शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

मदतीची गरज कधीही कोणालाही भासू शकते, म्हणून मदत करा तरच मदत मिळेल...!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2021 9:30 AM

चांगले काम करत राहा. मोबदल्याची अपेक्षा ठेवू नका. तुम्ही केलेल्या मदतीची जाणीव लोकांनी ठेवली नाही, तरी भगवंत नक्की ठेवेल आणि तुम्हालाही संकटकाळी मदतीचा हात देईल!

शाळा असो नाहीतर ऑफिस, वेळ झाली की आपली पावले अगतिकतेने घराकडे वळतात. कधी एकदा घर गाठतो, असे आपल्याला होऊन जाते. असेच एका श्रीमंत उद्योजकाच्या बाबतीत घडले. दिवसभराचे काम संपवून तो आपल्या आलिशान गाडीत बसून घराकडे जायला निघाला. 

रस्ता मोकळा होता. वातावरण छान होते. गाणी ऐकत घराच्या ओढीने गाडी भरधाव वेगाने जात होती. काही अंतरावर त्याला दुरून एक मुलगा हातात वीट घेऊन उभा असलेला दिसला. त्याने जोरजोरात हॉर्न वाजवून त्याला बाजूला होण्यास सांगितले. परंतु तो जागेवरून हलत नव्हता. एवढेच नाही, तर त्याने हातातली वीट जोरात गाडीच्या दिशेने भिरकावली. उद्योजकाने जोरदार ब्रेक लावला आणि गाडी जवळपास मुलाच्या अंगावर येता येता थांबली. वीट फेकून मारल्याने महागड्या गाडीला चांगलाच पोचा पडला होता. 

उद्योजक रागारागाने गाडीतून उतरला, आणि त्या लहान मुलाच्या अंगावर धावून जाणार, तोच मुलाने मागच्या दिशेने बोट दाखवत म्हटले, `तुम्हाला माझा खूप राग आला असेल याची मला पूर्ण कल्पना आहे पण माझा नाईलाज झाला होता. तो बघा मागे, माझा मोठा भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे. आम्ही दोघे सायकलीवरून जात असताना एका ट्रकने धडक दिली आणि त्यात भावाला चांगलीच दुखापत झाली. ट्रक ड्रायव्हर मदत करायची सोडून पळून गेला. मी त्याला एकट्याला नेऊ शकत नाही. मगापासून सगळ्या गाड्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होतो. शेवटी हा पर्याय निवडला. तुमचे नुकसान झाले, परंतु कदाचित या कृतीने माझ्या भावाचा जीव वाचेल असे वाटले. कृपया मदत करा...'

उद्योजकाने क्षणाचाही विलंब न करता दोघांना गाडीत घेतले. त्याची महागडी गाडी रक्ताने बरबटली होती. घरी जाण्याची ओढ असूनही उद्योजकाने जखमी मुलाला हॉस्पिटलमध्ये भरती केले त्यांच्या पालकांना बोलावून घेतले. डॉक्टरांनी मुलगा सुखरूप असल्याचे सांगितल्यावर उद्योजक घरी जाण्यास निघाला.

हॉस्पिटलमधून बाहेर आल्यावर त्याने आपल्या आलिशान गाडीकडे पाहिले आणि ठरवले, काहीही झाले, तरी मी गाडीची डागडुजी करणार नाही. ही आठवण अशीच ठेवीन. कारण, गाडीची ही अवस्था मला कायम या प्रसंगाची आठवण करून देईल. 

आपण सुखात आहोत, आनंदात आहोत, म्हणजे सगळे सुखी आहेत, असा अर्थ होत नाही. कोणाला मदतीची गरज असेल, तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. उद्या आपल्यावर तशी वेळ आली आणि कोणी आपल्याकडे दुर्लक्ष केले तर चालेल का? नाही ना? म्हणून 'एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ' या पंक्तीप्रमाणे मदतीचा हात देत चला. चांगले काम करत राहा. मोबदल्याची अपेक्षा ठेवू नका. तुम्ही केलेल्या मदतीची जाणीव लोकांनी ठेवली नाही, तरी भगवंत नक्की ठेवेल आणि तुम्हालाही संकटकाळी मदतीचा हात देईल!