शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

...आणि चिखलात रुतलेला हत्ती सुखरूप बाहेर आला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 08:00 IST

भूतकाळात संकटकालीन परिस्थितीशी केलेला सामना आपल्याला वास्तवात रुतलेले पाय बाहेर काढण्यास नक्की बळ देईल. 

एका राजाकडे त्याचा खास हत्ती होता. त्याचे नाव होते बाला. धिप्पाड देहाचा बाला, युद्धभूमीवर गेला की शत्रूला धडकी भरे, अशी त्याची ऐट होती. आजवर त्याच्यामुळे राजाने अनेक युद्धात, तहात यश मिळवले होते. विजयश्री मिळाल्यावरदेखील राजा बालावर चढवलेल्या अंबारीवर बसून राज्यात प्रवेश करत असे. 

वयपरत्वे बाला थोडा थकत चालला होता. परंतु, राजाचे त्याच्यावरील प्रेम तसूभरही कमी झाले नाही. त्याला आधीसारखाच मानसन्मान आणि राजेशाही थाट मिळत असे.

एक दिवस बालाला फिरवण्यासाठी सैनिक त्याला तळ्याकाठी घेऊन गेले. पाण्यात आंघोळ घालण्याच्या हेतूने त्यांना बालाला पुढे नेले, पण तळ्याकाठी भरपूर चिखल साचल्याने बालाचा पाय चिखलावरून सरकत खोल रुतून बसला. सैनिक त्याला बाहेर ओढण्याचा प्रयत्न करत होते, पण सर्व प्रयत्न अयशस्वी ठरत होते. स्वत: बाला देखील प्रयत्न करूनही बाहेर पडू शकत नव्हता.

ही बातमी राजाला कळली तर आपली काही खैर नाही. म्हणून घाबरलेले सैनिक प्रधानाकडे गेले. त्यांना विनंती केली आणि वाचवा असे म्हणाले. चतुर प्रधानाने तळ्याच्या चहुबाजूंनी रणवाद्ये वाजवायला सांगितली. ढोल, नगारे, दुदुंभी अशा रणवाद्यांनी जंगलाचा परिसर दुमदूमुन गेला. प्रधानांच्या अपेक्षेप्रमाणे रणवाद्यांचा असर झाला आणि बाला उसळी मारून सर्वशक्तीनिशी चिखलातून बाहेर पडला. सैनिकांनी त्याला स्वच्छ धुवून काढले. झुल पांघरली आणि राजेशाही थाटात परत आणले.

राजाला ही वार्ता कळली. त्याने प्रधानाचे आभार मानले व रणवाद्यांचे प्रयोजन विचारले. त्यावर प्रधान म्हणाला, `राजेसाहेब बाला सामान्य हत्ती नाही, तर तो योध्दा आहे. त्याला रणवाद्य ऐकण्याची सवय असल्याने तो आवाज ऐकून त्याचे बाहू स्फुरण पावले आणि गर्भगळीत झालेला बाला सुखरूप बाहेर आला.'

बालासारखेच आपणही अनेकदा संकटाच्या चिखलात रुतून बसतो, गर्भगळीत होतो. अशावेळी आपण भूतकाळातील जिंकलेल्या युद्धप्रसंगांचा आढावा घेतला पाहिजे. तत्कालीन परिस्थितीशी केलेला सामना आपल्याला वास्तवात रुतलेले पाय बाहेर काढण्यास नक्की बळ देईल.