शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांची हरियाणात अग्निवीरांसंदर्भात बडी घोषणा, नौकरीसंदर्भात दिली मोठी गॅरंटी
2
अजित पवार नाही, महायुतीत राज ठाकरेंना सोबत घेऊ नका; रामदास आठवलेंचे वक्तव्य
3
डॉक्टरांची मागणी मान्य, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय; IPS मनोज कुमारांवर नवी जबाबदारी
4
गणपती बाप्पाच्या लाडूचा 30 लाख रुपयांना लिलाव, भाजप नेत्यानं लावली बोली; काय आहे यात खास?
5
IND vs BAN: विराट कोहली मारणार का बांगलादेशला जोरदार 'पंच'? खुणावतायत 'हे' 5 विक्रम
6
"त्यांची पत्नीसुद्धा निवडून आली नाही", गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना डिवचले
7
"असा जातीयवादी मुख्यमंत्री कधीही झाला नाही", पोलिसांनी रोखताच वाघमारेंची शिंदेंवर टीका
8
मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषण; प्रफुल्ल पटेल म्हणाले, “मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण...”
9
आमच्या आदेशाशिवाय कारवाई करू नका; बुलडोझर कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
10
Asian Champions Trophy 2024 : सिंग इज किंग! चीन झुंजले! पण जुगराजच्या गोलनं भारतानं पाचव्यांदा जिंकली ट्रॉफी
11
CM पद सोडले, आता ‘या’ गोष्टींवर सोडावे लागणार पाणी; अरविंद केजरीवाल यांना किती मिळणार पगार?
12
Ganesh Visarjan 2024 Live: गणपती चालले गावाला... मुंबई, पुण्यासह राज्यभरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू
13
"महिला डॉक्टरांना नाईट शिफ्ट करण्यापासून रोखू शकत नाही", सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
14
दिल्लीच्या टॉपर, ऑक्सफर्ड... नव्या मुख्यमंत्री आतिशींनी आपले आडनाव का हटविले; हे आहे यामागचे रहस्य...
15
Exclusive : सेटवर आलेला अनुभव, शाहरुखची प्रतिक्रिया अन् अनिता दाते; सोहम शाहने 'तुंबाड २'बद्दल दिली मोठी हिंट
16
टायटॅनिक बनविणारी कंपनी दुसऱ्यांदा बुडाली; विकत घेणारा ग्रुपही आर्थिक संकटात
17
IND vs BAN : बांगलादेशी खेळाडूंचा मैदानाबाहेर 'स्लेजिंग'चा खेळ; रोहितनं स्टाईलमध्ये दिलं उत्तर 
18
“स्वाभिमानाने लढलो, उद्धव ठाकरेंनी केले ते करायची हिंमत आहे का?”; राऊतांचा शिंदेंना टोला
19
मनू भाकरने 'दुखावलेल्या' नीरज चोप्रासाठी लिहिला खास भावनिक संदेश, ट्विट करत म्हणाली...
20
“गणपती बुद्धीची देवता, सर्वांत जास्त गरज आहे त्यांना बुद्धी द्यावी”: देवेंद्र फडणवीस

वाईट सवयी बदलता येतात का? हो! नक्की येतात! पण कधी आणि कशा? ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 4:34 PM

व्यक्ती वाईट नसते, सवयी वाईट असतात. त्या सवयी दूर झाल्या तर चांगुलपणा मूळ धरतो!

वाईट सवयींचा शेवट हा पश्चात्तापात असतो. वेळ निघून गेलेली असते आणि परतीचे मार्गही बंद झालेले असतात. पण वाईट सवयी एका रात्रीत जडतात का? अजिबात नाही! त्याची सुरुवात होत असताना आपले सुप्त मन आपल्याला सावध करते, परंतु आपण मनाचे ऐकत नाही. एक एक वीट रचत जातो आणि अभेद्य भिंत तयार होते. याबाबत एक गोष्ट सांगितली जाते. 

एक गुरु आणि शिष्य जंगलातून जात असतात. वाटेत त्यांना एक अंकुर फुटलेला दिसतो. गुरुजी सांगतात, ते उपटून टाक. शिष्य लगेच तशी कृती करतो. काही पावलं पुढे गेल्यावर त्यांना एक रोपटं दिसतं. गुरुजी सांगतात, ते रोपटं उपटून टाक. शिष्य तसे करतो. आणखी काही अंतर पार केल्यावर एक पाच सात फुटी वाढलेलं झाड दिसतं. गुरुजी सांगतात, ते उपटून टाक. थोडी शक्ती लावत शिष्य तेही उपटून टाकतो. आणखी पुढे गेल्यावर एक वटवृक्ष दिसतो. गुरुजी सांगतात, यालाही उपटून टाक. शिष्य म्हणतो, 'गुरुजी हे कसं शक्य आहे? याची पाळं मूळं जमिनीत खोलवर रुतली आहेत. ती काढणं अशक्य आहे.' गुरुजी म्हणतात, 'मी हेच तुम्हाला शिकवत असतो. जेव्हा तण दिसतात, ते वेळीच उपटून टाकायला हवेत. त्याचं रूपांतर झाडात झालं तर ते उपटून टाकणं अशक्य होतं.' 

ज्या सवयी आता क्षणिक सुख देत आहेत, त्या भविष्यात आपल्याला त्रासदायक ठरणार आहेत, याची सूचना अंतर्मन देतं तेव्हा वेळीच सावध व्हा. वाईट सवयींची पाळं मूळं खोलवर रुतण्याआधी ती उपटून टाका. मनाची उत्तम मशागत करा. तसे केले तर वाईट सवयी आणि त्यापासून होणारा प्रादुर्भाव यापासून आपण स्वतःला नक्कीच वाचवू शकतो याची खात्री बाळगा. 

आजपासून आपल्या मनातलं वाईट सवयींचं रोप किती वाढलं आहे ते चाचपून पहा आणि जरी ते खोलवर गेलं असेल तरी ते निरुपयोगी असल्याने मुळासकट काढून टाकण्याचा प्रयत्न करा, नक्की जमेल!

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी