मी पोलीस अधीक्षकांशीही बोलणार आहे.

डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधान परिषद

130721\2523img_20210713_174023_14.jpg