शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live: रतन टाटांचे पार्थिव वरळीच्या स्मशानभूमीत दाखल, थोड्या वेळात अंत्यसंस्कार
2
मदरश्यांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ, खासगी विद्यापीठांना मंजुरी, राज्य मंत्रिमंडळात निर्णयांचा धडाका
3
"रतन टाटांसारख्या व्यक्तीला खरं तर हयात असतानाच 'भारतरत्न'ने सन्मानित करायला हवं होतं"
4
"या पराभवाला खूप गंभीरपणे..."; हरयाणा विधानसभा निकालावर अशोक गेहलोत यांचं मोठं विधान
5
२० वर्षांपासून असलेल्या नोकराने घात केला; भाजपा मंत्र्याच्या ५० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला
6
PAK vs ENG : मुल्तानमध्ये इंग्लंड 'सुल्तान'! ऐतिहासिक आकडा अन् विश्वविक्रम; भारताचा विक्रम मोडला
7
रिस्क घ्यायची नसेल तर 'या' सरकारी स्कीममध्ये गुंतवा पैसा; रिटायरमेंटपर्यंत व्हाल २,२६,९७,८५७ रुपयांचे मालक
8
इंग्लंड-पाक नव्हे भारत-श्रीलंका लढतीत सेट झालाय कसोटीतील सर्वोच्च धावसंख्येचा वर्ल्ड रेकॉर्ड
9
रतन टाटांसह त्यांच्या भावानेही लग्न केले नाही; सावत्र भाऊ सांभाळतो व्यवसाय, कुटुंबात कोण..?
10
Dussehra 2024: दसर्‍याला आठवणीने करा 'हे' एक काम; वास्तुमध्ये सदैव राहील सुख, संपत्ती, समाधान!
11
PAK vs ENG Live : इंग्लंड ७ बाद ८२३! पाकिस्तानी चाहत्यांना वेदना देणारी 'कसोटी', हॅरी ब्रूकच्या ३१७ धावा
12
एक पंखा, दोन बल्ब आणि टीव्ही..., विजेचं बिल आलं १.९ लाख रुपये, त्रस्त युवकानं उचललं टोकाचं पाऊल  
13
टाटांची जादू : टाटांच्या 'या' शेअरनं १ लाखांचे केले ₹३५ कोटी; गुंतवणूकदार झाले कोट्यधीश
14
सर्वाधिक १० श्रीमंत उमेदवारांमध्ये ७ पुरुष, ३ महिला; सर्व पुरुष हरले, महिला जिंकल्या
15
Riyan Parag ची नौटंकी; अजब-गजब ॲक्शन अन् पंचांकडून थेट कारवाईची रिॲक्शन (VIDEO)
16
Jio नव्हे, रतन टाटांनी दूरसंचार क्षेत्र बदलले; कॉलसह इंटरनेट स्वस्त केले
17
कार नको, सायकल वापर... ऐकताच चालत गेले; जर त्याच क्षणी मनावर ताबा ठेवला नसता तर 'रतन टाटा' बनले नसते
18
भारत बनवणार अण्वस्त्रांनी सुसज्ज दोन पाणबुड्या! केंद्राची ४० हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी
19
एक लाखाचं बक्षीस… विकत होता भंगार; भारतात परतताच जावेदला दिल्ली विमानतळावर अटक!
20
भयंकर! बायकोला मिळालेल्या योजनेच्या पैशातून नवरा प्यायला दारू अन् उचललं टोकाचं पाऊल

Atro Tips:ज्यांच्या आयुष्यात शनी ग्रहामुळे यशप्राप्तीत विलंब होतोय, त्यांनी 'हे' शनिस्तोत्र सुरू करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 7:00 AM

शनी म्हणजे विलंब; ज्यांच्या राशीला हा ग्रह येतो त्यांची कामे पूर्ण होतात, पण उशिराने; त्यांच्यासाठी हा मंत्र!

'श' म्हणजे शांती आणि `नि' म्हणजे निश्चय देणारी देवता म्हणजे शनी! ज्या शनिमहाराजांना आपण बघायलाही घाबरतो, त्यांना खगोलशास्त्राने सर्वात मनोहारी ग्रह असल्याचे म्हटले आहे.  ह्या ग्रहाभोवती असलेली कडी अतिशय नेत्रदीपक आहे, असे म्हणतात. म्हणजेच काय, तर त्यांच्याकडे बघण्याची आपली दृष्टी बदलणे गरजेचे आहे.

