शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
3
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
4
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
5
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
6
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
7
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
8
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
9
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
10
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
11
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
12
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
13
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
14
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
15
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
16
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
17
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
18
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
19
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
20
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 

समस्त प्रेमवीरांनो, सावधान! तुम्ही ९९ क्लबचे सभासद होऊ नका! - गौर गोपाल दास

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 5:24 PM

तुमच्या नात्यात दुफळी माजण्यासाठी कोणतेही १ कारण पुरेसे ठरते. तुमचे प्रेम हिरावून घेवू शकते. त्या कलहाला आमंत्रण देऊ नका. अन्यथा जे आहे तेदेखील गमावून बसाल. 

प्रेम ही अतिशय सुंदर भावना. जपून वापरली तर आयुष्यभराचा आनंद. परंतु त्याला अपेक्षा जोडली गेली, की प्रेमाचा अंत होतो आणि वादाला तोंड फुटते. प्रेम संपुष्टात येण्याची अनेक कारणे आहेत, पैकी एका कारणाकडे लक्ष वेधून घेताना प्रख्यात व्याख्याते गौर गोपाल दास एक गोष्ट सांगतात आणि सावधही करतात, की तुम्ही त्या गोष्टीचा एक भाग बनू नका. ती गोष्ट कोणती ते पाहू.

एकदा एक राजा आपल्या प्रधानासह राज्याचा फेरफटका मारण्यासाठी वेषांतर करून निघाला. राज्यात सगळी आलबेल होती. समाजव्यवस्था सक्षम होती. संरक्षणव्यवस्थाही चोख होती.  राजा समाधानाने पुढे जात असताना एक कुटुंब त्याच्या नजरेस पडले. तिथे नवरा बायको दोघेही गाणी गात आनंदाने कुंभारकाम करत होती. गरीब कुटुंब असूनही त्यांच्या घरात एवढा आनंद पाहून राजा प्रधानाला म्हणाला, माझ्याकडे सगळे वैभव असूनही माझ्या घरात आनंद नाही तेवढा आनंद या गरीब कुटुंबात कसा?प्रधान म्हणाले, राजन, कारण हे कुटुंब अजून ९९ व्यवस्थेचे सभासद नाहीत. राजा गोंधळला. प्रधान म्हणाला, आपण मला ९९ सुवर्णमुद्रा द्याव्यात. त्या मी या गरीब घरात देण्याची व्यवस्था करतो. त्यानंतर सहा महिने या कुटुंबाचे निरीक्षण करा आणि फरक बघा.

राजाने प्रधानाला सुवर्ण मुद्रा दिल्या. प्रधानाने एका रात्री त्या घराच्या दारासमोर सुवर्ण मुद्रांची थैली ठेवली. दुसऱ्या दिवशी सकाळी कुंभार बाहेर आला तर त्याला ती थैली दिसली. त्याने थैलीत डोकावून पाहिले. तो चक्रावला. पटकन आत गेला, दार लावले, मोहरा मोजल्या. ९९ मोहराच कशा? देणाऱ्याने १०० मोहरा दिल्या असल्या पाहिजेत. कदाचित उत्सुकतेमुळे माझा हिशोब चुकत असावा. असे म्हणत त्याने बायकोला मोहरा मोजायला दिल्या. तिनेही ९९ असल्याचे सांगितले. मुलांना मोजायला लावल्या त्यांनीही ९९ असल्याचे सांगितले. कुंभार बेचैन झाला. सुवर्ण मोहरा मिळाल्याचा आनंद होताच, पण एक मोहोर कमी असल्याने तो अस्वस्थ झाला. इरेला पेटला आणि एक मुद्रा कमवून १०० चा आकडा पूर्ण करण्याचा त्याने चंग बांधला.

तो दिवस रात्र मेहनत करून, रक्ताचे पाणी करून पैसे कमवत असे. १ मुद्रा कमवण्याच्या नादात तो वेडापिसा झाला. १ मुद्रा कमवणे त्याच्या आवाक्याबाहेरचे होते. हे जाणून त्याच्या बायकोने विचार केला, लक्ष्मी दाराशी आली आहे तर तिचा उपभोग घ्यायचा सोडून नवरा दु:खं करत बसला आहे. आपण मात्र तसे करायचे नाही. सुख मिळाले आहे तर उपभोगायचे. असे ठरवून तिने दोन मोहरा खर्च केल्या. आईचे पाहून मुलांनीसुद्धा दोन मोहरा खर्च करून चैन केली. कुंभार दर रात्री मोहरा मोजत असल्याने एकाएक चार मोहरा गायब झाल्याने त्याने आकांडतांडव केला. बायको मुलांना जाब विचारला. कधी नव्हे ते त्यांच्या घरात वादावाद झाले. आणि त्यांच्या घरातली सुख, शांती, समाधान संपुष्टात आले.

प्रधानाने राजाला सांगितले, राजन हाच तो ९९ चा गट आहे. मनुष्य थोडक्यात समाधानी असतो, तोवर आनंदी असतो, परंतु अतिहव्यासापोटी तो प्रेम, शांतता, आनंद सगळे काही गमावून बसतो. 

म्हणून प्रेमवीरांनो, तुमच्या नात्यात दुफळी माजण्यासाठी १ मोहोर पुरेशी ठरू शकते. कोणतेही १ कारण तुमचे प्रेम हिरावून घेवू शकते. त्या कलहाला आमंत्रण देऊ नका. अन्यथा जे आहे तेदेखील गमावून बसाल. 

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेRelationship Tipsरिलेशनशिप