शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

Adhik Maas 2020: भक्त जनों के संकट, क्षण में दूर करे, ओम जय जगदीश हरे। (पूर्वार्ध)

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: October 9, 2020 07:30 IST

Adhik Maas 2020: शिवानंद स्वामींनी जगदिशाला उद्देशून लिहिलेली आरती अतिशय सुरस आणि भावपूर्ण आहे. त्या शब्दांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी अधिक मासाहून चांगले औचित्य कोणते?

ठळक मुद्देआरती समजून उमजून म्हटली, तर आपला आनंद द्विगुणित होता़े. आरती म्हणत असताना, आपण थेट देवाशी बोलत आहोत की काय, असा भास होतो.

ज्योत्स्ना गाडगीळ

आरती म्हणजे आर्तता. आरती म्हणजे प्रार्थना. आरती म्हणजे संवाद. तोही कोणाशी? तर प्रत्यक्ष देवाशी. ती समजून उमजून म्हटली, तर आपला आनंद द्विगुणित होता़े  मात्र, आपण सूर-तालात एवढे रंगून जातो, की आपले आरतीच्या भावार्थाकडे लक्षच जात नाही. मराठीतील अनेक आरत्या आपल्याला तोंडपाठ आहेत. तशीच हिंदी भाषेतील शिवानंद स्वामींनी जगदिशाला उद्देशून लिहिलेली आरतीदेखील अतिशय सुरस आणि भावपूर्ण आहे. ती म्हणत असताना, आपण थेट देवाशी बोलत आहोत की काय, असा भास होतो. त्या शब्दांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी अधिक मासाहून दुसरे चांगले औचित्य कोणते...

ओम जय जगदिश हरे, स्वामी जय जगदिश हरे,भक्त जनों के संकट, क्षण में दूर करे।।

ओंकारशक्तीत सामावलेल्या जगदिशाचा जयजयकार असो. तू आम्हा भक्तांवर आलेले संकट क्षणात दूर करतो. तो क्षण यायला वेळ लागतो, कारण आमच्या संकटकाळी आम्हाला कणखर बनवण्यासाठी तू परीक्षा पाहतोस. परंतु, कितीही झाले, तरी भक्ताला अपयश येऊ देत नाहीस आणि एका क्षणात चित्र पालटून टाकतोस.

हेही वाचा: Adhik Maas 2020: सांगा मुकुंद कुणी हा पाहिला?

जो ध्यावे फल पावे, दु:ख विनसे मनका।सुख संपती घर आवे, कष्ट मिटे तन का।।

देवाने प्रत्येकाची सोय लावून ठेवलेली असते. भक्ताने काही मागण्याआधीच त्याने भरभरून दिलेले असते. तरीदेखील, भक्ताच्या प्रयत्नांना जोड म्हणून तू अनुकूल वातावरण तयार करतोस आणि त्याच्या प्रयत्नांना यश देतोस. प्रयत्नवादी व्यक्ती अपयशाला घाबरत नाही. संकटातही संधी शोधत असते. अशा लोकांचा तू मार्गदर्शक होतोस आणि त्यांना इच्छित फळ देतोस. 

माता पिता तुम मेरे, शरण गहू में किसकी,तुमबिन और न दुजा, आस करू में किसकी।

जो भक्त आपल्या भगवंतामध्ये सर्व नाती शोधतो किंवा प्रत्येक नात्यात भगवंताला शोधतो, तो कधीच एकटा पडत नाही. त्याच्यासाठी 'तुमही हो बंधू सखा तुम्ही' अशीच भगवंताप्रती भावना असते. भगवंत हाच सुख-दुख:चा वाटाड्या होतो. 'सुख सांगावे सकलासी, दु:ख सांगावे देवासी' या उक्तीप्रमाणे, भक्त आपल्या देवाप्रती समर्पित असता़े.  तो सोबत असताना, अन्य कोणाची आस राहतच नाही. भगवंत प्रत्येक रूपात नाते निभावून भक्ताचे आयुष्य परिपूर्ण करतो. 

तुम पुरण परमात्मा, तुम अंतर्यामी, पार ब्रह्म परमेश्वर, तुम सबके स्वामी।।

तुझ्यापासून काहीच लपलेले नाही. एकवेळ जगाशी खोटे बोलू शकतो, स्वत:लाही फसवू शकतो, मात्र, तुझ्याशी काहीच लपवून ठेवू शकत नाही. कारण, माझा उगमच तुझ्यातून झाला आहे. तूच गीतेत म्हणून ठेवले आहेस, `ममै वांशो जीवलोके' अर्थात सृष्टीवरचा प्रत्येक जीव हा तुझाच अंश आहे आणि प्रत्येक जीवाचा सांभाळ करणाराही तूच आहेस. तू पाठीशी असताना, कसलीही भीत वाटत नाही. तुझी सोबत होती, म्हणूनच तर कुरुक्षेत्रावर अर्जुनाचा विजय झाला. आमच्याही संसार रथाचे सारथ्य तुला करायचे आहे. म्हणून हे परमात्मा, अर्जुनासारखे आम्ही तुलाच मागून घेत आहोत. 

तुम करुणा के सागर, तुम पालन कर्ता,में मुरख खल कामी, कृपा करो भर्ता ।।

मनुष्य स्वभाव हा षडविकारांशी जोडलेला आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यामुळे कितीही नाकारले, तरी दुसऱ्या  व्यक्तीबद्दल आमच्या मनात कमी अधिक प्रमाणात असूया, तिरस्कार, राग, द्वेष असतोच. मात्र, तू आमचे अनंत अपराध पोटात घेऊन आम्हाला रोज नवी संधी देतोस. तरी आम्ही मूर्ख तुझे महत्त्व न ओळखता, तुझ्यावरच राग धरतो. आमच्या चुका पदरात घे आणि आम्हाला सद्बुद्धी दे. 

क्रमश:

हेही वाचा: Adhik Maas 2020: अधिक मासात करावे दीपदान, जग करूया प्रकाशमान

टॅग्स :Adhik Maasअधिक महिना