सूर्यदेवाचे पुत्र, यमदेवाचे ज्येष्ठ बंधू आणि वायुपुत्र हनुमंताचे जिवलग मित्र असलेले शनिदेव, त्यांचे वर्णन करताना महर्षी वेदव्यासांनी नवग्रह स्तोत्रात म्हटले आहे -

नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजमछायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम।।

'शनी' हा ग्रह नवग्रहांमध्ये सर्वश्रेष्ठ असल्याचे म्हटले जाते. मात्र, त्यांच्याबद्दलचा लोकांचा `ग्रह' आजतागायत शुद्ध झालेला नाही, उलटपक्षी ते आपल्या राशीला येऊ नयेत म्हणून सगळे `आग्रही' असतात. एखाद्याला रावाचा रंक, तर एखाद्याला रंकाचा राव बनवण्याची किमया त्यांच्याकडे आहे. ते कठोर शासनकर्ते आहेत. म्हणून, जे लोक दुष्कृत्य करतात, ते त्यांना बाचकून असतात. मात्र ज्या व्यक्तीचे आचरण शुद्ध असते, अशा व्यक्तींनी शनी महाराजांची भीती बाळगण्याचे अजिबात कारण नाही. मनुष्याला शिस्त लागावी म्हणून साडेसातीच्या काळात ते कठोरपणे वागतात, पण ती व्यक्ती सुधारली तर तिचा उद्धारही करतात.

रामायणात राम-सीतेला जो वनवास घडला तो शनीच्या साडेसातीमुळे, रावणाचा पराभव झाला, तो शनीची वक्रदृष्टी झाल्यामुळे, कृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा आळ आला, राजा हरिश्चंद्र आणि तारामतीलाही शनिपीडा सहन करावी लागली. इतकेच काय, तर शनी महाराजांचे जन्मत: सावळे रूप पाहून ते आपले अपत्य असूच शकत नाही, असे म्हणत आपल्या बायकोच्या चारित्र्यावर शंका घेणाऱ्या सूर्यदेवालाही अर्थातच आपल्या जन्मदात्या पित्यालाही माफ केले नाही, तर आपली काय कथा? 

शनि महाराजांनी कावळ्याला आपले वाहन निवडले, कारण कावळ्याकडे अतिशय सूक्ष्म नजर असते, तो घाण स्वच्छ करतो. समाजातील अनैतिकतेची, अंधश्रद्धेची, असमानतेची घाण स्वच्छ करण्यासाठी शनी महाराज कावळ्यावर स्वार झाले आहेत.

शनी महाराज अत्यंत  शीघ्रकोपी आहेत असे म्हटले जाते. जी व्यक्ती चुकीचे काम करते त्याच्यावर कोणाचाही कोप होणे स्वाभाविक आहे, मग शनी महाराज त्यासाठी अपवाद कसे ठरतील? उलट जे लोक धैर्याने संकटांना सामोरे जातात, त्यांना शनी महाराजांची कृपादृष्टी लाभते. हेच सांगणारी विक्रमादित्य राजाची पौराणिक कथा आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे. त्याच्या कठोर परिश्रमांना पाहून शनी महाराजांनी त्याची ज्या ठिकाणी साडेसातीतून मुक्तता केली, ते ठिकाण म्हणजे नंदुरबार येथील `शनिमांडळ'. ते स्थान शनी साडेसाती मुक्तीस्थान म्हणूनही ओळखले जाते.  या तीर्थक्षेत्री स्त्रियांनाही दर्शन घेण्याची परवानगी आहे. त्यामुळे असंख्य भाविक शनी महाराजांच्या दर्शनाला तिथे पोहोचतात. भक्तिभावाने शरण गेलेल्या भक्ताला शनी महाराजांची कृपादृष्टी लाभते, असा आजवरचा भक्तांचा अनुभव आहे. 

त्यांची निष्काम मनाने भक्ती करणाऱ्याला आणि शुद्ध आचरण ठेवून आपले काम चोखपणे करणाऱ्या व्यक्तीला शनि महाराजांची कृपादृष्टी लाभते, अशी ग्वाही शनिस्तोत्रात आढळते.

सूर्य पुत्रो दीर्घ देहो विशालाक्ष: शिवप्रिय:।मन्दचार: प्रसन्नात्मा पीडां हरतु मे शनि:।।