शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शौचालयांची दुरावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 4:11 PM

देशभर स्वच्छ भारत अभियान राबवले जात असताना मात्र परंतु माजलगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शौचालयाची सोयच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

ऑनलाईन लोकमत

 
बीड/ माजलगाव : देशभर स्वच्छ भारत अभियान राबवले जात असताना मात्र परंतु माजलगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शौचालयाची सोयच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जवळपास ५० टक्के शाळांमध्ये शौचालयाची व्यवस्थाच नाही तर जेथे व्यवस्था आहे  ते वापरण्या योग्य नाहीत.   
 
केंद्र व राज्य शासन घरोघर शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहन देत असुन यासाठी करोडो रुपये खर्च करीत आहे. यासोबतच लाखो रुपयांचा निधी जनजागृती करण्यासाठी हि खर्च करण्यात येतो. जिल्हा परिषदेकडुन तर स्वच्छता अभियान राबविण्यासाठी विविध पथकांची नेमणुक करुन उघडयावर शौचास बसणा-यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे स्वतः पथकासोबत राहुन लोकांवर कारवाई करतांना दिसुन येतात मात्र त्यांच्याच अधिपत्याखाली असणा-या माजलगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शौचालयांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. अर्ध्याधिक शाळांमध्ये तर शौचालय नाही आणि जेथे आहे तेथिल शौचालये वापरण्या योग्य नाहीत. 
 
यातच माजलगांव येथील गटशिक्षणाधिका-यांचे पद रिक्त आहे. प्रभारी कारभार असल्याने केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक,शिक्षक यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नाही यामुळेच अत्यंत गरजेच्या शौचालयाच्या सुविधेकडे दुर्लक्ष केले जात आहे. याचा त्रास मात्र शाळकरी मुलांना होत असून त्यांना उघडयावर शौचासाठी जावे लागत आहे. यातून स्वच्छ भारत अभियान राबविण्याची जबाबदारी ज्या जिल्हा परिषदेवर आहे त्यांच्याकडुनच स्वच्छतेला हरताळ फासण्याचा प्रकार होत असल्याचे चित्र आहे. 
 
या बाबत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवा मोंढा चे मुख्याध्यापक जे.सी. देशमाने यांना विचारणा केली असता, आठवडी बाजार शाळेशेजारीच भरत असल्याने कितीही स्वच्छता केली तरी अस्वच्छता होतेच असे सांगीतले.  तसेच प्रभारी गटशिक्षणाधिकारी आर.व्ही. महामुनी यांनी आमच्या सर्व शाळांमध्ये शौचालये बांधलेली असुन त्याचा वापर शंभर टक्के होत आहे. तसेच ती शौचालये अत्यंत स्वच्छ ठेवले जातात असे सांगीतले.