शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
2
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
3
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
4
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
5
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
6
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
7
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
9
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
10
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
11
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
13
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
14
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
15
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
16
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
17
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
18
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
19
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
20
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

चिंताजनक ! बीड जिल्ह्यात रुग्णसंख्या घटतेय, मृत्युदर वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2020 4:45 PM

राज्य आणि देशाच्या तुलनेत बीड जिल्ह्याचा मृत्युदर दुप्पट आहे.

ठळक मुद्देपुन्हा पाच बळी, ३१ नव्या रुग्णांची भर

बीड : जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या घटत असल्याने दिलासा मिळत असला तरी मृत्युदर कमी होत नसल्याने चिंता वाढली आहे. मंगळवारी आणखी पाच मृत्युची नोंद झाली. तसेच ३१ नवे रुग्ण आढळले तर ३६ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले. 

जिल्ह्यातील कोरोनाचे मृत्यू रोखण्यात प्रशासन व आरोग्य विभाग पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे. राज्य आणि देशाच्या तुलनेत बीड जिल्ह्याचा मृत्युदर दुप्पट आहे. ते थांबविण्यासाठी प्रशासनाकडून केलेल्या उपाययोजना फोल ठरत आहेत. मंगळवारी आणखी पाच मृत्युची नोंद झाल्याने मृत्युदर ३.१७ टक्के एवढा झाला आहे. यामध्ये आष्टी तालुक्यातील कडा येथील ७५ वर्षीय महिला, बीड तालुक्यातील मुगगाव येथील ७० वर्षीय पुरूष, केज तालुक्यातील सादोळा येथील ६५ वर्षीय पुरूष, माजलगाव तालुक्यातील खरात आडगाव येथील ५५ वर्षीय पुरूष, आष्टी शहरातील ५० वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. आता एकूण मृत्युसंख्या ५०७ एवढी झाली आहे. तसेच मंगळवारी ३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आता एकूण आकडा १५ हजार २ एवढा झाला आहे. दरम्यान, मंगळवारी ७९४ लोकांची चाचणी करण्यात आली. यातील ७६३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ३१ पॉझिटिव्ह आले. यात अंबाजोगाई ६, आष्टी ८, बीड ८, माजलगाव १, परळी ७, शिरूर १ यांचा समावेश आहे. आता एकूण बाधितांचा आकडा १५ हजार ९७९ एवढा झाला आहे.

दिलासा, शिक्षकांत नवा रुग्ण नाहीआतापर्यंत जिल्ह्यातील १० हजार ७१७ शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यातील ११२ शिक्षक कोरोना बाधित आढळले आहेत. मंगळवारी नव्याने एकही शिक्षक बाधित न आढळल्याने दिलासा मिळाला आहे. अद्यापही ५३ अहवाल प्रलंबित आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड