शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

Adhik Maas 2023: अधिक मासात विष्णुसहस्त्रनाम ऐकणे होत नाही? मग चार ओळींचा श्लोक तरी रोज म्हणा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 2:27 PM

Adhik Maas 2023: अधिक मासात विष्णुसहस्त्रनाम म्हणणे, ऐकणे अतिशय फलदायी असते, पण ते शक्य नसेल तर निदान हा चार ओळींचा श्लोक अवश्य म्हणावा. 

काही श्लोक आपल्या रोजच्या म्हणण्यातले असतात, तरीदेखील त्याच्या अर्थाकडे आपले लक्ष जात नाही. केवळ तोंडपाठ असतात म्हणून आणि सवयीचा भाग म्हणून ते नित्यनेमाने म्हटले जातात. तसाच हा भगवान महाविष्णूंची स्तुती आणि वैशिष्ट्ये सांगणारा हा श्लोक आपण रोज म्हणतो. अधिक मासानिमित्त या श्लोकाचा अर्थ समजून घेऊया आणि रोज भक्तिभावे म्हणूया. 

शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम्, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णम् शुभांगम्लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानिगम्यम्, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं।।

'आप लढो, हम कपडे संभालते है' अशी पुळचट भूमिका प्रत्येकाने घेतली असती, तर दुष्टांचा नायनाट आणि सज्जनांचा उद्धार कोणी केला असता? म्हणून गर्दीला मार्ग दाखवायला मार्गदर्शक लागतोच. मोहिमेची अंमलबजावणी करायला नेता लागतोच. शत्रूशी दोन हात करायला सेनापती लागतोच, तसाच आयुष्याला दिशा दाखवणारा गुरु लागतोच. या सर्व भूमिका एकत्रपणे एकहाती सांभाळणारे कुशल दैवत म्हणजे, भगवान महाविष्णू! 

त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचे गुणविशेष या श्लोकात वर्णन केले आहेत. कोणत्याही समूहाचे, कार्याचे नेतृत्त्व करणाऱ्या नेत्याकडे, नायकाकडे हे गुण असले पाहिजेत. भगवान महाविष्णूंना त्यांनी आपले आदर्श मानले पाहिजे.  

शांताकारं - व्यक्ती नुसती शांत असून उपयोगी नाही. अनेकदा वरवर शांत दिसणारी व्यक्ती आतून धुमसत असते, अस्वस्थ असते, चरफडत असते. अशा व्यक्तीची तुलना जिवंत बॉम्बशी केल्यास अतिशयोक्ती होणार नाही. कारण, अशी व्यक्ती स्फोटक ठरू शकते. मात्र, व्यक्ती केवळ शांत `दिसून' उपयोगी नाही, तर ती अंतर्बाह्य `शांत'ही असावी लागते. शांत डोक्याची व्यक्तीच कठीणात कठीण परिस्थिती नियंत्रणात आणू शकते. 

भुजगशयनम् - शांत कोणीही बसेल हो, पण भुजंगाची शय्या, म्हणजे फारच झाले. घरात छोटसे फुरसे आढळले, तरी लोक दहा आकडी सापडल्याचे वर्णन करून फुशारक्या मारतात. सर्पमित्र येऊन भोवऱ्याची दोरी पकडावी, तसे अलगद उलचून घेऊनही जातात. इथे तर शेषराजांवर स्वार होऊन भगवंत कृष्णावतारात नाचत आहेत, विष्णू अवतारात झोपत आहेत. या प्रतिकात्मक रूपकातून महाविष्णूंनी दाखवून दिले आहे, की संकट कितीही मोठे असो, ते गुंडाळून त्यावर स्वार होता आले पाहिजे. संकटकाळातही सहजतेने आयुष्य जगता आले पाहिजे. तरच तुम्ही इतरांना धीर देऊ शकाल. नायकाने घाबरून, डगमगून चालत नाही. तो स्थिर असला, तरच त्याचे अनुयायी त्याचे अनुकरण करणार आहेत. आणि नायकाचे वेगळेपण अधोरेखित होणार आहे, पद्मनाभं सुरेशम्!

विश्वाधारम् गगनसदृशम्- `मजधार में नैया डोले, तो माझी पार लगाए, माझी जो नाव डुबोए उसे कौन बचाए' हीच अवस्था नेतृत्त्वाच्या बाबतीत असते. आजवर, या अखिल विश्वावर एवढी संकटे आली, त्यांचा निभाव लावताना विष्णू डळमळीत झाले नाहीत, उलट त्यांनी विश्वाला आधार दिला म्हणून त्यांना जगद्पालक अशी बिरुदावली मिळाली. पृथ्वीच्या टोकावर कुठेही गेलात, तरी विस्तीर्ण आकाश जसे आपली साथ सोडत नाही, तसे सर्वव्यापक भगवान महाविष्णू गगनसदृश्य आहेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ते आपल्या पाठीशी आहेत. 

मेघवर्णम् शुभांगम् - मेघांसारखी त्यांची श्यामल कांती आहे आणि मेघाप्रमाणेच प्रेमाचा वर्षाव करण्याचे सामर्थ्य आहे. त्यांना पाहून कोणालाही आनंदच होईल, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे, म्हणून त्यांना शुभांगम् म्हटले आहे. 

लक्ष्मीकांतं कमलनयनम् - शब्दश: ज्यांच्या घरात लक्ष्मी पाणी भरते, असे महाविष्णू कामे थांबवून निष्क्रिय झालेले नाहीत, तर त्यांनी जगराहाटीचा व्यवहार सुरू ठेवला आहे. आपल्या कमलनयनांनी, कृपादृष्टीने ते जगाकडे पाहत आहेत. कमलनेत्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, सकारात्मक दृष्टीकोन. कमळ चिखलात उगवते, तरीही सुंदर, टवटवीत असते. चिखलात राहूनही, स्वत:ला डाग लावून न घेता आपले आयुष्य आनंदाने जगते. तसेच नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला संकटातही संधी शोधून सकारात्मक दृष्टीकोन देता आला पाहिजे. 

अशा भगवान विष्णूंच्या दर्शनासाठी योगी, तपस्वी, ऋषी, मुनी, भाविक सदैव धडपडत असतात...योगिभिर्ध्यानिगम्यम्. मात्र, भगवान महाविष्णू केवळ शूर, साहसी आणि सत्याची कास धरणाऱ्या व्यक्तीलाच साथ देतात. म्हणून आपणही त्यांच्या कृपेस पात्र होऊया. साऱ्या विश्वावर कोणतेही संकट आले, तरी ते पार करण्यासाठी लागणारे धैर्य मागुया व या विश्वाचे कल्याण होवो, हे दान पदरात पाडून घेऊया, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. 

टॅग्स :Adhik Maasअधिक महिना