शहरं
Join us  
Trending Stories
1
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
2
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
3
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
4
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
5
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
6
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
8
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
9
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
10
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
11
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
12
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
13
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
14
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
15
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
16
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
17
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
18
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
19
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
20
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका

Anger Management : राग येण्याचाही राग येऊ लागलाय? तर संदीप माहेश्वरी यांनी सांगितलेला उपाय करून बघा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2023 3:41 PM

Anger control tips: रागवायचे नाही हे ठरवूनही रागाचा क्षण सावरता येत नसेल आणि नंतर पश्चात्ताप होत असेल तर हा लेख खास तुमच्यासाठी!

आजच्या काळात आपण संयम गमावून बसलेलो आहोत. प्रत्येक गोष्ट क्षणार्धात मिळवण्याची सवय आपल्याला लागली आहे. कधी इंटरनेट बंद पडले, फोन लागला नाही, जेवणाची ऑर्डर वेळेत आली नाही, तरी लोक जमदग्नीचे रूप धारण करतात. एकूणच रागावर संयम राहिलेला नाही. सतत काहीतरी गमावण्याची भीती मनाला पोखरत राहते. या भीतीतून स्वत:ला सावरायचे कसे आणि क्षणार्धात डोकं शांत कसे ठेवायचे, याबद्दल सांगताहेत तरुणांचे लाडके व्याख्याते संदीप महेश्वरी!

आपल्या डोक्यात एकाच वेळी अनेक विचार सुरू असतात. आपल्या मेंदूला कल्पना आणि वास्तव यातला फरक स्पष्ट करता येत नाही. कल्पनेतून, अतिविचारातून निर्माण झालेल्या गैरसमजांना आपला मेंदू वास्तव समजू लागते आणि ते चिंताग्रस्त राहते. कल्पना आणि वास्तव यातला भेद अन्य कोणी नाही, तर आपणच आपला दूर करायला शिकलो, तर क्षणात डोकं शांत ठेवायला शिकू शकता. कसे ते पहा-

आपण सगळेच जण झोपेत स्वप्न पाहतो. स्वप्नात रंगून जातो. काही स्वप्नं आनंद देणारी तर काही भयभीत करणारी असतात. कधी कधी तर आपण आपला किंवा आपल्या आप्तजनांचा मृत्यू पाहतो. पटकन जाग येते. सर्वांगाला घाम फुटलेला असतो. पण क्षणात लक्षात येते आणि हायसे वाटते, की ते स्वप्नं होते. वास्तव नाही. वास्तवात आपण किंवा स्वप्नात मृत पाहिलेली व्यक्ती जीवंत आहे. या विचाराने आपण आनंदून जातो.

हीच कृती आपल्याला जागेपणी करायची आहे. एखाद्या गोष्टीची भीती जेव्हा मनात तयार होते. तेव्हा एक क्षण थांबून आपल्याला विचार करायला हवा, की ही केवळ आपली कल्पना आहे की वास्तव? एखाद्या कामात, नात्यात, आर्थिक व्यवहारात, स्पर्धेत आपण अपयशी ठरलो, याचा अर्थ आपण आयुष्यातून उध्वस्त होतो का? तर नाही! ही केवळ आपली कल्पना आहे. त्यात किती वेळ अडकून राहायचे? जेवढा वेळ आपण स्वप्न विसरायला लावतो, तेवढाच! अपयश, आळस झटकून पुन्हा कामाला लागलो, तर कोणीही आपल्याला यशस्वी होण्यापासून अडवू शकत नाही. 

हीच बाब राग नियंत्रणाची! एखाद्यावर रागवताना क्षणभर थांबून विचार करा आणि मग व्यक्त करा. खरोखरच नुकसान होण्याइतकी काही गोष्ट घडली आहे का? ती दुरुस्त होऊ शकणार नाही का? तेवढ्यासाठी रागवण्याची खरंच गरज आहे का? हा विचार केलात तरी क्षणात मन, डोकं शांत होऊन सहज पुढच्या कामाला सुरूवात करू शकाल. अन्यथा विचारात अडकून राहाल.

जेव्हा आपण कल्पना आणि वास्तव यात फरक ओळखायला शिकू तेव्हा आपल्याला आपल्याच वाईटात वाईट विचारांची गंमत वाटू लागेल आणि सदासर्वकाळ मन, विचार, डोकं शांत राहील आणि तुम्ही आनंदी राहाल.

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीMental Health Tipsमानसिक आरोग्य