शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

काम देता का काम? रोजगारासाठी ७५० जणांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2021 4:37 AM

बीड : लॉकडाऊनमध्ये अनेकांचे रोजगार गेले. आता अनलॉकननंतर पुन्हा जिल्हा उद्योजगकता व मार्गदर्शन केंद्रात रोजगार, व्यवसायासाठी गर्दी होऊ लागली ...

बीड : लॉकडाऊनमध्ये अनेकांचे रोजगार गेले. आता अनलॉकननंतर पुन्हा जिल्हा उद्योजगकता व मार्गदर्शन केंद्रात रोजगार, व्यवसायासाठी गर्दी होऊ लागली आहे. चालू वर्षात आतापर्यंत ७५० जणांनी नोंदणी केली असली तरी केवळ सात जणांचेच प्रस्ताव मंजूर झालेले आहेत. इतरांच्या प्रस्तावावर कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या कार्यालयात कायम अडचणींना तोंड द्यावे लागते.

जिल्ह्यात कोरोनामुळे परिस्थिती विस्कळीत झाली होती. व्यवसाय बंद झाले, तर काहींचा रोजगार गेला. यामुळे सुशिक्षत युवकही बेरोजगार झाल्याचे दिसले; परंतु आता कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले. आता व्यापारपेठ आणि इतर परिस्थिती पूर्ववत होऊन व्यवहार सुरळीत होताना दिसत आहेत. हाच धागा पकडून आता युवक व तरुण रोजगाराच्या शोधात धावू लागले आहेत. त्यांना राेजगार देण्यात मात्र, सरकार व प्रशासन कमी पडत असल्याचा आरोप होत आहे.

दोन योजनांमधून लाभ

उद्योग केंद्राकडून पंतप्रधान व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविले जातात. यात शहरी व ग्रामीण, असे वेगवेगळे विभाजन केले जाते, तसेच महिला, युवक यांच्याबाबतही अनुदान दिले जाते. पंतप्रधान रोजगार निर्मितीसाठी ३०० अर्ज आले असून, यातील केवळ ४ मंजूर झाले आहेत, तर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमासाठी ४५० अर्ज आले आहेत. पैकी केवळ ३ मंजूर झाले आहेत. या आकडेवारीवरून उद्योग केंद्रातून रोजगार देण्यासाठी खाेडा घातला जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

--

आमच्याकडून पंतप्रधान व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविले जातात. वेगवेगळ्या घटकांसाठी वेगवेगळे अनुदान आहे. या दोन्ही योजनांसाठी जवळपास ७५० अर्ज आले असून, यातील ७ मंजूर करण्यात आले आहेत. इतरांवर कार्यवाही सुरू आहे.

-कृष्णा पवार, उद्योग निरीक्षक, बीड

--

आतापर्यंत आलेले अर्ज 750

मंजूर झालेले अर्ज 7