शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आयुर्वेद सांगते, प्रात:स्नानाचे होतात दहा चमत्कारिक फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 07:29 IST

नित्य स्नानाचा मुख्य लाभ हा, की शरीराला अपेक्षित जलतत्त्वाची पूर्तता होते.

स्नान सूयोदयापूर्वीच करावे असे शास्त्र सांगते. `नद्यां स्नानानि पुण्यानि' असे धर्मशास्त्राचे वचन आहे. म्हणजेच नदीतील स्नान पुण्यकारक असते, असा या वचनाचा अर्थ आहे. परंतु नदीस्नान शक्य नसले, तरी घरच्या घरी सूर्योदयापूर्वी थंड पाण्याने केलेले स्नान तितकेच पुण्यकारक व लाभदायक ठरते.

पूर्वी नदीस्नानाचा आग्रह का केला जात असे? तर सतत वाहते पाणी हे प्रदुषणमुक्त असते, स्वच्छ व पवित्र असते. मागील रात्री रात्रभर चंद्राच्या आणि नक्षत्रांच्या किरणांतून अमृत कणांचा वर्षाव विश्वावर आणि जलाशयातील जलावर झालेला असतो. सूर्योदयानंतर मात्र ती अमृतभारितता सूर्यकिरणांमुळे नष्ट होते. म्हणून स्नान हे सूर्योदयापूर्वी तेही वाहत्या पाण्यात करणे हिताचे मानले जात असे.

स्नान प्रवासात डुंबत शांतपणे करावे. कमरेएवढ्या पाण्यात उभे राहून आचमन, मार्जन, संकल्प, तर्पण करायचे असते. तेवढा वेळ पाण्यात उभे राहिल्याने वंशपरंपरागत शारीरिक विकार नष्ट होतात. यावर आताच्या काळात टब बाथ हा पर्याय वैज्ञानिकांनी शोधून काढला आहे. परंतु ते पाणी प्रवाही नसल्याने नदी स्नानाचे मूल्य देऊ शकत नाही. आयुर्वेद सांगते-

गुणा दश स्नानपरस्य पुंस: रूपं च तेजश्च बलं च शौचमआयुष्यमारोग्यमलोलुपत्वं दु:स्वप्नघातश्च तपश्च मेघा।।

याचा अर्थ असा, की नित्य प्रात: स्नानात दहा गुण आहेत. रूप, तेज, बल, कांति, शुद्धता, दीर्घायुष्य, निरोगिता, आळसावर मात, दुष्ट स्वप्नांचा नाश, तप आणि मेघा. मेघा म्हणजे धारणाशक्ति. हे दहा गुण प्रात:स्नानाने प्राप्त होतात.

आपल्या वेदाने सांगितले आहे, की पाण्यात सर्व वनौषधि विद्यमान आहेत. नित्य स्नानाचा मुख्य लाभ हा, की शरीराला अपेक्षित जलतत्त्वाची पूर्तता होते. शरीर पंचभूतांचे आहे. पंचभूतात जलतत्त्व आहे. शरीराला या जलतत्त्वाचाही पुरवठा हवा. स्नानामुळे साडेतीन कोटी रोमरंध्रातून जलतत्त्व शरीरात प्रविष्ट होते व पंचतत्त्वाची धारणा होते. स्नानानंतर रोमरंध्रात पाणी मुरते.

मंगलस्नान गरम पाण्याने केले, तरी डोक्यावर थंड पाणीच वापरावे. त्यामुळे उष्णताजन्य नेत्रविकार होणार नाहीत.त्यामुळे, यापुढे आंघोळीचा कंटाळा न करता आंघोळीची गोळी बंद आणि प्रात:स्नान सुरू करा व असाधारण लाभ मिळवा.