शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Adhik Maas 2020: अधिक मासात करावे दीपदान, जग करूया प्रकाशमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 07:30 IST

Adhik Maas 2020: एक दिवा सहस्त्र दिवे प्रज्वलित करू शकतो. माणसाने त्याच्याकडून प्रेरणा घ्यावी, हा दीपदानाचा आणि दीपदर्शनाचा हेतू.

ठळक मुद्देअधिक मासात भगवान महाविष्णूंच्या पूजनार्थ दीपदान केले जातेज्या व्यक्तीला दान देत आहोत, ती व्यक्ती विष्णू-कृष्ण स्वरूप मानून नमस्कार करावा आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा. 

ज्योत्स्ना गाडगीळ 

रोज सायंकाळी देवापाशी आणि तुळशीपाशी दिवा लावण्याचा आपल्याकडे प्रघात आहे. हा दिवा देवाच्या गाभाऱ्यात उजेड पडावा म्हणून नाही, तर आपल्या मनातील अंधार दूर व्हावा, यासाठी लावला जातो. अधिक मासात भगवान महाविष्णूंच्या पूजनार्थ दीपदान केले जाते आणि 'अंतरीचा ज्ञानदीप मालवू देऊ नको रे' अशी प्रार्थना केली जाते. 

हेही वाचा: Adhik Maas 2020: स्वस्तिक चिन्ह काढा दारी, भगवान विष्णू येतील घरी

दिव्याचे महत्त्व काय आहे?

एक दिवा सहस्त्र दिवे प्रज्वलित करू शकतो. माणसाने दिव्याकडून प्रेरणा घेऊन मी प्रकाशित होईन आणि दुसऱ्यांनाही प्रकाशित करीन. माणसानेही जगातील अंधार हटविण्यासाठी, अज्ञान दूर करण्यासाठी तसेच दैवी विचारांचा प्रकाश पसरविण्यासाटी अखंड जळत राहिले पाहिजे, अशी जीवनदीक्षा दीपक आपल्याला देतो. सतत तेवत्या दिव्याप्रमाणे मनुष्यानेही प्रभूकार्यासाठी सतत प्रकाशित राहिले पाहिजे. श्रीविष्णूंच्या सेवार्थ दीपदान करून आपण आपल्या विहित कार्याचा कायम आठव ठेवला पाहिजे. 

दीपदान कसे करावे :

पुराणात दीपदानाचे वर्णन केले आहे. अधिकमासात पहाटे लवकर उठावे. शितल जलाने स्नान करावे. घरातल्या देवांची पूजा करावी. ज्या जागेवर दीपपूजा करायची ती जागा सारवून किंवा स्वच्छ पुसून घ्यावी. त्यावर सुंदरशी रांगोळी काढावी, पाट किंवा चौरंग मांडावा, त्यावर रंगीत वस्त्र अंथरावे, पाट किंवा चौरंगावरील वस्त्रावर यथाशक्ती गहू किंवा तांदळाची रास ठेवावी. त्यावर हळदीकुंकवाची बोटे लावलेला, पाण्याने भरलेला, आम्रपल्लव किंवा विड्यांच्या पानांने सुशोभित केलेला एक कलश त्या धान्याच्या राशीवर ठेवावा. कलशामध्ये विड्याची दोन पाने, सुपारी व एखादे नाणे ठेवावे. कलशावर ताम्हन ठेवून, त्या ताम्हनात तांब्याचा किंवा धातूचा एक दिवा ठेवावा. हा दिवा शक्यतो तुपाचा असावा. कलशापुढे गणेशाची सुपारी मांडवी, शक्य असेल तर त्या कलशासमोर राधा-कृष्णाची प्रतिमा किंवा लक्ष्मीनारायणाची मूर्ती ठेवावी. सोबत उदबत्ती, निरांजन आणि घंटा ठेवावी. उपासकाने शुचिर्भूत होऊन चौरंगासमोरील पाटावर बसावे. कुलदेवतेचे, माता पिता, गुरु यांचे स्मरण करावे, चौरंगाजवळच निरंजन अथवा समई लावून घ्यावी. मग आचमन करून दीपपूजन आणि दीपदानाचा संकल्प करावा. मग श्रीगजाननाचे, कलशाचे, समईचे, घंटेचे पूजन करावे. कलशावरील ताम्हनात जो दीप प्रज्वलित करून ठेवलेला आहे, त्या दीपाची भक्तिभावाने षोडशोपचारे पूजा करावी. अशी पूजा केलेला तो दीप गरजू व्यक्तीला दान करावा. त्यासोबत वस्त्र, पात्र, तेहतीस अनारसे इत्यादी वस्तू द्याव्यात. तसेच मिठाई, तांबूल विडा व दक्षिणा द्यावी.  ज्या व्यक्तीला दान देत आहोत, ती व्यक्ती विष्णू-कृष्ण स्वरूप मानून नमस्कार करावा आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा. 

दीपदान करताना म्हणावयाचा श्लोक:

आज्यं च वर्तिसंयुक्तं वन्हिना योजितं मया,दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापह।।

त्रैलोक्याचा अंधार दूर करणाऱ्या हे देवाधिदेवा पुरुषोत्तमा, या दिव्याचा तू स्वीकार कर आणि आमच्या आयुष्यातील अंधार दूर कर.

हेही वाचा: Adhik Maas 2020: अधिक मासात विवाहित मुली भरतात, आईची ओटी

टॅग्स :Adhik Maasअधिक महिना