शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

तुमचीही साडेसाती सुरु आहे का? मग हे उपाय अवश्य करा. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 08:00 IST

ज्योतिषाचार्य म्हणतात की जे चांगले कर्म करतात तेच शनिदेवाला प्रसन्न करतात. त्याच वेळी, जे वाईट कृत्य करतात त्यांना शनी देवाची भीती वाटते. त्यांचे म्हणणे आहे की शनिदेवांना घाबरण्याऐवजी त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आपल्या कृतीत सुधारणा देखील केली पाहिजे.

साडेसाती या शब्दालाही आपण घाबरतो. साडेसातीच्या काळात सगळे वाईटच घडते, असा आपण समज करून घेतलेला आहे. परंतु साडेसाती हा आपला परीक्षा काळ असतो. त्यात उत्तीर्ण झालो तर आयुष्यभराची शिकवण मिळते. त्यामुळे या अवघड काळाला सामोरे जाण्यासाठी पुढील उपाय अवश्य करून पहा. 

साडेसातीच्या काळात शनि देवांची कृपा व शांतीसाठी तीळ, उडीद, मिरपूड, शेंगदाण्याचे तेल, लोणचे, लवंगा, तमालपत्र आणि काळे मीठ या पदार्थांचे गरजूंना दान करावे. शनी देवांची आणि हनुमंताची पूजा करावी. शनिदेवांच्या नावे दान म्हणून काळे कपडे, बेरी, काळी उडीद, काळ्या चपला, काळे तीळ, लोखंड, तेल इत्यादी वस्तूंचेही दान करता येते. 

हे दान तसेच शनी देवाची पूजा केल्यास साडेसातीचा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होतो. शनिदेवांना दानशूर व्यक्ती आवडतात. आपल्या कृतीमुळे प्रसन्न होऊन ते साडेसातीच्या काळात आपल्याला मार्ग दाखवतात. तसेच, कुंडलीतील दुष्परिणामांशी संबंधित अडचणींपासून आपले रक्षण करतात अथवा परिस्थितीला सामोरे जाण्याचे बळ देतात. 

शनिदेव हे पृथ्वीचे दंडाधिकारी आहेत

ज्योतिषाचार्य म्हणतात की शनिदेव सूर्यपुत्र आहेत. शनिदेव यांना कर्माची आणि न्यायाची देवता देखील म्हटले जाते. शनिदेवाने भगवान शंकरांची कठोर तपश्चर्या केली होती. त्यांच्या तपश्चर्येने खूष होऊन भगवान शिवाने त्यांना नवग्रहांमधे श्रेष्ठ असल्याचे वरदान दिले. म्हणाले की आपण पृथ्वीलोकचे न्यायाधीश आणि दंडाधिकारी व्हाल. तू लोकांना त्यांच्या कर्माप्रमाणे न्याय व शिक्षा देशील.

ज्योतिषाचार्य म्हणतात की जे चांगले कर्म करतात तेच शनिदेवाला प्रसन्न करतात. त्याच वेळी, जे वाईट कृत्य करतात त्यांना शनी देवाची भीती वाटते. त्यांचे म्हणणे आहे की शनिदेवांना घाबरण्याऐवजी त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आपल्या कृतीत सुधारणा देखील केली पाहिजे.