शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
3
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
4
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
5
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
6
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
7
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
8
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
9
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
10
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
11
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
12
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
13
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
14
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
15
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
16
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
17
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी
18
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवायचंय? 'या' नंबरवर मिळेल सर्व माहिती
19
काँग्रेसच्या 'पंजा'ला बांधलेला वाघ अन् शिंदेंनी सोडला बाण; 'दसरा मेळावा' टीझरमध्ये ठाकरे निशाण्यावर
20
"संजय राऊत, आता शिंग फुटली तर..."; राज ठाकरेंच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना इशारा

Adhik Maas 2023: अधिक मासात एकवेळ जेवणाचा नियम पाळला जातो, पण का? जाणून घ्या त्यामुळे होणारे लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2023 12:30 PM

Adhik Maas 2023: १८ जुलै पासून अधिक मास सुरू होत आहे, त्यानिमित्ताने अनेक जण अनेक प्रकारचे संकल्प करतात, त्यापैकीच एक म्हणजे एकभुक्त व्रताचा संकल्प!

यंदा श्रावणाआधी अधिक श्रावण मास येत आहे. त्यालाच `मलमास' किंवा 'पुरुषोत्तम मास' असेही प्रामुख्याने म्हटले जाते. मलमास म्हणजे असा महिना, ज्यात सूर्यसंक्रांत होत नाही. अर्थात,  सूर्याचा राशीबदल होत नाही. अशा अतिरिक्त आलेल्या महिन्याला कोणीही स्वामी नसल्याने 'मलमासाने' भगवान महाविष्णूंना आपली जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्यदेखील केली. म्हणून दर तीन वर्षांनी येणाऱ्या 'अधिक मासाला' भगवान विष्णूंच्या नावे 'पुरुषोत्तम मास' असेही संबोधिले जाते. यंदा १८ जुलै ते १६ ऑगस्ट अधिक श्रावण असणार आहे, त्यानिमित्ताने विविध प्रकारचे संकल्प केले जातात. त्याबाबद्दल पुढच्या लेखात सविस्तर माहिती जाणून घेऊच, तूर्तास एकभुक्त व्रताची माहिती जाणून घ्या. 

एकभुक्त राहणे, म्हणजे दिवसभरातून एकवेळ जेवणे. मुख्यत: चातुर्मासात अनेक जण एकभुक्त राहणे पसंत करतात. मात्र, अधिक मासात एकभुक्त व्रत अंगिकारले, तर ते अधिक फलदायी ठरते, असे हिंदू पंचांगामध्ये लिहिले आहे.

अलीकडच्या काळात, आपण ज्याला 'डाएट' म्हणतो, किंवा आयुर्वेदातील परिभाषेनुसार 'लंघन' म्हणतो, तीच सोय धर्मशास्त्राने व्रत-वैकल्यांच्या नावे करून ठेवली आहे. 

एकभुक्त व्रतामागील हेतू. 

चातुर्मासातील आषाढ, श्रावण, भाद्रपद या तीन महिन्यांत आपल्या देशात पावसाळा असतो. यावेळी पचनशक्ती मंदावलेली असते. त्यामुळे शरीराला व पचनसंस्थेला विश्रांती मिळणे, असा एकभुक्त राहण्यामागे हेतू असतो. या तीन पावसाळी महिन्यांना जोडूनच अधिक अश्विन मास आल्यामुळे आपल्यालाही एकभुक्त राहून आरोग्य व आध्यात्म यांचा मेळ घालता येईल. 

मनावर नियंत्रण : 

'कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है।' असे म्हणतात. अधिक मासाचे फळ मिळावे, असे वाटत असेल, तर अन्नावरील वासना कमी करून आपल्या दैनंदिन कार्यात, पूजे-अर्चेत मन रमवावे, यासाठी हे एकभुक्त व्रत करता येईल. त्यामुळे आपोआपच मनावर नियंत्रण येते आणि त्याग भावना बळावते. 

प्रतिकुल परिस्थितीत तग धरण्याची शिकवण:

सहा महिन्यांपासून आपण सगळेच जण घरी आहोत. एकवेळ, बाहेर पडल्यावर, कामात गुंतल्यावर तहान-भूकेचे भान राहत नाही, परंतु २४ तास घरात असल्यावर उठ-सूट भूक लागत राहते. अकारण वजन वाढते. स्थूलत्त्व येते आणि पोटाला वरचेवर खाण्याची सवय लागते. घरात असताना ही सवय ठीक आहे, परंतु घराबाहेर असताना आपल्याला सतत अन्नपुरवठा कोण करणार आहे? आणि बाहेर जे अन्न उपलब्ध असते, ते शरीराला हितकारक असेलच असे नाही. अशा वेळी, भूकेवर नियंत्रण मिळवता आले पाहिजे. अन्यथा कोणत्याही कामात मन लागणार नाही आणि आपली चिडचिड होत राहील. अशा व्रतांमुळे संयम अंगी बाणला जातो. शिवाय, दुष्काळ, अन्नटंचाई, आर्थिक टंचाई अशा आस्मानी- सुलतानी संकटात तना-मनाने तग धरता येते आणि मीठ-भाकरीवरही तृृप्तता मानता येते. 

Shravan Somwar vrat 2023:महाफलदायी सोळा सोमवारचे व्रत अधिक श्रावणापासून सुरू करायचे की निज श्रावणात ते जाणून घ्या!

जाणिजे यज्ञकर्म : 

जेवायला बसताना आपण एक श्लोक म्हणतो. 'वदनी कवळ घेता.' त्या श्लोकाच्या शेवटी महत्त्वपूर्ण सूचना केली आहे, `उदर भरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म!' म्हणजेच अन्नग्रहण करताना भगवंताचा आठव करा आणि त्याच्या कृपेने आपल्याला सुग्रास भोजन मिळत आहे, याबद्दल त्याचे आभार माना. शिवाय, जे अन्न ग्रहण करत आहात, ते पोटाची किंवा मनाची तृप्ती व्हावी यासाठी नाही, तर हा एक यज्ञ आहे असे समजा आणि अन्न ही त्या यज्ञातील आहुती समजून, गरज आहे तेवढेच ग्रहण करा. तरच, त्या अन्नाचे ऊर्जेत रुपांतर होऊन, ती ऊर्जा दिवसभरात चांगल्या कामासाठी वापरली जाईल. 

पोषणकर्ता महाविष्णूंना एकवेळचे जेवण समर्पित :

सृष्टीचालक भगवान महाविष्णूंना मुंगीपासून हत्तीपर्यंत सर्व जीव-जीवांचे पोषण करायचे असते. त्यांच्या या महत्कार्यात आपला खारीचा वाटा, या भावनेने आपण एकभुक्त राहून आपल्या वाट्याचे एकवेळचे जेवण गरजू व्यक्तीला द्यावे. किंवा एकवेळच्या जेवणाचा शिधा (कोरडे धान्य, तांदूळ, पीठ, तेल, मीठ) द्यावे. एवढ्याशा सेवेने कोणा गरजूचे आशीर्वाद मिळाले, तर ती सेवा भगवान महाविष्णूंच्या चरणी रुजू झाली असे समजावे.

Adhik Maas 2023: 'अधिकस्य अधिकं फलं' अर्थात अधिक मासाचे अधिक फळ पदरात कसे पाडावे? जाणून घ्या!

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलfoodअन्नAdhik Maasअधिक महिना